शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

माणमध्ये बंधारे, जलयुक्तची किमया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 23:44 IST

पाणीपातळीत वाढ : पीक पद्धतही बदलणार; पाणीटंचाई कमी होण्यास मदत

दहिवडी : जिहे-कटापूर, उरमोडी पाणी योजना पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत माण तालुक्याचा पाणी प्रश्न संपणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच तालुक्यात सिमेंट साखळी बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान व जलयुक्त शिवार अभियानातून ३८४ सिमेंट बंधारे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रांवर समतोल चर गाळ काढणी, बंधारे दुरुस्ती अशी अनेक कामे झाली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पावसाचा थेंब ना थेंब जिरला असून, पाणी पातळीमध्ये १.५ ते ३ मीटरने वाढ झाली आहे. आता पीक पध्दतीतही बदल होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५१ गावांत पाणलोट विकास कार्यक्रम राबविला गेला. त्यानंतर बनगरवाडी, सोकासन, कासारवाडी, भालवडी या ठिकाणी शाश्वत कामे झाली. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात २४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. त्यामध्ये १२२१ कामे पूर्ण झाली. तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे लोकसहभागातून अनेक गावांनी चित्र पालटवले. लोधवडे, दानवलेवाडी, बिदाल अशी सुरुवातीला मोजकी गावे होती. आता गोंदवले, वरकुटे-मलवडी, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी या गावांनी विशेषत: जलसंधारणावर भर दिला.अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात अनेक गावांना भेट देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पांढरवाडी सारख्या गावात ७ साखळी बंधारे झाले. १ पाणलोट मधून तर ३ लोकसहभागातून बंधारे झाले. २२५ टीसीएम पाणी आणले गेले. पांढरवाडीत प्यायला पाणी नाही तेथे आज पाणी पातळी वाढल्याचे दिसते. दुर्गमभागात पाणी वाढल्याने आज १५ ते ३ मीटरने पातळी वाढली आहे. त्यामुळे ३०० फुटांवर न लागणारे पाणी आज ५० फुटांवर लागत आहे. पांढरवाडी, महिमानगड परिसरात वाटाणा पीक ७०० ते ८०० हेक्टर, मूग २ ते २५०० हेक्टर, मका या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षातून एक पीक घेतले जात होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन वर्षांमध्ये पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्तमधून प्रचंड कामे झाल्याने पाण्याची पातळी १.५ ते ३ मीटरने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारीशासनाचे पाठबळ व लोकसहभाग. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रोत्साहन यामुळे गावचा कायापालट झाला. आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, आटलेल्या बोअरवेलमधून पुन्हा पाण्याचे स्त्रोत वाढले आहेत. - सुभाष घाडगे महाराज, पांढरवाडी