शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आंधळे विज्ञान हे फसवे ठरते : सत्यजित रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

सातारा : कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ ...

सातारा : कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. रथ म्हणाले, छद्म विज्ञानातील अनेक कल्पना सर्वसामान्य लोकांनी साथीमुळे उद्भवणाऱ्या भीतीपासून आपल्याला काहीतरी संरक्षण मिळावे, आधार मिळावा यासाठी स्वीकारलेल्या दिसतात. कारण त्यात काहीतरी तार्किक वाटणारे समाधान मिळते व या साथीसारख्या भयंकारी काळात अशा स्वरूपाच्या छद्मविज्ञानी कल्पना लोकांच्या पचनी पडू लागतात आणि त्याचा फायदा हितसंबंधी लोक घेतात.

विज्ञानाचे नाव वापरणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल चटकन अविश्वास दाखवू नका तसेच पटकन विश्वासही ठेवू नका, पुरावा मागा, तपासा, त्यांची शास्त्रीय कसोटीवर पारख करा, असा सल्ला डॉ. सत्यजित रथ यांनी देत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रतिकार शक्ती, लस, आयुर्वेदिक उपचार या संदर्भातील अनेक प्रश्नांना व्याख्यानानंतर समर्पक उत्तरे दिली.

व्याख्यानाच्या सुरुवातीला फसवे विज्ञान विरोधी जनजागर अभियानाची माहिती आणि डॉ. सत्यजित रथ यांचा परिचय मुक्ता दाभोलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध भागांतून ५०० च्यावर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक ऑनलाईन उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार राहुल थोरात यांनी मानले.