शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

सत्तेच्या साठमारीत राज्यातील सत्तापिपासू गुंतले; भारत पाटणकर आमरण उपोषणाचा संघर्ष आता २७ जुलैपासून सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 22:33 IST

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

पाटण : ‘सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही, त्यामुळे आम्ही या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून पुढील लढ्याला सुरुवात करणार आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात कुठलाही लढा चालू असला तरी सत्तेत असलेले व नवीन गेलेल्यांत मंत्रिपदासाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे. राज्याच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते, इतके भयंकर कधी घडले नव्हते, गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. जनतेशी त्यांना देणे घेणे नाही, असे दिसते आहे. अशा परिस्थितीमुळे दि. १९ जुलैपासून सुरू होणारे धरणग्रस्तांचे उपोषण दहा दिवस पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार असून, त्यास व्यापक स्वरूप देणार आहे. या उपोषणास कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या प्रकल्पातील सुमारे दोन हजार धरणग्रस्त सहभागी होणार आहेत.

कोयना धरण उच्चस्तरीय समितीच्या बैठकीच्या अगोदरच जमिनी पसंती सांगली व सातारा जिल्ह्यांत झाल्या आहेत, अशा सुमारे आठशेच्या दरम्यान खातेदारांनी अर्ज केले आहेत, त्याचे पुढे काय करणार? असा सवाल डॉ पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेस श्रमुदचे संतोष गोटल, सचिन कदम, सीताराम पवार, प्रवीण साळुंखे, परशुराम शिर्के, शिवाजी कांबळे, किसन सुतार, अनिल देवरुखकर, विठ्ठल पवार, तानाजी बेबले, आनंदा सपकाळ, गुलाब काटे, रमेश शिंदे, बाजीराव पन्हाळकर, दादू थोरवडे, विनायक शेलार, गंगाराम झोरे, कमल कदम, लक्ष्मण शेलार, जयवंत लाड, साधू सपकाळ, बळीराम लांबोर, संतोष कदम, आनंदा साळुंखे, अशोक माने, सुरेश थोरवडे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?कोयनेतील आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील या लोकप्रतिनिधींना भेटावयास वेळ मिळाला नाही, जे आले त्यांनी फक्त भेटी दिल्या, मग आम्ही तुमच्यासोबत कसे वागायचे ते सांगा? आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?, का तुम्ही निमंत्रणाशिवाय येणार नाही, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.