शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

शंभू महादेवाच्या शिंगणापूरात बहरलंय बेल रोपवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:39 IST

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांच्या कल्पनेतून साकार धार्मिकदृष्ट्या अर्पण करण्याला महत्त्व वन विभागाकडून मूर्त स्वरूप

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

मागीलवर्षी श्रावण महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिखर शिंगणापूर येथे देवर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या १७६.५७ हेक्टर राखीव वनक्षेत्राची पाहणी करत असताना त्यांनी या ठिकाणी बेल रोपवन तयार करण्याची कल्पना मांडली. तसे केल्यास शंभू महादेवाला अर्पण करण्यासाठी आवश्यक बेलपत्र भक्तांना सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार माणच्या वन विभागाने राणंद येथील रोपवाटिकेत बेलाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. 

रोपे तयार केल्यानंतर या रोपांची शिंगणापूर येथील वन विभागाच्या जागेत  लागण करण्यात आली. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर ६५० बेलाची रोपे लावली. बेल रोपवन तयार करण्यासाठी महाबळेश्वर, कास, ठोसेघरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एकूण दोन लाखांची आर्थिक मदत केली. फक्त लागवड करूनच वन विभाग थांबला नाही तर वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नितीन जगदाळे व वनपाल महेंद्र पवार यांनी या रोपांची पूर्ण काळजी घेतली. वेळोवेळी किटकनाशके, औषधे फवारणी करून या रोपांचे संरक्षण करण्यात आले. याचा परिपाक म्हणून या रोपवनात लागवड केलेली शंभर टक्के रोपे जिंवत असून त्यांची चांगली वाढ होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे येथील वन विभागाच्या इतर क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात बेलांच्या रोपांची लागवड केल्यास या तीर्थक्षेत्राला बेलांच्या रोपांनी सुशोभित करता येईल. तसेच शिंगणापूर येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच वन पर्यटनही वाढीस लागेल. शिंगणापूर येथे साकारलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वजण वन विभागाला धन्यवाद देत आहेत.