शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

फिरत्या गाडीचं जुळलं तरुणाईशी ‘रक्ताचं’ नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:42 IST

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय तरुण-तरुणींच्या वर्दळीचा परिसर. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी कायमच उभारलेली दिसते. कॉलेज मुलं-मुली गाडीत येतात अन् रक्तदान करून जातात. या फिरत्या रक्तपेढीत केवळ आठ महिन्यांत दीड हजार जणांनी रक्तदान केलं असून, या गाडीचं अन् तरुणाईचं आता जणू ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय तरुण-तरुणींच्या वर्दळीचा परिसर. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी कायमच उभारलेली दिसते. कॉलेज मुलं-मुली गाडीत येतात अन् रक्तदान करून जातात. या फिरत्या रक्तपेढीत केवळ आठ महिन्यांत दीड हजार जणांनी रक्तदान केलं असून, या गाडीचं अन् तरुणाईचं आता जणू रक्ताचं नातं जुळलं आहे.सातारा येथील महेश भोसले हे एका रक्तपेढीत प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांनी बारा वर्षे सेवा बजावली. या कार्यकाळात एक गोष्टी त्यांच्या लक्षात आली की, रक्तदान करण्याची अनेकांना इच्छा असते; पण केवळ आठ आणि दहा जणांसाठी रक्तदान शिबिर घेता येत नव्हते. त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. रक्तदान करण्याबाबत महाविद्यालयीन तरुणांमध्ये क्रेझ आहे; पण कॉलेजच्या व्यस्त वेळेतून त्यांना रक्तपेढीपर्यंत जाऊन रक्तदान करता येत नाही.महेश भोसले यांनी पाच वर्षांपूर्वी बालाजी रक्तपेढी संस्थेची स्थापना केली. त्यातून जिल्ह्यात गावोगावी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले अन् सात महिन्यांपूर्वी ऐतिहासिक निर्णय घेतला. एका अलिशान गाडीत रक्तपेढीच तयार केली. त्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. घरी कोणाचा वाढदिवस असेल, एखाद्या संस्थेचा, दुकानाचा वर्धापन दिन असल्यास संस्थेत केवळ एका फोनवर गाडी संबंधित ठिकाणी हजर असते. या उपक्रमाला सातारकरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.विशेषत: दुपारच्या वेळेत ही गाडी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय परिसरात उभी असते. या परिसरात छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन अशी महाविद्यालये आहेत. महाविद्यालय सुटल्यानंतर तरुण-तरुणी येथे येतात. नावनोंदणी करून रक्तदानही करत असतात.दोन हजार पिशव्या साठवण क्षमताबालाजी ब्लड बँकेत दोन हजार पिशव्यांची साठवण क्षमता आहे. तसेच कम्पोनंट यंत्रणा कार्यान्वित आहे. रक्तदान केल्यास पुढील दोन वर्षांत रक्तदात्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला तेवढेच रक्त मोफत मिळते. दोन वर्षांत वापर न झाल्यास रक्तदात्याला आयुष्यात केव्हाही तेवढे रक्त मोफत मिळते.असे आहेत कर्मचारीफिरत्या रक्तपेढीत डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक, चालक असे कर्मचारी कार्यरत असतात.