शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

रिसवडला रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

सुर्लीचा घाट धोकादायक कऱ्हाड : ओगलेवाडी ते सुर्ली घाटापर्यंत रस्त्याला अनेक वळणे आहेत. या धोकादायक वळणांमुळेच अपघात होत असून, ...

सुर्लीचा घाट धोकादायक

कऱ्हाड : ओगलेवाडी ते सुर्ली घाटापर्यंत रस्त्याला अनेक वळणे आहेत. या धोकादायक वळणांमुळेच अपघात होत असून, संबंधित ठिकाणी धोक्याची सूचना असणाऱ्या फलकांकडे रात्रीच्यावेळी लक्ष न गेल्यास वाहनचालकांचे अपघात होत आहेत. ओगलेवाडी ते सुर्ली मार्गावरच राजमाची गाव आहे. या गावानजीकच अनेक धोकादायक वळणे आहेत. या वळणावर अनेकजण वेगात वाहने चालवितात. अशात गाडीचा वेग नियंत्रित न झाल्याने अपघात घडत आहेत. तसेच हा रस्ता अरुंद व वळणाचा असल्याने जड वाहनांचा प्रवास धोक्याचा बनला आहे. मात्र, ही वाहनेही वेगाने चालविली जात असल्याचे दिसून येत आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात

पाटण : शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावरील टोळेवाडी, घेरा दातेगड अशी अनेक गावे वसलेली आहेत. या गावांतील ग्रामस्थांना सध्या जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी डोंगर फोडून तयार केलेल्या या मार्गावर दरड कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. रस्त्याच्या कडेला खोल दरी असून, येथून प्रवास करणे नागरिकांना धोकादायक बनले आहे.

वन्य प्राण्यांचा वावर

तांबवे : किरपे, तांबवे, येणके परिसरात सायाळासह वन्यप्राण्याचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. भुईमूग पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

नागरिकांचा जीव मुठीत

कऱ्हाड : पुणे-बंगलोर महामार्गावर पाटण तिकाटणे येथे तिन्ही-चारही बाजूने एकत्रित रस्ता येत असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी छोटी-मोठी वाहने धडकून किरकोळ अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी या ठिकाणी सायंकाळनंतर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. दिवसाही या ठिकाणाहून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे.

पाणीपातळी खालावली

कार्वे : कऱ्हाड तालुक्यात कार्वे परिसरातील कोरेगाव, टेंभू, वडगाव हवेली, शेणोली शिवारातील डोंगरी विभागात विहिरीचे पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी कमी असल्यामुळे विभागातील बागायती पीक क्षेत्रास पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अपुऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना यंदा शेती उत्पादनात घट होण्याची चिंता निर्माण झाली आहे. शेतीला पाणी प्रमाणात उपलब्ध असेल तरच शेती उत्पादन मिळण्यास मदत होते.

उन्हाचा तडाखा वाढला

कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वाढलेल्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच चटका बसत आहे. यावेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. या तापलेल्या वातावरणाचा त्रास शेतकरी, नागरिकांना होताना दिसत आहे.

श्वानांचा उपद्रव वाढला

तांबवे : विजयनगरसह परिसरात मोठ्या संख्येने मोकाट श्वानांचा वावर आहे. त्याचा गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ, तसेच दुचाकीस्वारांतून होत आहे.