शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

ग्रामस्थांतून संताप : तात्पुरती मलमपट्टी ठरली कुचकामी

भुर्इंज : येथील भुर्इंज मालदेववाडी असलेल्या रस्त्यावरील पुलाला मध्यभागीच भगदाड पडले असून, पुलाच्या दर्जाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पुलाला अशाच प्रकारचे भलेमोठे भगदाड पडले होते; मात्र संबंधितांनी फक्त मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. ती गळून पडली असून, या सर्व प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. भुर्इंज मालदेववाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. सुमारे २५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी या पुलाला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुरुमाची मलमपट्टी करून तेव्हा पडलेले भगदाड मुजवण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा या पुलावरच भलेमोठे भगदाड पडल्याने पूल किती दिवस तग धरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच पुलाच्या दर्जाचे अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धिंडवडे निघाले आहेत. असे असतानाही महाडनजीकच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेवरून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या ओढ्याला पाणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात धास्ती आहे. मुळातच या भगदाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, तसे काही झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे प्रशासनाचे पुरेशा गांभीर्याने नसलेले लक्ष जनतेचा रोष वाढवत आहे. रात्रीच्या वेळी जर काही घडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या पुलाची केवळ मलमपट्टी न करता मजबूत दुरुस्ती करावी, अशी मागणी आबासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे, सुनील शिंदे, वैभव शिंदे, चंद्रकांत जाधवराव, अंकुश मोरे, श्रीपाद एरंडे यांनी केली आहे. धोम परिसरातील दोन पूल वाहून जाऊन अनेक महिने होऊनही प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने त्या परिसरातील पन्नासहून अधिक मुलांना घरी बसून काढावे लागत आहे. त्यातच या पुलाला भगदाड पडल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)