शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

ग्रामस्थांतून संताप : तात्पुरती मलमपट्टी ठरली कुचकामी

भुर्इंज : येथील भुर्इंज मालदेववाडी असलेल्या रस्त्यावरील पुलाला मध्यभागीच भगदाड पडले असून, पुलाच्या दर्जाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पुलाला अशाच प्रकारचे भलेमोठे भगदाड पडले होते; मात्र संबंधितांनी फक्त मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. ती गळून पडली असून, या सर्व प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. भुर्इंज मालदेववाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. सुमारे २५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी या पुलाला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुरुमाची मलमपट्टी करून तेव्हा पडलेले भगदाड मुजवण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा या पुलावरच भलेमोठे भगदाड पडल्याने पूल किती दिवस तग धरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच पुलाच्या दर्जाचे अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धिंडवडे निघाले आहेत. असे असतानाही महाडनजीकच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेवरून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या ओढ्याला पाणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात धास्ती आहे. मुळातच या भगदाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, तसे काही झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे प्रशासनाचे पुरेशा गांभीर्याने नसलेले लक्ष जनतेचा रोष वाढवत आहे. रात्रीच्या वेळी जर काही घडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या पुलाची केवळ मलमपट्टी न करता मजबूत दुरुस्ती करावी, अशी मागणी आबासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे, सुनील शिंदे, वैभव शिंदे, चंद्रकांत जाधवराव, अंकुश मोरे, श्रीपाद एरंडे यांनी केली आहे. धोम परिसरातील दोन पूल वाहून जाऊन अनेक महिने होऊनही प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने त्या परिसरातील पन्नासहून अधिक मुलांना घरी बसून काढावे लागत आहे. त्यातच या पुलाला भगदाड पडल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)