शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बळीराजाने केली बैलांची खांदमळणी

By admin | Updated: July 28, 2015 23:27 IST

आज बेंदूर : सणाच्या पूर्वसंध्येला खांद्याला तूप-हळदीचा लेप

जावेद खान- सातारा -वर्षभर मानेवर जू घेऊन बळीराजाबरोबर शेतात राबणाऱ्या बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. आज (बुधवार) मोठ्या धामधुमीत बेंदूर सण साजरा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची तूप व हळद लावून खांदमळणी केली. आधुनिक युगात यंत्राच्या साह्याने शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे जनावरांची संख्या घटली आहे. ग्रामीण भागात बैलजोडी पाहायला मिळते. शेतकऱ्यांबरोबर शेतात नांगरणी, पेरणी, अशी कष्टाची कामे करणाऱ्या बैलांसाठी बेंदूर हा सजण्याचा व मिरविण्याचा दिवस. आपल्या खांद्यावर बोजड अवजारे घेऊन बैल शेतात राबतो. म्हणून बेंदराच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची खांदमळणी करतात. बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून तूप व हळद लावून मालीश केली जाते. त्यानंतर गरम पाण्याने पाय शेकले जातात. सायंकाळी त्यांना कणखीचे गोळे, उकडलेली बाजरी, गूळ, पेंड असा खुराक दिला जातो. तसेच सणाला रुबाब वाढावा म्हणून बैलांना सजविले जाते. शिंगांना बेगडी कागद, अंगावर विविध प्रकारचे रंगीत छाप उमटविले जातात. शिंगांना फुगे बांधले जातात. त्यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. शेतकरीही पुजतोय मातीचे बैल!आधुनिक शेतीचा परिणाम : गावोगावी बैलांची संख्या घटलीगुलाब पठाण ल्ल किडगावआषाढी एकादशी संपताच शेतकऱ्यांबरोबरच चिमुकल्यांना वेध लागतात ते बेंदूर सणाचे. मात्र, आधुनिक काळात गावोगावच्या बैलांची संख्या घटल्याचे दिसत असून ‘सर्जा-राजा’ची जागा आता टॅक्टरने घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता मातीचे बैल पुजावे लागत आहेत.पूर्वी गावाकडे प्रत्येकाच्या दावणीला बैलजोडी असायची. मात्र, बागायत शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे झटपट पैसा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीची पिके घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत चालला आहे. त्यामुळे प्रगतशील शेतकरी बैलांऐवजी आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करू लागला आहे. बेंदूर सणाला पूर्वी बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणू काढली जायची. दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात व्हायची. आता चिमुकल्यांना मातीच्या बैलांना रंग देऊन त्यांची घरातच पूजा करण्यात समाधान मानावे लागत आहे. आता कुठे फारशा बैलगाड्याही पाहायला मिळत नाहीत. आधुनिक शेतीच्या काळात मात्र ‘सर्जा-राजा’ची जोडी दिसेनाशी झाली आहे. म्हणे बैलांना काम उरले नाही...ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे झटपट होतात. बैल घ्यायचा म्हणजे त्याची किंमत पन्नास हजारांच्या घरात असते. शिवाय त्याला पोसण्याचा खर्च मोठा आहे. वर्षभर पेंड, कडबा यासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. आता बागायती शेती असल्यामुळे बैलांना फारसे काम उरले नाही. वर्षातून पंधरा दिवस औताला जुंपले जाते. त्यामुळे वर्षभर बैल बांधून पोसण्यापेक्षा शेतकरी ट्रॅक्टर घेणे पसंत करत आहेत.