शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘बीएसएफ’ला हवी ‘वन रँक वन पेन्शन’

By admin | Updated: September 15, 2015 23:55 IST

साताऱ्यात मोर्चा : लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती लागू करण्याची मागणी

सातारा : ‘वन रँक वन पेन्शन’च्या निर्णयाचा लाभ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानांना मिळावा, या आणि इतर मागण्यांसाठी निवृत्त जवानांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती ‘बीएसएफ’ला लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सेवा व पेन्शनचे सर्व नियम भारतीय स्थलसेनेप्रमाणे लागू करावेत, ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करावी, जवानांना मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, लष्कराप्रमाणे माजी सैनिकाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ‘बीएसएफ’ माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावे आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, ही मंडळे वैधानिक संस्था म्हणून अस्तित्वात आणावीत, स्थलसेनेप्रमाणेच ‘बीएसएफ’ जवानांसाठी स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी, ‘बीएसएफ अ‍ॅक्ट’च्या कलम १९ प्रमाणे दहा वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या जवानांचे थांबविलेले निवृत्तिवेतन पुन्हा सुरू करावे, कॉन्ट्रिब्यूटरी पेन्शन प्रथेतून ‘बीएसएफ’ जवानांना सूट मिळावी, शहिदाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची नोकरी मिळावी, मुलांना प्रत्येक स्तरावर मोफत शिक्षण मिळावे, ‘बीएसएफ’ जवानाच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त अपंग व वृद्ध जवानांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त जवानांना शेतजमीव व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) सरकारकडून न्याय मिळावा... ‘बीएसएफ’ जवान या सर्व सुविधा मिळण्यास पात्र असून, सरकारने न मागताच त्या देणे गरजेचे होते. अशा सुविधा मिळत नसतील, तर यापुढे ‘बीएसएफ’मध्ये जाण्यास कोणीही धजावणार नाही. ‘बीएसएफ’ जवान शहीद झाल्यावर त्याला मानवंदना दिली जाते; मात्र नंतर त्याच्या पत्नीला सरकारदफ्तरी हेलपाटे मारावे लागतात. सीमा सुरक्षा दल नसते तर सीमेवरील तस्करी, भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, बेकायदा कृत्ये कितीतरी वाढली असती. अशा जवानांना सरकारकडून न्याय मिळावा आणि त्यासाठी आंंदोलने, मोर्चा, सत्याग्रह असे मार्ग वापरावे लागू नयेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.