शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्तेच्या साठमारीत राज्यातील सत्तापिपासू गुंतले; भारत पाटणकर आमरण उपोषणाचा संघर्ष आता २७ जुलैपासून सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 22:33 IST

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

पाटण : ‘सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही, त्यामुळे आम्ही या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून पुढील लढ्याला सुरुवात करणार आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात कुठलाही लढा चालू असला तरी सत्तेत असलेले व नवीन गेलेल्यांत मंत्रिपदासाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे. राज्याच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते, इतके भयंकर कधी घडले नव्हते, गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. जनतेशी त्यांना देणे घेणे नाही, असे दिसते आहे. अशा परिस्थितीमुळे दि. १९ जुलैपासून सुरू होणारे धरणग्रस्तांचे उपोषण दहा दिवस पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार असून, त्यास व्यापक स्वरूप देणार आहे. या उपोषणास कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या प्रकल्पातील सुमारे दोन हजार धरणग्रस्त सहभागी होणार आहेत.

कोयना धरण उच्चस्तरीय समितीच्या बैठकीच्या अगोदरच जमिनी पसंती सांगली व सातारा जिल्ह्यांत झाल्या आहेत, अशा सुमारे आठशेच्या दरम्यान खातेदारांनी अर्ज केले आहेत, त्याचे पुढे काय करणार? असा सवाल डॉ पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेस श्रमुदचे संतोष गोटल, सचिन कदम, सीताराम पवार, प्रवीण साळुंखे, परशुराम शिर्के, शिवाजी कांबळे, किसन सुतार, अनिल देवरुखकर, विठ्ठल पवार, तानाजी बेबले, आनंदा सपकाळ, गुलाब काटे, रमेश शिंदे, बाजीराव पन्हाळकर, दादू थोरवडे, विनायक शेलार, गंगाराम झोरे, कमल कदम, लक्ष्मण शेलार, जयवंत लाड, साधू सपकाळ, बळीराम लांबोर, संतोष कदम, आनंदा साळुंखे, अशोक माने, सुरेश थोरवडे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?कोयनेतील आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील या लोकप्रतिनिधींना भेटावयास वेळ मिळाला नाही, जे आले त्यांनी फक्त भेटी दिल्या, मग आम्ही तुमच्यासोबत कसे वागायचे ते सांगा? आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?, का तुम्ही निमंत्रणाशिवाय येणार नाही, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.