शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

माणमध्ये बंधारे, जलयुक्तची किमया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 23:44 IST

पाणीपातळीत वाढ : पीक पद्धतही बदलणार; पाणीटंचाई कमी होण्यास मदत

दहिवडी : जिहे-कटापूर, उरमोडी पाणी योजना पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत माण तालुक्याचा पाणी प्रश्न संपणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच तालुक्यात सिमेंट साखळी बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान व जलयुक्त शिवार अभियानातून ३८४ सिमेंट बंधारे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रांवर समतोल चर गाळ काढणी, बंधारे दुरुस्ती अशी अनेक कामे झाली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पावसाचा थेंब ना थेंब जिरला असून, पाणी पातळीमध्ये १.५ ते ३ मीटरने वाढ झाली आहे. आता पीक पध्दतीतही बदल होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५१ गावांत पाणलोट विकास कार्यक्रम राबविला गेला. त्यानंतर बनगरवाडी, सोकासन, कासारवाडी, भालवडी या ठिकाणी शाश्वत कामे झाली. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात २४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. त्यामध्ये १२२१ कामे पूर्ण झाली. तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे लोकसहभागातून अनेक गावांनी चित्र पालटवले. लोधवडे, दानवलेवाडी, बिदाल अशी सुरुवातीला मोजकी गावे होती. आता गोंदवले, वरकुटे-मलवडी, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी या गावांनी विशेषत: जलसंधारणावर भर दिला.अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात अनेक गावांना भेट देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पांढरवाडी सारख्या गावात ७ साखळी बंधारे झाले. १ पाणलोट मधून तर ३ लोकसहभागातून बंधारे झाले. २२५ टीसीएम पाणी आणले गेले. पांढरवाडीत प्यायला पाणी नाही तेथे आज पाणी पातळी वाढल्याचे दिसते. दुर्गमभागात पाणी वाढल्याने आज १५ ते ३ मीटरने पातळी वाढली आहे. त्यामुळे ३०० फुटांवर न लागणारे पाणी आज ५० फुटांवर लागत आहे. पांढरवाडी, महिमानगड परिसरात वाटाणा पीक ७०० ते ८०० हेक्टर, मूग २ ते २५०० हेक्टर, मका या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षातून एक पीक घेतले जात होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन वर्षांमध्ये पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्तमधून प्रचंड कामे झाल्याने पाण्याची पातळी १.५ ते ३ मीटरने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारीशासनाचे पाठबळ व लोकसहभाग. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रोत्साहन यामुळे गावचा कायापालट झाला. आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, आटलेल्या बोअरवेलमधून पुन्हा पाण्याचे स्त्रोत वाढले आहेत. - सुभाष घाडगे महाराज, पांढरवाडी