शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाटणकर गटाच्या हाती झाडू

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

पराभवानंतरचे चार्जिंग : कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न

पाटण : नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी आमदार व पाटणकर गटाच्या सभापतींनी सत्यजीत पाटणकर सभापती असताना ९९ टक्के निर्मलग्राम झालेला तालुका पुन्हा एकदा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली असून याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून करण्याची घोषणा केली. तर या मोहीमेत कुणीही राजकारण न आणता सामील व्हावे असे आवाहन रामभाऊ शेलार यांनी केले. यावर आमदार शंभूराज देसाई गटाच्या सदस्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता संमती दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निर्मल मोहीमेचा झाडू हातात मरगळ झटकण्यासाठी पाटणकर गट सक्रीय झाला आहे. विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांचा प्रचार करताना पाटणकर गटाने निर्मल केलेली गावे व त्याबाबत सत्यजितसिंहांनी सभापती असताना केलेली धडपड यावर चांगलाच भर दिला होता. पंचायत समितीत सत्त्ता असताना पाटणकर गटाने केवळ चार गावे वगळता संपूर्ण तालुका निर्मल केला होता. यानंतर शंभूराज देसार्इं यांनी पंचायत समितीवर सत्ता स्थापण केली. सभापती वनिता कारंडे यांना मात्र अडीच वर्षाच्या काळात चार गावे सुद्धा निर्मल करता आली नाही. आता मात्र पाटणकर गटाचा सभापती असून त्यांनी विधानसभेतील पराभवाची मरगळ झटकून निर्मल झालेली मात्र पुन्हा अस्वच्छ झालेली गावे झाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आमदारकी गेल्यानंतर केवळ सभापती पदावर भिस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमाचा धागा पकडून वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न उशीरा का होईना आमदार देसाई गटाच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे स्थापन केलेल्या निर्मल ग्राम समितीस विरोध होणार नसला तरी त्यामध्ये फाटाफूट होणार हे निश्चित. (प्रतिनिधी)देसाई गटाच्या भूमिकेकडे लक्षसभापती संगीता गुरव यांनी या मोहीमेचा शुभारंभ कोयनानगर येथे होईल असे सांगताच देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील यांनी कोयनानगर ऐवजी या मोहीमेचा शुभारंभ ढेबेवाडीतून करण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र याला राजाभाऊ शेलार यांनी नकार दिला.