शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

ग्रामस्थांतून संताप : तात्पुरती मलमपट्टी ठरली कुचकामी

भुर्इंज : येथील भुर्इंज मालदेववाडी असलेल्या रस्त्यावरील पुलाला मध्यभागीच भगदाड पडले असून, पुलाच्या दर्जाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पुलाला अशाच प्रकारचे भलेमोठे भगदाड पडले होते; मात्र संबंधितांनी फक्त मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. ती गळून पडली असून, या सर्व प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. भुर्इंज मालदेववाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. सुमारे २५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी या पुलाला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुरुमाची मलमपट्टी करून तेव्हा पडलेले भगदाड मुजवण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा या पुलावरच भलेमोठे भगदाड पडल्याने पूल किती दिवस तग धरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच पुलाच्या दर्जाचे अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धिंडवडे निघाले आहेत. असे असतानाही महाडनजीकच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेवरून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या ओढ्याला पाणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात धास्ती आहे. मुळातच या भगदाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, तसे काही झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे प्रशासनाचे पुरेशा गांभीर्याने नसलेले लक्ष जनतेचा रोष वाढवत आहे. रात्रीच्या वेळी जर काही घडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या पुलाची केवळ मलमपट्टी न करता मजबूत दुरुस्ती करावी, अशी मागणी आबासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे, सुनील शिंदे, वैभव शिंदे, चंद्रकांत जाधवराव, अंकुश मोरे, श्रीपाद एरंडे यांनी केली आहे. धोम परिसरातील दोन पूल वाहून जाऊन अनेक महिने होऊनही प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने त्या परिसरातील पन्नासहून अधिक मुलांना घरी बसून काढावे लागत आहे. त्यातच या पुलाला भगदाड पडल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)