शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काळ्या पैशाची समांतर व्यवस्था मोडीत

By admin | Updated: January 2, 2017 23:18 IST

सदाभाऊ खोत : बदल स्वीकारा; चांगल्या गोष्टीसाठी धाडसी निर्णय घ्यावा लागला

मलकापूर : ‘वाळूसारख्या अवैध धंद्यातून काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अर्थकारण, राजकारण व समाजकारण दूषित झाले होते. अशी काळ्या पैशाची व्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोडीत निघाली. बदल हा निसर्गाचा नियम असून, तो स्वीकारला पाहिजे,’ असे मत जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, दयानंद पाटील, प्रदीप पाटील, महादेव देसाई, आनंदराव मोहिते, उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ‘एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नोटाबंदीमुळे घरात साठवून ठेवलेला पैसा अनेक मार्गातून बँकेत जमा झाला. तो पैसा मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कर्जे उपलब्ध होऊन उद्योग वाढीस चालना मिळेल. व्यवहारात बदल होण्यासाठी एटीएम, डेबिट कार्ड, कॅशलेस मशीन व मोबाईल बँकिंगचा अवलंब केला पाहिजे. जनावरांमागे जाणारी व न शिकलेली मुलेसुद्धा मोबाईलवर सहज काहीही करतात. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. वेळ लागेल; पण हा बदल हळूहळू पचनी पडत आहे.गरीब शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. ज्या बँका, संस्था नियमानुसार चालतात त्यांना काहीच अडचण येणार नाही. एका रात्रीत साडेतीनशे कोटी रुपये नाशिकच्या जिल्हा बँकेत जमा झाले. त्यामुळेच त्यांना निर्बंध आले. नोटाबंदी हे औषध आहे तर कॅशलेस व्यवहार पद्धती हा बदल आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाचा स्वीकार प्रत्येकाला करावाच लागणार आहे.’यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर यांचेही भाषण झाले. (वार्ताहर)