शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’चा पोल्ट्री व्यावसायिकांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

सातारा : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला ...

सातारा : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता बर्ड फ्लूने मोठे संकट उभे केले आहे. ग्राहक अप्‌प्रचाराला बळी पडले, तर कष्टाने सावरलेला हा व्यवसाय पुन्हा एकदा मोडून पडेल, या भीतीने पोल्ट्रीधारक हबकले आहेत.

कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळीदेखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अप्‌प्रचार झाला आणि पोल्ट्री व्यावसायिकांना जिवंत कोंबड्या गाडून टाकाव्या लागल्या, मोफत वाटाव्या लागल्या. कोरोनाने या व्यवसायाला पूर्वार्धाच्या टप्प्यात जमीनदोस्त केले तरी, उत्तरार्धात मात्र चिकन आणि अंडी खाऊनच कोरोनाशी लढता येते, असा प्रचार झाल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा स्थिरस्थावर होऊ लागला. २०१७-१८ मध्ये राज्यात बर्ड फ्लूने धिंगाणा घातला होता. अख्ख्या पोल्ट्री बंद करून पिले व कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. आता दक्षता म्हणून निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली जात आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

मायणी, येरळवाडी, कानकात्रे, सूर्याचीवाडी, नेर, दरुज, राजाचे कुर्ले, ढाकणी, पिंगळी, राजेवाडी, झाशी, आंधळी, महाबळेश्वराडी, बिचुकले, अरबवाडी, देऊर, नांदवळ, भाडळे, वीर, तांबवे, मुळीकवाडी, धोम, कण्हेर, उरमोडी, कुमठे तलाव, मांडवे तलाव, तांबवे तलाव, कृष्णा कोयना संगम, शिवसागर जलाशय, कांदटी खोरे, तापोळा, वेण्णा लेक आदी ठिकाणी नियमितपणे लक्ष आहे.

पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरू नये

जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, जर कावळे, पोपट, बगळे व स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने मृत झाल्याचे आढळल्यास त्वरित सूचना द्याव्यात. तसेच अंडी, कोंबडीचे मांस, अंडी उकडून खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. पक्षी, अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.

जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पोल्ट्रीत मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावत असतील तर सुजाण नागरिकांनी माहिती द्यावी.

- अंकुश परिहार, पशुसंवर्धन अधिकारी

११बर्ड