शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यास बर्ड फ्लू अद्याप धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून, पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बर्ड फ्लू ...

सातारा : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून, पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बर्ड फ्लू रोगाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून, पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करीत आहे. तसेच जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरतूक झाल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी त्वरित माहिती पशुसंवर्धन विभागास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मांस व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून, पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.

बर्ड फ्लू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणतीही असाधारण पक्षी मरतूकबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये बँकयार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये मरतूक आढळून आली तर जबाबदार नागरिक किंवा व्यावसायिक या नात्याने तशी माहिती त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. पक्ष्यांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येऊ नये. तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही तातडीने देण्यात यावी, म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.

जिल्ह्यामध्ये १९ व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ७९ हजार ६११ इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपनाचे व्यवसायात वाढ झालेली असून, सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करून पक्ष्याच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यामधील जे व्यावसायिक पाच हजार पेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करत आहेत किंवा ५०० पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिल्ली निर्मिती करीत आहे, त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. परिहार यांनी कळविले आहे.