शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएफ’ला हवी ‘वन रँक वन पेन्शन’

By admin | Updated: September 15, 2015 23:55 IST

साताऱ्यात मोर्चा : लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती लागू करण्याची मागणी

सातारा : ‘वन रँक वन पेन्शन’च्या निर्णयाचा लाभ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानांना मिळावा, या आणि इतर मागण्यांसाठी निवृत्त जवानांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती ‘बीएसएफ’ला लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सेवा व पेन्शनचे सर्व नियम भारतीय स्थलसेनेप्रमाणे लागू करावेत, ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करावी, जवानांना मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, लष्कराप्रमाणे माजी सैनिकाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ‘बीएसएफ’ माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावे आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, ही मंडळे वैधानिक संस्था म्हणून अस्तित्वात आणावीत, स्थलसेनेप्रमाणेच ‘बीएसएफ’ जवानांसाठी स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी, ‘बीएसएफ अ‍ॅक्ट’च्या कलम १९ प्रमाणे दहा वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या जवानांचे थांबविलेले निवृत्तिवेतन पुन्हा सुरू करावे, कॉन्ट्रिब्यूटरी पेन्शन प्रथेतून ‘बीएसएफ’ जवानांना सूट मिळावी, शहिदाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची नोकरी मिळावी, मुलांना प्रत्येक स्तरावर मोफत शिक्षण मिळावे, ‘बीएसएफ’ जवानाच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त अपंग व वृद्ध जवानांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त जवानांना शेतजमीव व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) सरकारकडून न्याय मिळावा... ‘बीएसएफ’ जवान या सर्व सुविधा मिळण्यास पात्र असून, सरकारने न मागताच त्या देणे गरजेचे होते. अशा सुविधा मिळत नसतील, तर यापुढे ‘बीएसएफ’मध्ये जाण्यास कोणीही धजावणार नाही. ‘बीएसएफ’ जवान शहीद झाल्यावर त्याला मानवंदना दिली जाते; मात्र नंतर त्याच्या पत्नीला सरकारदफ्तरी हेलपाटे मारावे लागतात. सीमा सुरक्षा दल नसते तर सीमेवरील तस्करी, भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, बेकायदा कृत्ये कितीतरी वाढली असती. अशा जवानांना सरकारकडून न्याय मिळावा आणि त्यासाठी आंंदोलने, मोर्चा, सत्याग्रह असे मार्ग वापरावे लागू नयेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.