शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

‘बीएसएफ’ला हवी ‘वन रँक वन पेन्शन’

By admin | Updated: September 15, 2015 23:55 IST

साताऱ्यात मोर्चा : लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती लागू करण्याची मागणी

सातारा : ‘वन रँक वन पेन्शन’च्या निर्णयाचा लाभ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानांना मिळावा, या आणि इतर मागण्यांसाठी निवृत्त जवानांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती ‘बीएसएफ’ला लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सेवा व पेन्शनचे सर्व नियम भारतीय स्थलसेनेप्रमाणे लागू करावेत, ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करावी, जवानांना मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, लष्कराप्रमाणे माजी सैनिकाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ‘बीएसएफ’ माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावे आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, ही मंडळे वैधानिक संस्था म्हणून अस्तित्वात आणावीत, स्थलसेनेप्रमाणेच ‘बीएसएफ’ जवानांसाठी स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी, ‘बीएसएफ अ‍ॅक्ट’च्या कलम १९ प्रमाणे दहा वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या जवानांचे थांबविलेले निवृत्तिवेतन पुन्हा सुरू करावे, कॉन्ट्रिब्यूटरी पेन्शन प्रथेतून ‘बीएसएफ’ जवानांना सूट मिळावी, शहिदाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची नोकरी मिळावी, मुलांना प्रत्येक स्तरावर मोफत शिक्षण मिळावे, ‘बीएसएफ’ जवानाच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त अपंग व वृद्ध जवानांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त जवानांना शेतजमीव व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) सरकारकडून न्याय मिळावा... ‘बीएसएफ’ जवान या सर्व सुविधा मिळण्यास पात्र असून, सरकारने न मागताच त्या देणे गरजेचे होते. अशा सुविधा मिळत नसतील, तर यापुढे ‘बीएसएफ’मध्ये जाण्यास कोणीही धजावणार नाही. ‘बीएसएफ’ जवान शहीद झाल्यावर त्याला मानवंदना दिली जाते; मात्र नंतर त्याच्या पत्नीला सरकारदफ्तरी हेलपाटे मारावे लागतात. सीमा सुरक्षा दल नसते तर सीमेवरील तस्करी, भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, बेकायदा कृत्ये कितीतरी वाढली असती. अशा जवानांना सरकारकडून न्याय मिळावा आणि त्यासाठी आंंदोलने, मोर्चा, सत्याग्रह असे मार्ग वापरावे लागू नयेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.