शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उंडाळेनजीकचा पूल अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

सुमारे दीड वर्षापासून क-हाड ते कोकरूड या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या रुंदीकरणास पाचवड फाटा परिसरातून प्रारंभ करण्यात आला ...

सुमारे दीड वर्षापासून क-हाड ते कोकरूड या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या रुंदीकरणास पाचवड फाटा परिसरातून प्रारंभ करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन प्रमुख विभागांना जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू असून या मार्गावरील जुने पूल पाडण्यात येणार आहेत. त्यामुळेच उंडाळे व ओंड या दोन्ही गावांना जोडणारा क-हाड दक्षिण मांड नदीवर असलेला जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक तुळसण, सवादे, शेवाळेवाडी, उंडाळे या मार्गे वळविण्यात आली आहे.

हा पूल यापूर्वीच पाडण्यात येणार होता. मात्र, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी पूल पाडण्याची कार्यवाही थांबविण्यात आली होती. पूल पाडण्यात आल्यानंतर नवीन पुलाचे काम काही महिन्यात पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

- चौकट

पर्यायी मार्गांची अवस्था बिकट

ओंड व उंडाळे या गावादरम्यान असलेला पूल परडल्यामुळे उंडाळे ते क-हाड यादरम्यान वाहतुकीचे अंतर वाढणार आहे. याशिवाय पर्यायी रस्त्याची परिस्थिती चांगली नसल्याने वाहन चालकांचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे. रयत सहकारी साखर कारखाना सुरू असल्यामुळे या मार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. परिणामी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.