शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वीर जवान यांच्या स्मरणात भक्तीशक्ती दिंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:26 IST

दिंडीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

सातारा :  शूरवीर सैनिक देशासाठी लढले ज्यांना वीरमरण आले, अशा सातारा जिल्ह्यातील वीर जवान त्यांच्या स्मरणार्थ जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील अंध वारकरी विजय महाराज पवार हे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी  सोहळ्याचे आयोजन करणार आहेत. ही पालखी शुक्रवार दि.६ रोजी निघणार असून सोमवार दि २३ रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे.

या पालखीत सहाशे वारकरी सहभागी होणार आहेत. जन्मापासून अंध असणारे विजय महाराज पवार हे गेली सत्तावीस वर्षे सलगदिंडी सोहळा आयोजित करत असतात. या सोहळ्याला समाजातील विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कोणी अन्नधान्य, कोणी अन्नदान ,तर कोणी आर्थिक मदत करत आहे. यंदा वीर जवान यांच्यासाठी सातारा जिल्हातून निघणारी पालखी देशातील पहिली पालखी सोहळा आहे. देशाच्या शूरवीर जवानांसाठी ही अनोखी निघत असणारी पालखी सोहळा हा अनेकांमध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण करतोतसेच अनेकांना प्रेरणाही या दिंडीतून मिळत आहे.

सातारा येथे विजय महाराज पवार आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेसमोर बसणा-या शिक्षक कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी पाठिंबा जाहीर केला तसेच विठ्ठलाच्या चरणी तुम्हा सर्वांचा गा-हाने मी मांडणार आहे, असे सांगितले. तसेच शिक्षक कर्मचा-यांनीही या दिंडीला पाठिंबा दिला व चांगली मदत करू असे आश्वासन महाराजांना दिली.वीर जवानांबद्दल कृतज्ञतेसाठी जागृतीही दिंडी वीर जवान यांच्या स्मरणार्थ आयोजित केली असून त्याला नागरिकांनी  सढळ  हातांनी मदत करावी असे अंध विजय पवार यांनी  आव्हान केले आहे. सध्या जनजागृती व लोकसहभागाची सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेट देऊन हभप विजय महाराज वीर जवान यांच्याबद्दल माहिती देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.