शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भाजप सरकार म्हणजे रंग बदलणारा सरडा : धनंजय मुंडे

By admin | Updated: June 10, 2017 13:49 IST

खंडाळ्यातील शेतकरी मेळाव्यात घणाघात; कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी लढा देणार

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. १0 : भाजपाने सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत . वेळ येईल त्याप्रमाणे शब्द फिरवून जनतेची फसवणूक केली जात आहे. भाजपाचे सरकार म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे. अशी घणाघाती टीका करीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी लढा देणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले.असवली, ता . खंडाळा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कृषी सभापती मनोज पवार, तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषद सदस्य उदयदादा कबुले, दिपाली साळुंखे, शारदा ननावरे, मंगेश धुमाळ, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजपुरे, सभापती मकरंद मोटे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, नगराध्यक्ष शरद दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, शामराव गाढवे, अजय भोसले, उपसरपंच सचिन ढमाळ यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.धनंजय मुंडे पुढे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवून जनतेला फसवलं. कष्टकऱ्यांनी घाम गाळून कमावलेला पैसा नोटबंदी निर्णयाने अडकून पडला. मोदींचं हे मोठं पाप होतं. त्याने कुणाचाही फायदा झाला नाही की काळा पैसा बाहेर आला नाही. मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर प्रथम मांसबंदी, नोटबंदी व त्यानंतर लाल दिवा बंदी केली या विचित्र सरकारला आळा घातला नाही तर हे नसबंदी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.प्रास्ताविकात दत्तानाना ढमाळ म्हणाले, खंडाळ्यातील शेतकऱ््यांच्या समस्या मिटवण्यासाठी मकरंदआबांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे. जनतेची कणव असणार आमदार लाभले हे खंडाळ्याचे भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली .यावेळी असवली येथील ग्रामसचिवालय, स्व. सोनबा ढमाळ सभागृह, अंगणवाडी इमारत व साई आंगण वास्तूचे उद्घाटन तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फसवलं जातयं. अधिवेशनात अनेकदा आवाज उठवूनही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं गेलं. उत्तरप्रदेश मधील शेतकरी यांना दिसतात मग महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत काय? असा सवालही त्यांनी केला. कर्जमाफी छोटी की मोठी याचा हिशोब न मांडता महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी केवळ अल्पभूधारकच नव्हे तर सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. असे आवाहनही त्यांनी केले.

सरकार फसव्या जाहीराती करण्यात पटाईत : मकरंद पाटील

आमदार मकरंद पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारची आता उलटी गीणती सुरू झाली आहे. फक्त फसव्या जाहिरातबाजी करण्यात हे सरकार पटाईत आहे, त्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले का? उद्योजकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या सरकारला गेल्या तीन वषार्तील शेतकऱ्यांच्या समस्या का दिसत नाहीत . शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही संघषार्ला कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले .