शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आदकीर्तील बेंदूर सणावर सावट

By admin | Updated: July 6, 2017 13:01 IST

पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त

आॅनलाईन लोकमतआदर्की (जि. सातारा), दि. ५ : आदर्की परिसरास मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. तरीही परिसरातील शेतकऱ्यांनी हंगाम वाया जाऊ नये म्हणून मृग नक्षत्रातील रिमझिम पावसावर पेरणी केली. पण अचानक पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. याचे सावट बळीराजाच्या बेंदूर सणावर झालेला पाहायला मिळत आहे.आदर्की परिसर निसर्गाच्या लहरीपणावर शेतकरी शेती करत होता. त्यामुळे पाऊस पडला तर पेरणी होत होती. गेल्या पाच सहा वर्षांपासून आदर्की परिसरात घोम बलकवडीचे पाणी उजव्या कालव्यातून सोडले जाऊ लागले. ओढे नाल्यांतून पाणी पाझर तलाव भरून घेण्यासाठी पाणीपट्टी लोक वर्गणीतून भरली जात होती. पाणीसाठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडे बैलांबरोबरच टॅक्टरची संख्या वाढली. यावर्षी जानेवारी व मार्च महिन्यात थोम बलकवडी कालव्यात सोडले पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व राजकीय श्रेयवादातील पाणी पूजनामुळे मुळीकवाडी, हिंगणगाव धरण त्याबरोबर पाझर तलाव नाला बांध सिमेट बंधारे यात पाणी सोडले नाही. त्यामुळे बागायती पिके वाळून गेली. त्यातच मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मृगात रिमझिम पाऊस झाला. भविष्यात चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, चवळी, घेवडा आदी खरीपाची पेरणी केली.आता पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सजार्राजाचा सण बैदूर चार दिवसांवर आला असताना शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.