शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

माणमध्ये बंधारे, जलयुक्तची किमया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 23:44 IST

पाणीपातळीत वाढ : पीक पद्धतही बदलणार; पाणीटंचाई कमी होण्यास मदत

दहिवडी : जिहे-कटापूर, उरमोडी पाणी योजना पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत माण तालुक्याचा पाणी प्रश्न संपणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच तालुक्यात सिमेंट साखळी बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान व जलयुक्त शिवार अभियानातून ३८४ सिमेंट बंधारे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रांवर समतोल चर गाळ काढणी, बंधारे दुरुस्ती अशी अनेक कामे झाली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पावसाचा थेंब ना थेंब जिरला असून, पाणी पातळीमध्ये १.५ ते ३ मीटरने वाढ झाली आहे. आता पीक पध्दतीतही बदल होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५१ गावांत पाणलोट विकास कार्यक्रम राबविला गेला. त्यानंतर बनगरवाडी, सोकासन, कासारवाडी, भालवडी या ठिकाणी शाश्वत कामे झाली. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात २४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. त्यामध्ये १२२१ कामे पूर्ण झाली. तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे लोकसहभागातून अनेक गावांनी चित्र पालटवले. लोधवडे, दानवलेवाडी, बिदाल अशी सुरुवातीला मोजकी गावे होती. आता गोंदवले, वरकुटे-मलवडी, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी या गावांनी विशेषत: जलसंधारणावर भर दिला.अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात अनेक गावांना भेट देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पांढरवाडी सारख्या गावात ७ साखळी बंधारे झाले. १ पाणलोट मधून तर ३ लोकसहभागातून बंधारे झाले. २२५ टीसीएम पाणी आणले गेले. पांढरवाडीत प्यायला पाणी नाही तेथे आज पाणी पातळी वाढल्याचे दिसते. दुर्गमभागात पाणी वाढल्याने आज १५ ते ३ मीटरने पातळी वाढली आहे. त्यामुळे ३०० फुटांवर न लागणारे पाणी आज ५० फुटांवर लागत आहे. पांढरवाडी, महिमानगड परिसरात वाटाणा पीक ७०० ते ८०० हेक्टर, मूग २ ते २५०० हेक्टर, मका या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षातून एक पीक घेतले जात होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन वर्षांमध्ये पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्तमधून प्रचंड कामे झाल्याने पाण्याची पातळी १.५ ते ३ मीटरने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारीशासनाचे पाठबळ व लोकसहभाग. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रोत्साहन यामुळे गावचा कायापालट झाला. आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, आटलेल्या बोअरवेलमधून पुन्हा पाण्याचे स्त्रोत वाढले आहेत. - सुभाष घाडगे महाराज, पांढरवाडी