शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

भाजप म्हणते ‘हम भी है तय्यार’

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

स्वबळाची चाचपणी : प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी

मोहन मस्कर-पाटील - सातारा-- एका बाजूला शिवसेना सातारा जिल्ह्यात स्वतंत्र चाचपणी करत असताना भारतीय जनता पार्टीही आता मागे राहिलेली नाही. शिवसेनेचा सुटलेला बाण जर परत येत नसेलतर भाजपने जिल्ह्यातील इच्छुकांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानुसार कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव, फलटण, पाटण हे पाच शिवसेनेकडे तर सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण हे तीन मतदारसंघ भाजपकडे होते. लोकसभेतील यशानंतर भाजपने पहिले तीन आणि आता अधिकचे दोन असे पाच मतदारसंघ मागितले आहेत. भाजपची ही मागणी सेनेला खटकणारी आहे.साताऱ्यातून भाजपने गेली काही वर्षे अंतर्गत तयारी सुरू केली आहे. येथून दत्ताजी थोरात आणि सुवर्णा पाटील यांच्या नावाची चर्चा आहेत. हा मतदारसंघ भाजपकडे गेलाच तर त्यांच्यापैकी कोणीतरी एक उमेदवार असणार आहे. रवींद्र परामणे यांनीही विधानसभेसाठी इच्छुकता दर्शविली आहे. माजी आ. सदाशिव सपकाळ यांना भाजप निष्ठावंतांचा विरोध आहे.‘कऱ्हाड दक्षिण’मधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील इच्छुक आहेत. मात्र, जर काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिलीतरी आ. उंडाळकरांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरेगावातून भाजपकडे दोन चेहरे आहेत. कांताताई नलावडे यांच्या नावाचा आग्रह येथून झाला आहे नुकतेच भाजपवासी झालेल्या महेश शिंदे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संपर्क वाढविला आहे. दिलीप येळगावकर यांनीही माणमधून शड्डू ठोकला आहे. बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ आणि डॉ. महादेव कापसे यांनीही येथून उमेदवारी मागितली आहे. पाटणमधून दीपक महाडिक, कविता कचरे तर कऱ्हाड उत्तरमधून धैर्यशील पाटील-शिरगावकर यांची नावे आहेत.फलटणमधून कोण..?फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. येथून भाजपचे उमेदवार कोण असा जर प्रश्न उपस्थित केला तर कोणाचेही नाव पुढे येत नाही. भाजपचे अस्तित्व येथे अगदीच नगण्य आहे. अनेकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावेही माहित नाहीत. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार कोण असेल, याची चर्चाच करता येत नाही. जर उमेदवार द्यायचाच झाला तर तो कोण असेल, याचा शोध अजून भाजपने सुरू केलेला नाही. मात्र, पक्ष वगळता येथून प्रा. अनिल जगताप, रमेश आढाव, अ‍ॅड. प्रशांत कोरेगावकर इच्छूक आहेत.वाईत संभ्रमावस्था कायम...वाई मतदारसंघात भाजपची संभ्रमावस्था कायम आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथून पुरुषोत्तम जाधवांनी नशीब आजमावले, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत लोकसभा लढली. तेथेही अपयश आले. आता तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत वाईतून उमेदवारी मागितल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाईतून माजी आमदार मदन भोसले भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नाहीतर मदन भोसले काँग्रेसकडून लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे येथील उमेदवारीच्या अनुषंगाने भाजपपुढेही संभ्रमावस्थाच आहे.