शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

भाजप सरकार म्हणजे रंग बदलणारा सरडा : धनंजय मुंडे

By admin | Updated: June 10, 2017 13:49 IST

खंडाळ्यातील शेतकरी मेळाव्यात घणाघात; कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी लढा देणार

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. १0 : भाजपाने सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत . वेळ येईल त्याप्रमाणे शब्द फिरवून जनतेची फसवणूक केली जात आहे. भाजपाचे सरकार म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे. अशी घणाघाती टीका करीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी लढा देणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले.असवली, ता . खंडाळा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कृषी सभापती मनोज पवार, तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषद सदस्य उदयदादा कबुले, दिपाली साळुंखे, शारदा ननावरे, मंगेश धुमाळ, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजपुरे, सभापती मकरंद मोटे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, नगराध्यक्ष शरद दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, शामराव गाढवे, अजय भोसले, उपसरपंच सचिन ढमाळ यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.धनंजय मुंडे पुढे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवून जनतेला फसवलं. कष्टकऱ्यांनी घाम गाळून कमावलेला पैसा नोटबंदी निर्णयाने अडकून पडला. मोदींचं हे मोठं पाप होतं. त्याने कुणाचाही फायदा झाला नाही की काळा पैसा बाहेर आला नाही. मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर प्रथम मांसबंदी, नोटबंदी व त्यानंतर लाल दिवा बंदी केली या विचित्र सरकारला आळा घातला नाही तर हे नसबंदी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.प्रास्ताविकात दत्तानाना ढमाळ म्हणाले, खंडाळ्यातील शेतकऱ््यांच्या समस्या मिटवण्यासाठी मकरंदआबांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे. जनतेची कणव असणार आमदार लाभले हे खंडाळ्याचे भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली .यावेळी असवली येथील ग्रामसचिवालय, स्व. सोनबा ढमाळ सभागृह, अंगणवाडी इमारत व साई आंगण वास्तूचे उद्घाटन तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फसवलं जातयं. अधिवेशनात अनेकदा आवाज उठवूनही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं गेलं. उत्तरप्रदेश मधील शेतकरी यांना दिसतात मग महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत काय? असा सवालही त्यांनी केला. कर्जमाफी छोटी की मोठी याचा हिशोब न मांडता महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी केवळ अल्पभूधारकच नव्हे तर सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. असे आवाहनही त्यांनी केले.

सरकार फसव्या जाहीराती करण्यात पटाईत : मकरंद पाटील

आमदार मकरंद पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारची आता उलटी गीणती सुरू झाली आहे. फक्त फसव्या जाहिरातबाजी करण्यात हे सरकार पटाईत आहे, त्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले का? उद्योजकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या सरकारला गेल्या तीन वषार्तील शेतकऱ्यांच्या समस्या का दिसत नाहीत . शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही संघषार्ला कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले .