शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लावला ‘भंडारा’... अन् फिरला वारा !--सातारनामा

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

वाईत आवई : फलटण फिक्स; पण ‘माण-खटावात कोण रेऽऽ भाऊ?’

सातारा : ‘राम-लक्ष्मण’ जोडीनं कैक वर्षे जिल्ह्याचं राजकारण स्वत:च्या ताब्यात ठेवलं. ‘पाडापाडी’च्या राजकारणात मशहूर असलेल्या या जोडीला, यंदा मात्र आपलीच माणसं निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणूनच ‘फलटणचा निकाल स्पष्ट’; पण वाईमध्ये ‘हातातल्या घड्याळा’चं भवितव्य खंडाळ्यातल्या भंडाऱ्यावर अवलंबून. असाच प्रकार ‘माण-खटाव’मध्येही !दुष्काळी माण-खटावात ‘जयाभाव’ नं किती पाणी आणलं, माहीत नाही; पण इथं यंदा ‘पैशाचा पाऊस’ अन् ‘मतांचा महापूर’ दिसला. सुरुवातीला ‘गोरे’ की ‘पोळ’ अशी चर्चा होती, शेवटच्या टप्प्यात मात्र ‘कोणता भाऊ’ हाच सवाल विचारला गेला. ‘जयाभाव’नं आणलेल्या पाण्यापेक्षाही मुंडे-जानकरांची भावनिक साद ‘छोट्या भावा’साठी ‘लई भारीऽऽ’ ठरली. इथं ‘भंडारा’ गावोगावात चालला. सर्वात धक्कादायक म्हणजे, मायणीसारख्या गावातही मोठ्या आवडीनं ‘कपबशी’तून ‘मोदींचा चहा’ पिला गेला. ‘गुदगेंचं तात्याप्रेम’ (की जयाभाव द्वेष?) काही त्यांच्याच लोकांना पचनी पडलं नाही म्हणे. वडूज-दहीवडीत ‘जयाभाऊंचा हात’ दिसला असला तरी म्हसवडसह बाकीच्या वाड्या-वस्त्यांमध्ये म्हणे ‘कपबशी’चा खणखणाट. खटाव तालुक्यात ‘हरणाई’चा भोंगा चांगला वाजला. आता विषय इतकाच की, खटावचे ‘भैय्या’ किती मतं खातात, यावरच माणच्या दोन ‘भाऊं’ंचा निकाल अवलंबून. अजितदादा किंवा रामराजे मोगराळे घाट चढून वर आले असते तर कदाचित ‘घडाळ्याचे काटे’ अधिक गतीनं फिरले असते.फलटणमध्ये मात्र परिस्थिती एकदम वेगळी. लोकसभेपासून अत्यंत आक्रमक बनलेली ‘रणजित-दिगंबर’ जोडी ऐन विधानसभेला चिडीचूप का झाली, याचं उत्तर साऱ्यांसाठीच आकलनापलीकडं. कोणताही ‘शेतकरी’ परगावी जाताना पॅसेंजरचंच तिकीट काढतो; पण इथं या ‘स्वाभिमानी’ पठ्ठ्यानं म्हणे ‘अर्धा पेटी’चं ‘कन्फर्म तिकीट’ खरेदी केलं; अन् नंतर पुन्हा भरकटत गेलेली ‘बाबा एक्स्प्रेस’च पकडलेली. ‘तिकीट फेल’ गेल्याचं दु:ख जास्त की ‘गाडी’ चुकल्याचा पश्चाताप, हे आदरणीय दिगंबरावांनाच ठावूक. ट्रक भरून साड्या काय अन् टँकर भरून पाणी काय... सारंच मुसळ केरात गेल्याची रूखरूख लागलीय रावऽऽ.असो, लोकसभेत शिट्टी वाजल्यापासून शांत बसलेल्या रामराजेंचा खरा अवतार पुन्हा दिसून आला. ‘पोपट, चिमण्या अन् घुबडां’चा खेळ रंगविणारे ‘प्राध्यापक’ महाशयच पुन्हा एकदा फलटणचे ‘रिंगमास्टर’ ठरले... पण ‘पाटणमधल्या पोपटां’चं अन् कऱ्हाडातल्या ‘प्रिन्सिपल’बाबांचं काय? ‘दक्षिण’ खिंड लढविण्यासाठी किती हुशारीनं ‘उत्तरेचा बळी’ कसा दिला गेला? वाचायलाच हवं, पण उद्याच्या अंकात! (क्रमश:)वाईत मदनदादा पाच वर्षे आमदार नव्हते. कारखान्यातूनही बाहेर कधी पडत नव्हते. (असं ‘आबा’ म्हणतात, आम्ही नव्हे!) यंदा निवडणुकीला ते उभं राहणार की नाही, हे महिन्यापूर्वी ठरत नव्हतं. ठरलं तेव्हा पक्ष कोणता असेल, हे कार्यकर्त्यांना ठावूक नव्हतं. अगदी उमेदवारी फॉर्म भरेपर्यंत सारेच अंधारात होते. अशा वातावरणात मकरंद आबांचं फावलं. बावळेकरांचंही भागलं. अर्ज माघारीपूर्वीच गावोगावच्या पारावर म्हणे, ‘आबांच्या लीड’ पन्नास हजारांवर पोहोचला... पण, मदनदादा भलतेच वस्ताद निघाले. आबांना बेसावध ठेवून त्यांनी शेवटच्या क्षणाला ‘गनिमी कावा’ केला. आबांची एकेक माणसं फोडून ते त्यांच्याच पट्ट्यात घुसले. फुटलेला माणूस पुन्हा परत आणण्यातच आबांची शक्ती खर्ची झाली. झेड्पीमुळं आबांचा ‘लोणंद गटाचा आनंद’ हिरावला गेला. गावा-गावांतील गटातटांचाही फायदा दादांनी पुरेपूर उचलला. सुरुवातीला अत्यंत किरकोळीत काढल्या गेलेल्या घटकांचाही ‘इगो’ जागा झाला. (उद्या ‘बावधन’मधला आकडा फुटल्यानंतर या वाक्याचा अर्थ लक्षात येईलच!) थोडक्यात, शेवटच्या टप्प्यात मदनदादा अकस्मात आक्रमक झाल्यानं चकित झालेल्या मकरंद आबांना आपली बरीच समीकरणं बदलावी लागली. अशातच ‘महाबळेश्वरचा एक गठ्ठा’ बावळेकरांच्या खिशात पडला; तर ‘खंडाळ्यात भंडारा’ लावला गेल्यानं पुरुषोत्तमांचं ‘कमळ’ बऱ्याच गावात फिरलं. त्यामुळं कुणा एकाच्या नावाची ‘वाईत आवई’ उठवणं, याक्षणी तरी खूप अवघड.सचिन जवळकोटे