शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बबलूच्या पुतण्यासह दोघांना अटक

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बाबरला ठेचल्याची कबुली; घटनास्थळी बबलू-बाबरचा वाद

कऱ्हाड : बबलूचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी बबलूच्या पुतण्यासह आणखी एकास अटक केली आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी काहीजणांचा त्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, बाबरने गोळ्या झाडण्यापूर्वी बबलूशी त्याचे बोलणे झाले होते. अवघ्या काही सेकंदाच्या त्या चर्चेवेळी बबलू व बाबरचा खटका उडाला. तसेच दोघांची झटापट झाली. त्यानंतर क्षणार्धात बाबरने स्वत:जवळील पिस्तूल काढून बबलूवर गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलीस या साक्षीदारांकडून मिळत असलेल्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित करीत आहेत. बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बबलूचा पुतण्या सागर चंद्रकांत माने (वय २५) व हृषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर पालिकेकडील रस्त्यावरून बबलू असलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर झटापट होऊन काही सेकंदाच्या आत बाबरने स्वत:जवळील पिस्तुलातून बबलूवर गोळ्या झाडल्या. यावेळी बबलूचा पुतण्या सागर त्याठिकाणी होता. बबलू व त्यानंतर त्याची आई अनुसया यांना गोळ्या घातल्यानंतर बाबर तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावातील एकाने त्याला पाठीमागून पकडले. तसेच त्याच्याशी झटापट झाली. त्यावेळी बाबरच्या हातातील पिस्तूल खाली पडले. त्यानंतर जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घातली. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. या खून प्रकरणात सागर माने व हृषिकेश शेंदरे सहभागी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य काहीजण संशयित आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बबलूच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही संशयितांची नावेही निष्पन्न झाली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)बाबरची पिस्तूल नादुरुस्तबबलूवर दोन गोळ्या झाडल्यानंतर अनुसया यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने त्यांच्या दिशेनेही दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अनुसया यांच्या पायाला लागली, तर दुसरीचा नेम चुकला. दोन जिवंत काडतुसे पोलिसांना घटनास्थळी मिळाले. सातवी गोळी बाबरच्या पिस्तुलातच अडकून पिस्तूल नादुरुस्त झाले, असे पोलिसांनी सांगितले. बबलू-बाबर संभाषण महत्त्वाचेघटनेवेळी बबलू आणि बाबर खान समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात संभाषण झाले होते. हे संभाषण म्हणजे वाद होता आणि या वादानंतर झटापटही झाली होती. हे सर्व काही सेकंदात झाले होते. मात्र, बबलू आणि बाबरमध्ये त्यावेळी जे संभाषण झाले, ते तपासाच्या दृष्टीने पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. त्यानुसारच सध्या पोलीस तपास सुरू आहे.