शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

भोसलेंच्या ‘सहकार पॅनेल’ने फुंकले रणशिंग

By admin | Updated: March 30, 2015 00:19 IST

कृष्णा कारखाना : किल्ले मच्छिंद्रगडावर प्रचार व सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ

कऱ्हाड : येडेमच्छिंद्र, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने रविवारपासून प्रचाराचे रणशिंग फुंकले. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते किल्ले मच्छिंद्रगडावर मच्छिंद्रनाथाला नारळ वाढवून आणि येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा आणि सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सहकार महर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या काळात कृष्णा कारखान्याला लाभलेला वैभवशाली काळ पुन्हा आणण्यासाठी सर्व सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन केले. सकाळी दहाच्या सुमारास डॉ. सुरेश भोसले यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत किल्ले मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथाची विधिवत पूजा केली. त्यानंतर येडेमच्छिंद्र येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याला स्थैर्य प्राप्त करून दिले होते. त्यांच्या काळात त्यांनी केवळ कारखान्याचाच विकास केला नाही, तर भागाचे आणि सभासदांच्या प्रगतीलाही चालना दिली. हाच वैभवाचा काळ पुन्हा आणण्यासाठी आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.’ ‘सहकारात राजकारण बाजूला ठेवून आपण कार्यरत राहिलो तर सहकाराचा विकास होतोच; पण कारखान्यात १९८९ नंतर राजकारणाचा शिरकाव झाल्याने कारखान्याची पत हळूहळू ढासळत गेली. केवळ साखरेवर कारखानदारी चालणार नाही, तर उपउत्पादनेही घेण्याची गरज आहे, याचे महत्त्व जयवंतराव भोसलेंनी ओळखले होते. ज्या कारखान्याकडे वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, याशिवाय डिस्टिलरी, इथेनॉलनिर्मिती करण्याची क्षमता आहे. तेथील शेतकरी सभासदांना मोठा मोबदला देणे शक्य आहे. कृष्णा कारखान्याच्या या जमेच्या बाजू असूनही गेल्या दहा वर्षांत याबाबत योग्य तऱ्हेचा विचार व कृती न झाल्याने सभासदांचे हित दुर्लक्षिले जात आहे. सभासदांचे हित महत्त्वाचे मानल्याने आम्ही सत्ता नसताना कधीच कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठीच प्रयत्न केले. येत्या निवडणुकीत आम्ही उमेदवार निवडीची जबाबदारी गावांवर सोपविली आहे. गावाने एकीने दिलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देणार आहोत.’माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांतील कारखान्याची वाटचाल पाहता यंदा बदल निश्चित आहे. आपल्याला स्वार्थासाठी पाच वर्षे निवडणून येणारे लोक आता सत्तेवर नको आहेत, तर ज्या जयवंतराव भोसलेंनी ३०-३५ वर्षे कारखान्याला भरभराटीचा काळ दिला, अशा विचारांना आता आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. ’ बी. जी. पाटील म्हणाले, ‘सहकारासाठी जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याच्या रूपाने उभारलेल्या या स्मारकाला पुन्हा वैभवाचा काळ आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.’तांबवे येथील एल. एम. पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांच्या काळात कारखान्याच्या संचालक मंडळापासून अन्य बैठकांच्या नियोजनाचे काम हे बाह्यशक्तीच्या माध्यमातून झाले आहे. विद्यमान अध्यक्ष दुसऱ्याच्या सल्ल्याने काम करत असल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था कारखान्याची झाली आहे.’ माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, बाबासाहेब शिंंदे, श्रीरंग देसाई, पैलवान अप्पासाहेब कदम, दादासाहेब रसाळ यांचीही भाषणे झाली. यावेळी अप्पा नेर्लेकर, सर्जेराव पाटील, महिपतराव पाटील, एम. के. कापूरकर, सरपंच संजय पाटील, दयानंद पाटील, डॉ. राजेंद्र पवार, आनंदराव मोहिते, संजय पवार, संदीप मोहिते, बापूराव पवार, दामाजी मोरे, जगदीश पाटील, हणमंतराव पाटील, निवास पवार, बाळासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते आणि सहकार पॅनेल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)