शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाची समांतर व्यवस्था मोडीत

By admin | Updated: January 2, 2017 23:18 IST

सदाभाऊ खोत : बदल स्वीकारा; चांगल्या गोष्टीसाठी धाडसी निर्णय घ्यावा लागला

मलकापूर : ‘वाळूसारख्या अवैध धंद्यातून काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अर्थकारण, राजकारण व समाजकारण दूषित झाले होते. अशी काळ्या पैशाची व्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोडीत निघाली. बदल हा निसर्गाचा नियम असून, तो स्वीकारला पाहिजे,’ असे मत जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, दयानंद पाटील, प्रदीप पाटील, महादेव देसाई, आनंदराव मोहिते, उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ‘एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नोटाबंदीमुळे घरात साठवून ठेवलेला पैसा अनेक मार्गातून बँकेत जमा झाला. तो पैसा मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कर्जे उपलब्ध होऊन उद्योग वाढीस चालना मिळेल. व्यवहारात बदल होण्यासाठी एटीएम, डेबिट कार्ड, कॅशलेस मशीन व मोबाईल बँकिंगचा अवलंब केला पाहिजे. जनावरांमागे जाणारी व न शिकलेली मुलेसुद्धा मोबाईलवर सहज काहीही करतात. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. वेळ लागेल; पण हा बदल हळूहळू पचनी पडत आहे.गरीब शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. ज्या बँका, संस्था नियमानुसार चालतात त्यांना काहीच अडचण येणार नाही. एका रात्रीत साडेतीनशे कोटी रुपये नाशिकच्या जिल्हा बँकेत जमा झाले. त्यामुळेच त्यांना निर्बंध आले. नोटाबंदी हे औषध आहे तर कॅशलेस व्यवहार पद्धती हा बदल आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाचा स्वीकार प्रत्येकाला करावाच लागणार आहे.’यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर यांचेही भाषण झाले. (वार्ताहर)