शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

भरतीच्या आमिषाने चार लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:25 IST

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार ...

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार काटकर याच्यासमवेत ओळख झाली, त्याने ‘दहिवडी येथे करिअर अ‍ॅकॅडमी चालवत असून, सैन्य दलामध्ये मुलांना भरती करतो,’ असे सांगितले. कदम यांनी चुलत बंधू राजेंद्र हरिश्चंद्र कदम यांना काटकर याची ओळख सांगत, तो सैन्य दलामध्ये मुलांना भरती करत असल्याचे सांगितले. राजेंद्र यांना मुलगा निरंजन याला सैन्य दलात भरती करावयाचे असल्याने त्यांनी घरात सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजकुमार काटकर हा नीता डोंबे हिला बरोबर घेऊन बोरजाईवाडीत आला.तेथे सविस्तर चर्चा झाल्यानंतर काटकर याने निरंजन याला सैन्य दलात भरतीसाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये आणि कॉल लेटर आल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे राजेंद्र कदम यांनी बँक आॅफ महाराष्टÑ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रक्कम काढून काटकर याच्याकडे दोन लाख रुपये दिले.त्यानंतर काटकर याने वारंवार पैशांसाठी तगादा लावला. मात्र कॉल लेटर आल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे कदम यांनी सांगताच, दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी काटकर व डोंबे यांनी राजेंद्र कदम व निरंजन कदम यांना तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील एमसीई, एमई येथील प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. तेथे आण्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने १५ दिवसांत कॉल लेटर येईल, असे सांगितले. त्यानंतर दि. १५ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान काटकर याने बोरजाईवाडीत येऊन निरंजन याला प्रशिक्षणाला पाठवायचे आहे, असे सांगितले. राजेंद्र कदम यांनी सोसायटीतून कर्ज काढून १ लाख रुपये आणि मेहुणे नितीन पवार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. दोन लाख रुपये त्यांनी काटकर याला दिले. त्यानंतर काटकर हा परत आलाच नाही.मोबाईल कॉल घेणेही बंदत्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून सैन्य भरतीबाबत विचारणा केल्यावर ‘तुमचे काम लवकरच होणार आहे,’ असे तो सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल घेणे बंद केले.