शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

खंडाळ्यात औद्योगिक विकासाला खीळ ?

By admin | Updated: April 6, 2017 14:03 IST

विस्तारीकरणावरही चाप : शासनाने जिल्ह्याचे उक्त प्रदेश घोषित केल्याने संभ्रमावस्था

लोकमत आॅनलाईन

खंडाळा (जि. सातारा), दि. ६ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी प्रदेशाचे क्षेत्र वगळून खंडाळा तालुक्यासह उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र उक्त प्रदेश म्हणून शासनाने घोषित केले आहे. या नव्या घोषणेमुळे खंडाळा तालुक्यातील विकासात्मक प्रकिया अडचणीत येण्याची शक्यता आहे. खंडाळा तालुका पुन्हा बॅकफूटला जाऊन तालुक्यात होऊ घातलेल्या औद्योगिक विस्तारीकरणाला खीळ बसणार आहे. याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होण्याची चिन्हे आहेत. या नव्या निर्णयाची उकल न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पाचगणी हा प्राकृतिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेश वगळून उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र शासनाच्या नगर विकास विभागाने उक्त प्रदेश म्हणून नियत केले आहे. या उक्त प्रदेशाची योजना तयार करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातारा प्रादेशिक नियोजन मंडळ गठीत केले आहे. ही प्रारुप प्रादेशिक योजना प्रादेशिक नियोजन मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र शासन राजपत्र जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सहायक संचालक नगर रचना प्रादेशिक योजना, सहायक संचालक नगर रचना सातारा शाखा, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी चार महिन्यांच्या आत कारण मीमांसासह सूचना व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन सातारा प्रादेशिक नियोजन मंडळाचे सदस्य सचिव, श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.खंडाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांत औद्योगिकीकरण वाढीस लागले आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांनी आपले बस्तान तालुक्यात बसवले आहे. तसेच पुण्यापासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर आणि महामार्गालगत खंडाळा असल्याने येथे औद्योगिक वसाहत आकाराला येत होती. यामुळे तालुक्यातील पडीक माळरानालाही गगनाला भिडणारे भाव मिळत होते. साहजिकच याचा परिणाम तालुक्याच्या सामाजिक जडणघडणीत झाला आहे. मात्र, शासनाच्या या नव्या धोरणानुसार पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांच्या गावठाणापासून सातशे मीटर व त्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात एक हजार मीटरचा भाग वगळून अन्य जमिनीचे क्षेत्र उक्त प्रदेशात समाविष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो.यामुळे तालुक्यात नवे उद्योग येण्याचा मार्ग थंडावला जाण्याची शक्यता आहे. साहजिकच या उद्योगांवर आधारलेले लघू उद्योग, कुटीर उद्योग अडचणीत येणार आहेत. याचा परिणाम कामगार वर्गावरही होणार आहे. (प्रतिनिधी)औद्योगिकीकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक माळरानांना किंमत आली होती. मात्र, आता अशा उर्वरित जमिनी पिकवताही येणार नाहीत आणि त्याला विकून चांगली रक्कमही मिळू शकणार नाही. याबाबत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकास थांबला तर तालुक्याचा विकास खुंटणार आहे.- बंडू ढमाळ, सचिव, माथाडी कामगार युनियन