शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भाजप म्हणते ‘हम भी है तय्यार’

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

स्वबळाची चाचपणी : प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी

मोहन मस्कर-पाटील - सातारा-- एका बाजूला शिवसेना सातारा जिल्ह्यात स्वतंत्र चाचपणी करत असताना भारतीय जनता पार्टीही आता मागे राहिलेली नाही. शिवसेनेचा सुटलेला बाण जर परत येत नसेलतर भाजपने जिल्ह्यातील इच्छुकांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानुसार कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव, फलटण, पाटण हे पाच शिवसेनेकडे तर सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण हे तीन मतदारसंघ भाजपकडे होते. लोकसभेतील यशानंतर भाजपने पहिले तीन आणि आता अधिकचे दोन असे पाच मतदारसंघ मागितले आहेत. भाजपची ही मागणी सेनेला खटकणारी आहे.साताऱ्यातून भाजपने गेली काही वर्षे अंतर्गत तयारी सुरू केली आहे. येथून दत्ताजी थोरात आणि सुवर्णा पाटील यांच्या नावाची चर्चा आहेत. हा मतदारसंघ भाजपकडे गेलाच तर त्यांच्यापैकी कोणीतरी एक उमेदवार असणार आहे. रवींद्र परामणे यांनीही विधानसभेसाठी इच्छुकता दर्शविली आहे. माजी आ. सदाशिव सपकाळ यांना भाजप निष्ठावंतांचा विरोध आहे.‘कऱ्हाड दक्षिण’मधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील इच्छुक आहेत. मात्र, जर काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिलीतरी आ. उंडाळकरांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरेगावातून भाजपकडे दोन चेहरे आहेत. कांताताई नलावडे यांच्या नावाचा आग्रह येथून झाला आहे नुकतेच भाजपवासी झालेल्या महेश शिंदे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संपर्क वाढविला आहे. दिलीप येळगावकर यांनीही माणमधून शड्डू ठोकला आहे. बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ आणि डॉ. महादेव कापसे यांनीही येथून उमेदवारी मागितली आहे. पाटणमधून दीपक महाडिक, कविता कचरे तर कऱ्हाड उत्तरमधून धैर्यशील पाटील-शिरगावकर यांची नावे आहेत.फलटणमधून कोण..?फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. येथून भाजपचे उमेदवार कोण असा जर प्रश्न उपस्थित केला तर कोणाचेही नाव पुढे येत नाही. भाजपचे अस्तित्व येथे अगदीच नगण्य आहे. अनेकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावेही माहित नाहीत. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार कोण असेल, याची चर्चाच करता येत नाही. जर उमेदवार द्यायचाच झाला तर तो कोण असेल, याचा शोध अजून भाजपने सुरू केलेला नाही. मात्र, पक्ष वगळता येथून प्रा. अनिल जगताप, रमेश आढाव, अ‍ॅड. प्रशांत कोरेगावकर इच्छूक आहेत.वाईत संभ्रमावस्था कायम...वाई मतदारसंघात भाजपची संभ्रमावस्था कायम आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथून पुरुषोत्तम जाधवांनी नशीब आजमावले, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत लोकसभा लढली. तेथेही अपयश आले. आता तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत वाईतून उमेदवारी मागितल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाईतून माजी आमदार मदन भोसले भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नाहीतर मदन भोसले काँग्रेसकडून लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे येथील उमेदवारीच्या अनुषंगाने भाजपपुढेही संभ्रमावस्थाच आहे.