शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

सावधान.. इथं पावलोपावली जिवाची भीती!

By admin | Updated: April 19, 2017 23:03 IST

लोंबकळणाऱ्या तारांचे प्रमाण वाढले : कऱ्हाडातील रस्त्यावरील स्थिती; मालवाहू वाहनांना नेहमीच वाढता धोका

कऱ्हाड : शहरातील विविध भागांबरोबर मुख्य मार्गावर वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत तारा या सध्या खाली लोंबकळत असलेल्या पाहावयास मिळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मालवाहू ट्रक व गाड्यांना शॉक लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरणकडून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. महावितरणच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कऱ्हाड शहरात महावितरणच्या वतीने रस्त्याच्या बाजूने घरगुती विद्युत तारांची लाईन नेण्यात आली आहेत. तर मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांची लाईन ही मुख्य रस्त्यांच्यामधून उंची वाढवून नेण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील दत्त चौक ते चावडी चौक मार्ग, बसस्थानक मार्ग ते कृष्णा नाका व भेदा चौक ते पोपटभाई चौक या मुख्य मार्गावर काही ठिकाणी अजूनही विद्युत तारा या खाली लोंबकळत असलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. शहरात घरगुती, खासगी कंपनी तसेच छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. शहरातील दत्त चौक ते चावडी चौक या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नेहमीच ट्रक तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी माल घेऊन येणाऱ्या वाहनांना सध्या या विद्युत तारा थटत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजवाहक तारा रस्त्यावर खाली लोंबकळत असल्याने त्यापासून लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. येथील लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याबाबत तसेच तारांची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांकडून मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. कऱ्हाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ या ठिकाणांवरील रस्त्याकडेला सध्या वीजवाहक तारा खाली लोंबकळत असून, त्यांची उंंची वाढविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूअंतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत. मात्र, रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांसाठी रस्ता उकरला असल्याने काही ठिकाणी तारा रस्त्यावरच आलेल्या आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महावितरणकडून लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)