शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या बाटलीइतका तरी दर शेतकऱ्यांच्या दुधाला हवा होता

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

सदाभाऊ खोत : निसरे फाट्यावर शेतकरी मेळावा

मल्हारपेठ : ‘शेतकऱ्यांच्या लेकरांशी राज्यकर्ते, कारखानदारांना काहीही देणं-घेणं काही नाही. मंत्र्यांना आता कळेल, मतांसाठी भीक मागावी लागते. दारूच्या एका क्वॉर्टर इतका दुधाच्या बाटलीला दर दिला तरी तो शेतकऱ्यांना परवडला असता,’ असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडले.निसरे फाटा, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे, दीपक पाटील-शेरेकर, बी. जी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात विकास कामापेक्षा डिजिटल बोर्ड जास्त झळकायला लागलेत. अडाणी बापाबरोबर शिकलेलं पोरगं सुध्दा गुलाम बनवायला लागलंय. उत्पादित शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्थापित कारखानदार राज्यकर्त्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी उभी ठाकली आहे.’मनोज घोरपडे म्हणाले, ‘या तालुक्यात दोन गटांत राजकारण चालतं. शेतकऱ्यांचा कोण विचार करीत नाही. ऊस उत्पादनाच्या खर्चाचा विचार केल्यास ३,२०० रुपये दर मिळाला पाहिजे. याकरिता प्रस्तापितांची सत्ता बदलून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा.’ पंजाबराव पाटील म्हणाले, ‘पाटण तालुक्यात शेतकरी ऊसदरावर काही बोलत नाही. देईल तेवढाच दर घेतात. शेतकऱ्याने जागे व्हावे, संघटनेत शेतकऱ्यांना न्याय मिळत असतो.’ या कार्यक्रमात बी. जी. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)