शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

काळ्या पैशाची समांतर व्यवस्था मोडीत

By admin | Updated: January 2, 2017 23:18 IST

सदाभाऊ खोत : बदल स्वीकारा; चांगल्या गोष्टीसाठी धाडसी निर्णय घ्यावा लागला

मलकापूर : ‘वाळूसारख्या अवैध धंद्यातून काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अर्थकारण, राजकारण व समाजकारण दूषित झाले होते. अशी काळ्या पैशाची व्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोडीत निघाली. बदल हा निसर्गाचा नियम असून, तो स्वीकारला पाहिजे,’ असे मत जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, दयानंद पाटील, प्रदीप पाटील, महादेव देसाई, आनंदराव मोहिते, उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ‘एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नोटाबंदीमुळे घरात साठवून ठेवलेला पैसा अनेक मार्गातून बँकेत जमा झाला. तो पैसा मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कर्जे उपलब्ध होऊन उद्योग वाढीस चालना मिळेल. व्यवहारात बदल होण्यासाठी एटीएम, डेबिट कार्ड, कॅशलेस मशीन व मोबाईल बँकिंगचा अवलंब केला पाहिजे. जनावरांमागे जाणारी व न शिकलेली मुलेसुद्धा मोबाईलवर सहज काहीही करतात. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. वेळ लागेल; पण हा बदल हळूहळू पचनी पडत आहे.गरीब शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. ज्या बँका, संस्था नियमानुसार चालतात त्यांना काहीच अडचण येणार नाही. एका रात्रीत साडेतीनशे कोटी रुपये नाशिकच्या जिल्हा बँकेत जमा झाले. त्यामुळेच त्यांना निर्बंध आले. नोटाबंदी हे औषध आहे तर कॅशलेस व्यवहार पद्धती हा बदल आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाचा स्वीकार प्रत्येकाला करावाच लागणार आहे.’यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर यांचेही भाषण झाले. (वार्ताहर)