शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शंभू महादेवाच्या शिंगणापूरात बहरलंय बेल रोपवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:39 IST

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांच्या कल्पनेतून साकार धार्मिकदृष्ट्या अर्पण करण्याला महत्त्व वन विभागाकडून मूर्त स्वरूप

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

मागीलवर्षी श्रावण महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिखर शिंगणापूर येथे देवर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या १७६.५७ हेक्टर राखीव वनक्षेत्राची पाहणी करत असताना त्यांनी या ठिकाणी बेल रोपवन तयार करण्याची कल्पना मांडली. तसे केल्यास शंभू महादेवाला अर्पण करण्यासाठी आवश्यक बेलपत्र भक्तांना सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार माणच्या वन विभागाने राणंद येथील रोपवाटिकेत बेलाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. 

रोपे तयार केल्यानंतर या रोपांची शिंगणापूर येथील वन विभागाच्या जागेत  लागण करण्यात आली. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर ६५० बेलाची रोपे लावली. बेल रोपवन तयार करण्यासाठी महाबळेश्वर, कास, ठोसेघरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एकूण दोन लाखांची आर्थिक मदत केली. फक्त लागवड करूनच वन विभाग थांबला नाही तर वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नितीन जगदाळे व वनपाल महेंद्र पवार यांनी या रोपांची पूर्ण काळजी घेतली. वेळोवेळी किटकनाशके, औषधे फवारणी करून या रोपांचे संरक्षण करण्यात आले. याचा परिपाक म्हणून या रोपवनात लागवड केलेली शंभर टक्के रोपे जिंवत असून त्यांची चांगली वाढ होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे येथील वन विभागाच्या इतर क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात बेलांच्या रोपांची लागवड केल्यास या तीर्थक्षेत्राला बेलांच्या रोपांनी सुशोभित करता येईल. तसेच शिंगणापूर येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच वन पर्यटनही वाढीस लागेल. शिंगणापूर येथे साकारलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वजण वन विभागाला धन्यवाद देत आहेत.