शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

दारूच्या बाटलीइतका तरी दर शेतकऱ्यांच्या दुधाला हवा होता

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

सदाभाऊ खोत : निसरे फाट्यावर शेतकरी मेळावा

मल्हारपेठ : ‘शेतकऱ्यांच्या लेकरांशी राज्यकर्ते, कारखानदारांना काहीही देणं-घेणं काही नाही. मंत्र्यांना आता कळेल, मतांसाठी भीक मागावी लागते. दारूच्या एका क्वॉर्टर इतका दुधाच्या बाटलीला दर दिला तरी तो शेतकऱ्यांना परवडला असता,’ असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडले.निसरे फाटा, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे, दीपक पाटील-शेरेकर, बी. जी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात विकास कामापेक्षा डिजिटल बोर्ड जास्त झळकायला लागलेत. अडाणी बापाबरोबर शिकलेलं पोरगं सुध्दा गुलाम बनवायला लागलंय. उत्पादित शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्थापित कारखानदार राज्यकर्त्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी उभी ठाकली आहे.’मनोज घोरपडे म्हणाले, ‘या तालुक्यात दोन गटांत राजकारण चालतं. शेतकऱ्यांचा कोण विचार करीत नाही. ऊस उत्पादनाच्या खर्चाचा विचार केल्यास ३,२०० रुपये दर मिळाला पाहिजे. याकरिता प्रस्तापितांची सत्ता बदलून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा.’ पंजाबराव पाटील म्हणाले, ‘पाटण तालुक्यात शेतकरी ऊसदरावर काही बोलत नाही. देईल तेवढाच दर घेतात. शेतकऱ्याने जागे व्हावे, संघटनेत शेतकऱ्यांना न्याय मिळत असतो.’ या कार्यक्रमात बी. जी. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)