शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बळीराजाने केली बैलांची खांदमळणी

By admin | Updated: July 28, 2015 23:27 IST

आज बेंदूर : सणाच्या पूर्वसंध्येला खांद्याला तूप-हळदीचा लेप

जावेद खान- सातारा -वर्षभर मानेवर जू घेऊन बळीराजाबरोबर शेतात राबणाऱ्या बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. आज (बुधवार) मोठ्या धामधुमीत बेंदूर सण साजरा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची तूप व हळद लावून खांदमळणी केली. आधुनिक युगात यंत्राच्या साह्याने शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे जनावरांची संख्या घटली आहे. ग्रामीण भागात बैलजोडी पाहायला मिळते. शेतकऱ्यांबरोबर शेतात नांगरणी, पेरणी, अशी कष्टाची कामे करणाऱ्या बैलांसाठी बेंदूर हा सजण्याचा व मिरविण्याचा दिवस. आपल्या खांद्यावर बोजड अवजारे घेऊन बैल शेतात राबतो. म्हणून बेंदराच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची खांदमळणी करतात. बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून तूप व हळद लावून मालीश केली जाते. त्यानंतर गरम पाण्याने पाय शेकले जातात. सायंकाळी त्यांना कणखीचे गोळे, उकडलेली बाजरी, गूळ, पेंड असा खुराक दिला जातो. तसेच सणाला रुबाब वाढावा म्हणून बैलांना सजविले जाते. शिंगांना बेगडी कागद, अंगावर विविध प्रकारचे रंगीत छाप उमटविले जातात. शिंगांना फुगे बांधले जातात. त्यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. शेतकरीही पुजतोय मातीचे बैल!आधुनिक शेतीचा परिणाम : गावोगावी बैलांची संख्या घटलीगुलाब पठाण ल्ल किडगावआषाढी एकादशी संपताच शेतकऱ्यांबरोबरच चिमुकल्यांना वेध लागतात ते बेंदूर सणाचे. मात्र, आधुनिक काळात गावोगावच्या बैलांची संख्या घटल्याचे दिसत असून ‘सर्जा-राजा’ची जागा आता टॅक्टरने घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता मातीचे बैल पुजावे लागत आहेत.पूर्वी गावाकडे प्रत्येकाच्या दावणीला बैलजोडी असायची. मात्र, बागायत शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे झटपट पैसा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीची पिके घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत चालला आहे. त्यामुळे प्रगतशील शेतकरी बैलांऐवजी आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करू लागला आहे. बेंदूर सणाला पूर्वी बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणू काढली जायची. दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात व्हायची. आता चिमुकल्यांना मातीच्या बैलांना रंग देऊन त्यांची घरातच पूजा करण्यात समाधान मानावे लागत आहे. आता कुठे फारशा बैलगाड्याही पाहायला मिळत नाहीत. आधुनिक शेतीच्या काळात मात्र ‘सर्जा-राजा’ची जोडी दिसेनाशी झाली आहे. म्हणे बैलांना काम उरले नाही...ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे झटपट होतात. बैल घ्यायचा म्हणजे त्याची किंमत पन्नास हजारांच्या घरात असते. शिवाय त्याला पोसण्याचा खर्च मोठा आहे. वर्षभर पेंड, कडबा यासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. आता बागायती शेती असल्यामुळे बैलांना फारसे काम उरले नाही. वर्षातून पंधरा दिवस औताला जुंपले जाते. त्यामुळे वर्षभर बैल बांधून पोसण्यापेक्षा शेतकरी ट्रॅक्टर घेणे पसंत करत आहेत.