शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
3
भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
6
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
7
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
8
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
9
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
10
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
11
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
12
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
13
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
14
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
15
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
16
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
17
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
18
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
19
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
20
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट

खंडाळ्यात औद्योगिक विकासाला खीळ ?

By admin | Updated: April 6, 2017 14:03 IST

विस्तारीकरणावरही चाप : शासनाने जिल्ह्याचे उक्त प्रदेश घोषित केल्याने संभ्रमावस्था

लोकमत आॅनलाईन

खंडाळा (जि. सातारा), दि. ६ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी प्रदेशाचे क्षेत्र वगळून खंडाळा तालुक्यासह उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र उक्त प्रदेश म्हणून शासनाने घोषित केले आहे. या नव्या घोषणेमुळे खंडाळा तालुक्यातील विकासात्मक प्रकिया अडचणीत येण्याची शक्यता आहे. खंडाळा तालुका पुन्हा बॅकफूटला जाऊन तालुक्यात होऊ घातलेल्या औद्योगिक विस्तारीकरणाला खीळ बसणार आहे. याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होण्याची चिन्हे आहेत. या नव्या निर्णयाची उकल न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पाचगणी हा प्राकृतिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेश वगळून उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र शासनाच्या नगर विकास विभागाने उक्त प्रदेश म्हणून नियत केले आहे. या उक्त प्रदेशाची योजना तयार करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातारा प्रादेशिक नियोजन मंडळ गठीत केले आहे. ही प्रारुप प्रादेशिक योजना प्रादेशिक नियोजन मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र शासन राजपत्र जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सहायक संचालक नगर रचना प्रादेशिक योजना, सहायक संचालक नगर रचना सातारा शाखा, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी चार महिन्यांच्या आत कारण मीमांसासह सूचना व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन सातारा प्रादेशिक नियोजन मंडळाचे सदस्य सचिव, श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.खंडाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांत औद्योगिकीकरण वाढीस लागले आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांनी आपले बस्तान तालुक्यात बसवले आहे. तसेच पुण्यापासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर आणि महामार्गालगत खंडाळा असल्याने येथे औद्योगिक वसाहत आकाराला येत होती. यामुळे तालुक्यातील पडीक माळरानालाही गगनाला भिडणारे भाव मिळत होते. साहजिकच याचा परिणाम तालुक्याच्या सामाजिक जडणघडणीत झाला आहे. मात्र, शासनाच्या या नव्या धोरणानुसार पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांच्या गावठाणापासून सातशे मीटर व त्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात एक हजार मीटरचा भाग वगळून अन्य जमिनीचे क्षेत्र उक्त प्रदेशात समाविष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो.यामुळे तालुक्यात नवे उद्योग येण्याचा मार्ग थंडावला जाण्याची शक्यता आहे. साहजिकच या उद्योगांवर आधारलेले लघू उद्योग, कुटीर उद्योग अडचणीत येणार आहेत. याचा परिणाम कामगार वर्गावरही होणार आहे. (प्रतिनिधी)औद्योगिकीकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक माळरानांना किंमत आली होती. मात्र, आता अशा उर्वरित जमिनी पिकवताही येणार नाहीत आणि त्याला विकून चांगली रक्कमही मिळू शकणार नाही. याबाबत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकास थांबला तर तालुक्याचा विकास खुंटणार आहे.- बंडू ढमाळ, सचिव, माथाडी कामगार युनियन