शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘भाजप’ने पाठीत खंजीर खुपसला--गजानन किर्तीकर :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:55 IST

वाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती.

ठळक मुद्देवाई येथील जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात टीकास्त्र०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणबाजीला भुलून बळी पडून जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला. शिवसेनेने पंचवीस वर्षे मैत्रीचे नाते टिकवून ठेवल्यानेच भाजपला सत्तेत येता आले. सत्तेत येताच ‘भाजप’ने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे,’ अशी टीका शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी केली.वाई येथे सोमवारी आयोजित शिवसेनेच्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील,आमदार शंभूराज देसाई, युगंधरा साळेकर, राजेश कुंभारदरे, चंद्रकांत जाधव, हर्शल कदम, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शारदाताई जाधव, अजित यादव, हरिदास जगदाळे, अनिल शेंडे, यशवंत घाडगे, रणजितसिंह भोसले, महेश शिंदे, किरण खामकर, गणेश जाधव, योगेश चंद्रस, विवेक भोसले उपस्थित होते.किर्तीकर म्हणाले, ‘जनतेचा भाजप सरकारविषयी भ्रमनिरास झाला आहे. मोदी सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात केलेली नोटबंदी, जीएसटी कर प्रणाली हे दोन्ही निर्णय भाजपच्या अंगलट आले आहेत. यामुळे देशात महागाई वाढली. सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात भाजपविरोधी लाट असून, शिवसेनेने या ‘भाजप’विरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी संघटन मजबूत करण्याची गरज आहे. २०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘कुठे आहेत ते अच्छे दिन. महाराष्ट्रातील जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न स्वप्नच राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतील ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी शिवसेना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकºयांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असतानाही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.’विजय शिवतारे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात पाणी सिंचनाचे जलसंधारणाचे काम हे शिवसेनेनेच केले आहेत. १९९५ मध्ये युतीचे शासन असताना कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून शिवसेनेने जलसंधारणाचे शंभर टक्के प्रश्न मार्गी लावले. शिवसेनेच्या कामाचे श्रेय येथील प्रस्थापित पक्षनेते घेत आहेत.’आमदार शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वाई, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव, खंडाळा, जावळी, खटाव, फलटण तालुक्यांतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.मोदी नवसाचं बाळदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नवसाचे बाळ असून, त्याचे लाड पुरविता-पुरविता भाजपला नाकीनऊ आले आहे. लाडाच्या हट्टापायी भाजपला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.