शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

बळीराजाने केली बैलांची खांदमळणी

By admin | Updated: July 28, 2015 23:27 IST

आज बेंदूर : सणाच्या पूर्वसंध्येला खांद्याला तूप-हळदीचा लेप

जावेद खान- सातारा -वर्षभर मानेवर जू घेऊन बळीराजाबरोबर शेतात राबणाऱ्या बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. आज (बुधवार) मोठ्या धामधुमीत बेंदूर सण साजरा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची तूप व हळद लावून खांदमळणी केली. आधुनिक युगात यंत्राच्या साह्याने शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे जनावरांची संख्या घटली आहे. ग्रामीण भागात बैलजोडी पाहायला मिळते. शेतकऱ्यांबरोबर शेतात नांगरणी, पेरणी, अशी कष्टाची कामे करणाऱ्या बैलांसाठी बेंदूर हा सजण्याचा व मिरविण्याचा दिवस. आपल्या खांद्यावर बोजड अवजारे घेऊन बैल शेतात राबतो. म्हणून बेंदराच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची खांदमळणी करतात. बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून तूप व हळद लावून मालीश केली जाते. त्यानंतर गरम पाण्याने पाय शेकले जातात. सायंकाळी त्यांना कणखीचे गोळे, उकडलेली बाजरी, गूळ, पेंड असा खुराक दिला जातो. तसेच सणाला रुबाब वाढावा म्हणून बैलांना सजविले जाते. शिंगांना बेगडी कागद, अंगावर विविध प्रकारचे रंगीत छाप उमटविले जातात. शिंगांना फुगे बांधले जातात. त्यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. शेतकरीही पुजतोय मातीचे बैल!आधुनिक शेतीचा परिणाम : गावोगावी बैलांची संख्या घटलीगुलाब पठाण ल्ल किडगावआषाढी एकादशी संपताच शेतकऱ्यांबरोबरच चिमुकल्यांना वेध लागतात ते बेंदूर सणाचे. मात्र, आधुनिक काळात गावोगावच्या बैलांची संख्या घटल्याचे दिसत असून ‘सर्जा-राजा’ची जागा आता टॅक्टरने घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता मातीचे बैल पुजावे लागत आहेत.पूर्वी गावाकडे प्रत्येकाच्या दावणीला बैलजोडी असायची. मात्र, बागायत शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे झटपट पैसा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीची पिके घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत चालला आहे. त्यामुळे प्रगतशील शेतकरी बैलांऐवजी आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करू लागला आहे. बेंदूर सणाला पूर्वी बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणू काढली जायची. दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात व्हायची. आता चिमुकल्यांना मातीच्या बैलांना रंग देऊन त्यांची घरातच पूजा करण्यात समाधान मानावे लागत आहे. आता कुठे फारशा बैलगाड्याही पाहायला मिळत नाहीत. आधुनिक शेतीच्या काळात मात्र ‘सर्जा-राजा’ची जोडी दिसेनाशी झाली आहे. म्हणे बैलांना काम उरले नाही...ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे झटपट होतात. बैल घ्यायचा म्हणजे त्याची किंमत पन्नास हजारांच्या घरात असते. शिवाय त्याला पोसण्याचा खर्च मोठा आहे. वर्षभर पेंड, कडबा यासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. आता बागायती शेती असल्यामुळे बैलांना फारसे काम उरले नाही. वर्षातून पंधरा दिवस औताला जुंपले जाते. त्यामुळे वर्षभर बैल बांधून पोसण्यापेक्षा शेतकरी ट्रॅक्टर घेणे पसंत करत आहेत.