शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

साताऱ्यात पेटलं ‘भाजप-राष्ट्रवादी’ वाक्युध्द

By admin | Updated: October 19, 2015 23:42 IST

बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्या--कांताताई नलावडे : भाजप लोकसंवादातून करणार वर्षपूर्ती आणल्याचा दावा; भाजप लोकसंवादातून करणार वर्षपूर्ती

सातारा : ‘बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे; पण पवारांच्या दबावामुळे या आत्महत्या सरकारी नोंदीवर येत नाहीत,’ असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. बारामती शहर सोडता पाच किलोमीटर अंतरावर पिण्याचे पाणी मिळत नाही, बारामती व विद्या प्रतिष्ठान एवढ्याच गोष्टींचे भांडवल करून वरिष्ठ नेत्यांना बारामतीत बोलावले जाते,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने भाजप लोकसंवादातून केलेल्या कामांची माहिती राज्यभर पोहोचविणार आहे. दि. १९ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत भाजप वर्षपूर्ती सप्ताह राबविणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कांताताई नलावडे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांतील कुशासनाला कंटाळलेल्या जनतेने गेल्यावर्षी विधानसभेत सत्तांतर घडवून आणले. दुष्काळाच्या कामावर आघाडी सरकारने केवळ १ हजार ३०० कोटी १५ वर्षांत खर्च केले. भाजपने अवघ्या वर्षात ८ हजार कोटी खर्च केले. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. छावणीपासून दावणीपर्यंत चारा नेण्याचे धोरण राबविले आहे. राज्याला आॅक्टोबर २०१४ पासून जादा दुधाचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकारी संस्थांकडील अतिरिक्त दूध शासकीय दराने स्वीकारून येणारा खर्च व तोटा शासनाने सहन करावा, असा निर्णय घेतला. जलयुक्त शिवाराच्या कामांद्वारे तीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. आघाडी शासनाने १५ वर्षांत २४ हजार कोटी खर्च करून अवघे सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. त्याच जागी भाजपाने ६ हजार २०० गावे हिरवीगार केली. आरोपींना शिक्षा होण्याचा वेगही वाढला आहे. पोलीस ठाणी आॅनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. मुद्रांक शुल्काच्या दरात कपात केल्याने अवघ्या २०० रुपयांनी वारस नोंदी होत आहेत. रक्ताच्या पिशवीचे दरही तब्बल २५० रुपयांनी कमी केले आहेत. घरगुती विजेच्या दरात पाच टक्के तर औद्योगिक विभागाच्या वीज दरात दहा टक्के कपात केली आहे.’भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक किशोर गोडबोले, रवी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटणचे चार कृषी विभागाचे कर्मचारी निलंबितपाटण तालुक्यातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमअंतर्गत कामांची बिले काढताना अफरातफर केल्याप्रकरणी कृषी विभागाचे चार कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी सहायक एम. पी. कूवर, कृषी पर्यवेक्षक व्ही. बी. बहादुरे, मंडल कृषी अधिकारी एस. एस. सावंत, तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव विभागीय कृषी सह संचालकांनी शासनाकडे सादर केला होता. कुशासनाला जनता कंटाळलीआघाडीच्या शासनाच्या कारभाला जनता कंटळली होती. त्यामुळेच विधानसभेत सत्तांतर घडवून आणले. दुष्काळाच्या कामावर आघाडी शासनाने भरमसाठ पैसा खर्च केला आहे; पण भाजपाने हा खर्च कमी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.