शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साठा संपल्याने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे नियोजन केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे नियोजन केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील अडीच लाखांवर नागरिकांना लसीकरण झाले. पण, आता लसीचा साठाच संपल्याने वेगाने सुरू असणाऱ्या या मोहिमेलाच ब्रेक लागलाय. त्यामुळे साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण सुरू होणार नाही.

जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड आणि ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठांना ही लस देण्यात येत होती, तर आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत आणि घरापासून जवळच लस मिळावी यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी लसीकरणासाठी पूर्ण तयारी केली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर उपकेंद्रांतही लस देण्यासाठी यंत्रणा तत्पर केली. तसेच गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच इतर लोकांचा सहभाग घेण्याचे निश्चित केले. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला. पण, अवघ्या दोन-तीन दिवसांतच याला खीळ बसली. कारण, जिल्ह्यात आलेला कोरोनाचा साठा संपला आहे. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतरच पुढील लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही लसीची प्रतीक्षा असणार आहे.

चौकट :

आठवड्यात ९० हजार जणांना लस...

जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांना कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी व्यापक नियोजन झाले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात ९० हजार १३६ लोकांना लस मिळाली. तर दररोज २० हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. असे असले तरी ५ एप्रिलला २१ हजार, तर ६ एप्रिल रोजी २७ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली होती, हे विशेष.

कोट :

जिल्ह्यात एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. प्रशासनाने प्रभावी नियोजन आणि जनजागृती केल्याने लोकांत जागरुकता आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लसीची मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांतही सुरू करण्यात येईल.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

.............................................................