शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दारूच्या बाटलीइतका तरी दर शेतकऱ्यांच्या दुधाला हवा होता

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

सदाभाऊ खोत : निसरे फाट्यावर शेतकरी मेळावा

मल्हारपेठ : ‘शेतकऱ्यांच्या लेकरांशी राज्यकर्ते, कारखानदारांना काहीही देणं-घेणं काही नाही. मंत्र्यांना आता कळेल, मतांसाठी भीक मागावी लागते. दारूच्या एका क्वॉर्टर इतका दुधाच्या बाटलीला दर दिला तरी तो शेतकऱ्यांना परवडला असता,’ असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडले.निसरे फाटा, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे, दीपक पाटील-शेरेकर, बी. जी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात विकास कामापेक्षा डिजिटल बोर्ड जास्त झळकायला लागलेत. अडाणी बापाबरोबर शिकलेलं पोरगं सुध्दा गुलाम बनवायला लागलंय. उत्पादित शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्थापित कारखानदार राज्यकर्त्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी उभी ठाकली आहे.’मनोज घोरपडे म्हणाले, ‘या तालुक्यात दोन गटांत राजकारण चालतं. शेतकऱ्यांचा कोण विचार करीत नाही. ऊस उत्पादनाच्या खर्चाचा विचार केल्यास ३,२०० रुपये दर मिळाला पाहिजे. याकरिता प्रस्तापितांची सत्ता बदलून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा.’ पंजाबराव पाटील म्हणाले, ‘पाटण तालुक्यात शेतकरी ऊसदरावर काही बोलत नाही. देईल तेवढाच दर घेतात. शेतकऱ्याने जागे व्हावे, संघटनेत शेतकऱ्यांना न्याय मिळत असतो.’ या कार्यक्रमात बी. जी. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)