शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भगीरथ प्रयत्नांचा अजिंक्यतारा पॅटर्न!

By admin | Updated: January 9, 2015 00:04 IST

नियमित श्रमदान : जलसंधारणाची मोठी कामे

सागर गुजर- सातारा -राजा भोजच्या काळापासून सातारकरांची शान म्हणून डौलाने उभा असणारा अजिंक्यतारा दुर्लक्षाचे दुखणे सोसत होता. डोंगरावर असणाऱ्या नऊ तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साठते; पण गळतीमुळे हे पाणी जास्त काळ साठून राहत नव्हते. गाजरगवताने वेढलेला किल्ल्याचा माथा बकाल आणि उदास दिसत होता. मात्र, येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील प्रतिष्ठित मंडळींच्या गु्रपने किल्ल्याचा कायापालट केला आहे. त्यांच्याच भगिरथ प्रयत्नांतून जलसंधारणाची मोठी कामे अजिंक्यताऱ्यावर झाली.अजिंक्यतारा किल्ल्यावरील दूरदर्शन, आकाशवाणीचे टॉवर, बीएसएनलचा टॉवर येथे वर्दळ असायची तर ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षाच्या फेऱ्यात सापडली होती. गाजर गवताने माजलेल्या या परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या वावड्या अधून-मधून उठतात. किल्ल्याची ही बकाल अवस्था दूर करण्याचा मनोदय डॉ. पोळ यांनी किल्ल्यावर व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांजवळ व्यक्त केला. किल्ल्यावर काय कामे करता येतील? याचा आराखडा त्यांनी मांडला. या आराखड्यानुसार कामाला सुरुवात झाली. सर्वात प्रथम गडावरील तळ्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. या तळ्यांमध्ये गाळ साठलेला होता. मोठाले दगड या तळ्यात पडले होते. किल्ल्यावरील पाणी व्यवस्था सुधारण्याची कामे या गु्रपतर्फे हाती घेण्यात आली. मंगळाई देवीच्या मंदिरानजीक असणाऱ्या सलग तळ्यांतील गाळ व दगड काढण्याची कामे सर्वप्रथम हाती घेण्यात आली. डॉ. पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी अजिंक्यताऱ्यावरील तळ्यांमधील गाळ काढून त्यातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून तळ्यांच्या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी ३६ लाख रुपये खर्चून तळ्याातील गाळ काढून गळती काढण्यात आली. दोन पुलांच्या मध्ये एक पूल तयार करण्यात आला. पर्यटकांसाठी ही आकर्षक अशी पर्वणी ठरली; परंतु तळ्यांमध्ये मोठा पाणीसाठा झाला आहे. पावसाळा संपून चार महिने उलटले असले तरीही अद्याप या तळ्यांमध्ये पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. ‘हरिओम’ ने मिळते प्रेरणा किल्ल्यावर श्रमदानासाठी जाणारा या गु्रपचा ‘हरिओम’ हा कोडवर्ड आहे. याचा उच्चार करताच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा जागृत होते. कष्टकरी हातही डॉक्टर, इंजिनिअर्स अशा वेलसेटेड मंडळींचे आहेत. जलक्रांतीचं त्यांनी पाहिलेले स्वप्न ते सत्यात उतरवत आहेत.