शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बबलूच्या पुतण्यासह दोघांना अटक

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बाबरला ठेचल्याची कबुली; घटनास्थळी बबलू-बाबरचा वाद

कऱ्हाड : बबलूचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी बबलूच्या पुतण्यासह आणखी एकास अटक केली आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी काहीजणांचा त्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, बाबरने गोळ्या झाडण्यापूर्वी बबलूशी त्याचे बोलणे झाले होते. अवघ्या काही सेकंदाच्या त्या चर्चेवेळी बबलू व बाबरचा खटका उडाला. तसेच दोघांची झटापट झाली. त्यानंतर क्षणार्धात बाबरने स्वत:जवळील पिस्तूल काढून बबलूवर गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलीस या साक्षीदारांकडून मिळत असलेल्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित करीत आहेत. बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बबलूचा पुतण्या सागर चंद्रकांत माने (वय २५) व हृषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर पालिकेकडील रस्त्यावरून बबलू असलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर झटापट होऊन काही सेकंदाच्या आत बाबरने स्वत:जवळील पिस्तुलातून बबलूवर गोळ्या झाडल्या. यावेळी बबलूचा पुतण्या सागर त्याठिकाणी होता. बबलू व त्यानंतर त्याची आई अनुसया यांना गोळ्या घातल्यानंतर बाबर तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावातील एकाने त्याला पाठीमागून पकडले. तसेच त्याच्याशी झटापट झाली. त्यावेळी बाबरच्या हातातील पिस्तूल खाली पडले. त्यानंतर जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घातली. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. या खून प्रकरणात सागर माने व हृषिकेश शेंदरे सहभागी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य काहीजण संशयित आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बबलूच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही संशयितांची नावेही निष्पन्न झाली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)बाबरची पिस्तूल नादुरुस्तबबलूवर दोन गोळ्या झाडल्यानंतर अनुसया यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने त्यांच्या दिशेनेही दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अनुसया यांच्या पायाला लागली, तर दुसरीचा नेम चुकला. दोन जिवंत काडतुसे पोलिसांना घटनास्थळी मिळाले. सातवी गोळी बाबरच्या पिस्तुलातच अडकून पिस्तूल नादुरुस्त झाले, असे पोलिसांनी सांगितले. बबलू-बाबर संभाषण महत्त्वाचेघटनेवेळी बबलू आणि बाबर खान समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात संभाषण झाले होते. हे संभाषण म्हणजे वाद होता आणि या वादानंतर झटापटही झाली होती. हे सर्व काही सेकंदात झाले होते. मात्र, बबलू आणि बाबरमध्ये त्यावेळी जे संभाषण झाले, ते तपासाच्या दृष्टीने पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. त्यानुसारच सध्या पोलीस तपास सुरू आहे.