शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

भगीरथ प्रयत्नांचा अजिंक्यतारा पॅटर्न!

By admin | Updated: January 9, 2015 00:04 IST

नियमित श्रमदान : जलसंधारणाची मोठी कामे

सागर गुजर- सातारा -राजा भोजच्या काळापासून सातारकरांची शान म्हणून डौलाने उभा असणारा अजिंक्यतारा दुर्लक्षाचे दुखणे सोसत होता. डोंगरावर असणाऱ्या नऊ तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साठते; पण गळतीमुळे हे पाणी जास्त काळ साठून राहत नव्हते. गाजरगवताने वेढलेला किल्ल्याचा माथा बकाल आणि उदास दिसत होता. मात्र, येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील प्रतिष्ठित मंडळींच्या गु्रपने किल्ल्याचा कायापालट केला आहे. त्यांच्याच भगिरथ प्रयत्नांतून जलसंधारणाची मोठी कामे अजिंक्यताऱ्यावर झाली.अजिंक्यतारा किल्ल्यावरील दूरदर्शन, आकाशवाणीचे टॉवर, बीएसएनलचा टॉवर येथे वर्दळ असायची तर ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षाच्या फेऱ्यात सापडली होती. गाजर गवताने माजलेल्या या परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या वावड्या अधून-मधून उठतात. किल्ल्याची ही बकाल अवस्था दूर करण्याचा मनोदय डॉ. पोळ यांनी किल्ल्यावर व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांजवळ व्यक्त केला. किल्ल्यावर काय कामे करता येतील? याचा आराखडा त्यांनी मांडला. या आराखड्यानुसार कामाला सुरुवात झाली. सर्वात प्रथम गडावरील तळ्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. या तळ्यांमध्ये गाळ साठलेला होता. मोठाले दगड या तळ्यात पडले होते. किल्ल्यावरील पाणी व्यवस्था सुधारण्याची कामे या गु्रपतर्फे हाती घेण्यात आली. मंगळाई देवीच्या मंदिरानजीक असणाऱ्या सलग तळ्यांतील गाळ व दगड काढण्याची कामे सर्वप्रथम हाती घेण्यात आली. डॉ. पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी अजिंक्यताऱ्यावरील तळ्यांमधील गाळ काढून त्यातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून तळ्यांच्या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी ३६ लाख रुपये खर्चून तळ्याातील गाळ काढून गळती काढण्यात आली. दोन पुलांच्या मध्ये एक पूल तयार करण्यात आला. पर्यटकांसाठी ही आकर्षक अशी पर्वणी ठरली; परंतु तळ्यांमध्ये मोठा पाणीसाठा झाला आहे. पावसाळा संपून चार महिने उलटले असले तरीही अद्याप या तळ्यांमध्ये पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. ‘हरिओम’ ने मिळते प्रेरणा किल्ल्यावर श्रमदानासाठी जाणारा या गु्रपचा ‘हरिओम’ हा कोडवर्ड आहे. याचा उच्चार करताच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा जागृत होते. कष्टकरी हातही डॉक्टर, इंजिनिअर्स अशा वेलसेटेड मंडळींचे आहेत. जलक्रांतीचं त्यांनी पाहिलेले स्वप्न ते सत्यात उतरवत आहेत.