शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजोळी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST

आजी, मैत्रिणीला वाचविले : कºहाड तालुक्यातील वेगवेगळ्या घटना

कºहाड/शेणोली : कोडोली (ता़ कºहाड) येथील कृष्णा नदीपात्रात एका वृद्धेसह तिची नात व अन्य एक मुलगी बुडाली़ त्यावेळी पोहण्यासाठी आलेल्या युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन वृद्धेसह एका मुलीचा जीव वाचविला़ मात्र, वृद्धेच्या नातीचा बुडून मृत्यू झाला़ ही घटना आज, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ योगीता बाबासाहेब रेठरेकर (वय १४, रा़ वांग रेठरे) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. योगीताची आजी नंदा शामराव जगताप व मैत्रीण कोमल संजय जगताप या दोघींना वाचविण्यात युवकांना यश आले़ कोडोली हे योगीताचे आजोळ असून, सुटीसाठी ती मामाकडे आली होती़ आज, शनिवारी दुपारी योगीताची आजी नंदा कृष्णा नदीवर कपडे धुण्यासाठी निघाली होती़ त्यावेळी योगीता व तिची मैत्रीण कोमल दोघीही नदीवर गेल्या़ घाटावर कपडे धूत असतानाच योगीताचा पाय घसरून ती पाण्यात पडली़ योगीता बुडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोमलने नदीपात्रात उडी घेतली़ दोन्ही मुली बुडू लागल्यानंतर आजी नंदा यांनीही पात्रात उडी घेतली़ यावेळी आरडाओरडा झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या नितीन गुरव, सागर गुरव, प्रवीण माने व विशाल जगताप यांनी त्याठिकाणी धाव घेऊन नदीपात्रात उड्या घेतल्या़ त्यांनी नंदा व कोमल यांना पाण्यातून बाहेर काढले़ मात्र, योगीताचा बुडून मृत्यू झाला़ याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलिसांत झाली आहे़ दुसर्‍या एका घटनेत, कºहाड शहरातील एका नामांकित हॉटेलच्या जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मनीष संजय मोरे (८, रा़ आटके, ता़ कºहाड) या मुलाचा बुडून मृत्यू झाला़ ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली़ मनीष उन्हाळी सुटीनिमित्त आईसोबत कºहाडला मामाकडे आला होता़ कुटुंबीयांनी त्याला पोहण्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी कºहाडातील एका हॉटेलमध्ये वर्ग लावला होता़ आज सायंकाळी पाचच्या सुमारास मनीष आईसमवेत प्रशिक्षणासाठी संबंधित हॉटेलच्या जलतरण तलावाकडे गेला़ इतर मुलांबरोबर त्याने तलावात उडी घेतली़ मात्र, इतर मुले तलावातून बाहेर आली तरी मनीष बाहेर न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता तलावात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले़ याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे़ वाळू उपशामुळे पाणवठ्यावर खड्डा कोडोली येथे घाटानजीकच बेसुमार वाळूउपसा केला जातो़ त्यामुळे त्याठिकाणी नदीपात्रात मोठा खड्डा तयार झाला आहे. हा उपसा बंद करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे पंधरा दिवसांपूर्वी केली आहे़ त्याबाबतचे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले आहे़ मात्र, कार्यवाही न झाल्यामुळेच शनिवारची घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़