शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

लावला ‘भंडारा’... अन् फिरला वारा !--सातारनामा

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

वाईत आवई : फलटण फिक्स; पण ‘माण-खटावात कोण रेऽऽ भाऊ?’

सातारा : ‘राम-लक्ष्मण’ जोडीनं कैक वर्षे जिल्ह्याचं राजकारण स्वत:च्या ताब्यात ठेवलं. ‘पाडापाडी’च्या राजकारणात मशहूर असलेल्या या जोडीला, यंदा मात्र आपलीच माणसं निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणूनच ‘फलटणचा निकाल स्पष्ट’; पण वाईमध्ये ‘हातातल्या घड्याळा’चं भवितव्य खंडाळ्यातल्या भंडाऱ्यावर अवलंबून. असाच प्रकार ‘माण-खटाव’मध्येही !दुष्काळी माण-खटावात ‘जयाभाव’ नं किती पाणी आणलं, माहीत नाही; पण इथं यंदा ‘पैशाचा पाऊस’ अन् ‘मतांचा महापूर’ दिसला. सुरुवातीला ‘गोरे’ की ‘पोळ’ अशी चर्चा होती, शेवटच्या टप्प्यात मात्र ‘कोणता भाऊ’ हाच सवाल विचारला गेला. ‘जयाभाव’नं आणलेल्या पाण्यापेक्षाही मुंडे-जानकरांची भावनिक साद ‘छोट्या भावा’साठी ‘लई भारीऽऽ’ ठरली. इथं ‘भंडारा’ गावोगावात चालला. सर्वात धक्कादायक म्हणजे, मायणीसारख्या गावातही मोठ्या आवडीनं ‘कपबशी’तून ‘मोदींचा चहा’ पिला गेला. ‘गुदगेंचं तात्याप्रेम’ (की जयाभाव द्वेष?) काही त्यांच्याच लोकांना पचनी पडलं नाही म्हणे. वडूज-दहीवडीत ‘जयाभाऊंचा हात’ दिसला असला तरी म्हसवडसह बाकीच्या वाड्या-वस्त्यांमध्ये म्हणे ‘कपबशी’चा खणखणाट. खटाव तालुक्यात ‘हरणाई’चा भोंगा चांगला वाजला. आता विषय इतकाच की, खटावचे ‘भैय्या’ किती मतं खातात, यावरच माणच्या दोन ‘भाऊं’ंचा निकाल अवलंबून. अजितदादा किंवा रामराजे मोगराळे घाट चढून वर आले असते तर कदाचित ‘घडाळ्याचे काटे’ अधिक गतीनं फिरले असते.फलटणमध्ये मात्र परिस्थिती एकदम वेगळी. लोकसभेपासून अत्यंत आक्रमक बनलेली ‘रणजित-दिगंबर’ जोडी ऐन विधानसभेला चिडीचूप का झाली, याचं उत्तर साऱ्यांसाठीच आकलनापलीकडं. कोणताही ‘शेतकरी’ परगावी जाताना पॅसेंजरचंच तिकीट काढतो; पण इथं या ‘स्वाभिमानी’ पठ्ठ्यानं म्हणे ‘अर्धा पेटी’चं ‘कन्फर्म तिकीट’ खरेदी केलं; अन् नंतर पुन्हा भरकटत गेलेली ‘बाबा एक्स्प्रेस’च पकडलेली. ‘तिकीट फेल’ गेल्याचं दु:ख जास्त की ‘गाडी’ चुकल्याचा पश्चाताप, हे आदरणीय दिगंबरावांनाच ठावूक. ट्रक भरून साड्या काय अन् टँकर भरून पाणी काय... सारंच मुसळ केरात गेल्याची रूखरूख लागलीय रावऽऽ.असो, लोकसभेत शिट्टी वाजल्यापासून शांत बसलेल्या रामराजेंचा खरा अवतार पुन्हा दिसून आला. ‘पोपट, चिमण्या अन् घुबडां’चा खेळ रंगविणारे ‘प्राध्यापक’ महाशयच पुन्हा एकदा फलटणचे ‘रिंगमास्टर’ ठरले... पण ‘पाटणमधल्या पोपटां’चं अन् कऱ्हाडातल्या ‘प्रिन्सिपल’बाबांचं काय? ‘दक्षिण’ खिंड लढविण्यासाठी किती हुशारीनं ‘उत्तरेचा बळी’ कसा दिला गेला? वाचायलाच हवं, पण उद्याच्या अंकात! (क्रमश:)वाईत मदनदादा पाच वर्षे आमदार नव्हते. कारखान्यातूनही बाहेर कधी पडत नव्हते. (असं ‘आबा’ म्हणतात, आम्ही नव्हे!) यंदा निवडणुकीला ते उभं राहणार की नाही, हे महिन्यापूर्वी ठरत नव्हतं. ठरलं तेव्हा पक्ष कोणता असेल, हे कार्यकर्त्यांना ठावूक नव्हतं. अगदी उमेदवारी फॉर्म भरेपर्यंत सारेच अंधारात होते. अशा वातावरणात मकरंद आबांचं फावलं. बावळेकरांचंही भागलं. अर्ज माघारीपूर्वीच गावोगावच्या पारावर म्हणे, ‘आबांच्या लीड’ पन्नास हजारांवर पोहोचला... पण, मदनदादा भलतेच वस्ताद निघाले. आबांना बेसावध ठेवून त्यांनी शेवटच्या क्षणाला ‘गनिमी कावा’ केला. आबांची एकेक माणसं फोडून ते त्यांच्याच पट्ट्यात घुसले. फुटलेला माणूस पुन्हा परत आणण्यातच आबांची शक्ती खर्ची झाली. झेड्पीमुळं आबांचा ‘लोणंद गटाचा आनंद’ हिरावला गेला. गावा-गावांतील गटातटांचाही फायदा दादांनी पुरेपूर उचलला. सुरुवातीला अत्यंत किरकोळीत काढल्या गेलेल्या घटकांचाही ‘इगो’ जागा झाला. (उद्या ‘बावधन’मधला आकडा फुटल्यानंतर या वाक्याचा अर्थ लक्षात येईलच!) थोडक्यात, शेवटच्या टप्प्यात मदनदादा अकस्मात आक्रमक झाल्यानं चकित झालेल्या मकरंद आबांना आपली बरीच समीकरणं बदलावी लागली. अशातच ‘महाबळेश्वरचा एक गठ्ठा’ बावळेकरांच्या खिशात पडला; तर ‘खंडाळ्यात भंडारा’ लावला गेल्यानं पुरुषोत्तमांचं ‘कमळ’ बऱ्याच गावात फिरलं. त्यामुळं कुणा एकाच्या नावाची ‘वाईत आवई’ उठवणं, याक्षणी तरी खूप अवघड.सचिन जवळकोटे