शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच्या आमिषाने चार लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:25 IST

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार ...

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार काटकर याच्यासमवेत ओळख झाली, त्याने ‘दहिवडी येथे करिअर अ‍ॅकॅडमी चालवत असून, सैन्य दलामध्ये मुलांना भरती करतो,’ असे सांगितले. कदम यांनी चुलत बंधू राजेंद्र हरिश्चंद्र कदम यांना काटकर याची ओळख सांगत, तो सैन्य दलामध्ये मुलांना भरती करत असल्याचे सांगितले. राजेंद्र यांना मुलगा निरंजन याला सैन्य दलात भरती करावयाचे असल्याने त्यांनी घरात सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजकुमार काटकर हा नीता डोंबे हिला बरोबर घेऊन बोरजाईवाडीत आला.तेथे सविस्तर चर्चा झाल्यानंतर काटकर याने निरंजन याला सैन्य दलात भरतीसाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये आणि कॉल लेटर आल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे राजेंद्र कदम यांनी बँक आॅफ महाराष्टÑ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रक्कम काढून काटकर याच्याकडे दोन लाख रुपये दिले.त्यानंतर काटकर याने वारंवार पैशांसाठी तगादा लावला. मात्र कॉल लेटर आल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे कदम यांनी सांगताच, दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी काटकर व डोंबे यांनी राजेंद्र कदम व निरंजन कदम यांना तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील एमसीई, एमई येथील प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. तेथे आण्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने १५ दिवसांत कॉल लेटर येईल, असे सांगितले. त्यानंतर दि. १५ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान काटकर याने बोरजाईवाडीत येऊन निरंजन याला प्रशिक्षणाला पाठवायचे आहे, असे सांगितले. राजेंद्र कदम यांनी सोसायटीतून कर्ज काढून १ लाख रुपये आणि मेहुणे नितीन पवार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. दोन लाख रुपये त्यांनी काटकर याला दिले. त्यानंतर काटकर हा परत आलाच नाही.मोबाईल कॉल घेणेही बंदत्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून सैन्य भरतीबाबत विचारणा केल्यावर ‘तुमचे काम लवकरच होणार आहे,’ असे तो सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल घेणे बंद केले.