शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

माहेरापासून मधमाशा दुरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

(मधमाशी दिन विशेष) प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात ...

(मधमाशी दिन विशेष)

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढत्या शहरी नागरीकरणाबरोबरच स्ट्रॉबेरी, बटाटा आणि गाजर या अपारंपरिक पिकांमुळे वनांखालील क्षेत्रात घट झाली. परिणामी मधमाश्यांचे नैसर्गिक मधाचे आगर नष्ट झाले. त्यामुळे सुमारे २५ हजार मधपेट्या धारण क्षमता असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज अवघ्या हजारभर मधपेट्या कार्यान्वित आहेत.

भारतात मधाचे सर्वाधिक उत्पन्न मधुमक्षिका पालनाद्वारे पंजाब राज्यात होते. नैसर्गिक मधाचे संकलन भारताच्या उत्तरपूर्व आणि महाराष्ट्र राज्यात होते. मागील काही दशकांपासून राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात पर्यटन, खाणकाम, स्ट्रॉबेरी, मलबेरीसारखी अपारंपरिक पिके यांसह व्यापारी लाकूड उत्पादनासाठी एकजातीय वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भारतीय मधमाशी प्रजातींना त्याचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक वृक्षराजीचे वनांखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे नैसर्गिक मधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसऱ्या बाजूस मधुमक्षिका पालनाद्वारे यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित होता. मात्र, बदलत्या पीकपद्धतीसह अधिक उत्पादनासाठी या पिकांवर मारल्या जाणाऱ्या कीटकनाशके व इतर फवारण्यांमुळे मधसंकलनाऐवजी मधमाशांचा मृत्यू होऊ लागला आहे. निसर्गत: अस्तित्वात असलेल्या मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या कमी झाली आहे.

अन्न पिकांपासून ते नैसर्गिक बहुतांश वनस्पतींचे परागीभवनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम मधमाश्या करतात. भविष्यात मधमाश्याच्या घटत्या संख्येमुळे अन्नदुर्भिक्ष्य संकटाला मानवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे जतन करणे आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावरही विशेष मोहीम राबविली जाणे या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

चौकट

‘थाईसॅकब्रुड’चीही लाट ठरतेय जीवघेणी

मधमाश्यांमध्येही विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यात प्रामुख्याने ‘थाईसॅकब्रुड’ हा रोग मधमाश्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे मधुमक्षिकापालकांकडील तसेच निसर्गातीलही मधमाश्यांच्या अनेक वसाहती नष्ट होतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या मृत्युमुखी पडतात. याच्या अटकावासाठी विविध स्तरांवर अभ्यास सुरू आहे, मात्र अद्यापही ठोस उपाय न मिळाल्याने ही मधमाश्यांची संख्या घटत आहे.

कोट :

जैवसाखळीत मधमाशी परागीभवनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे आपल्याला अन्न उत्पादन मिळते. परागीभवनाची कोणतीही कृत्रिम पद्धती मानवाला ज्ञात नाही आणि ते करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मधमाश्यांच्या अधिवासाचे संवर्धन, संरक्षण मनुष्याच्या हिताचे आहे.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा