शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

माहेरापासून मधमाशा दुरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

(मधमाशी दिन विशेष) प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात ...

(मधमाशी दिन विशेष)

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढत्या शहरी नागरीकरणाबरोबरच स्ट्रॉबेरी, बटाटा आणि गाजर या अपारंपरिक पिकांमुळे वनांखालील क्षेत्रात घट झाली. परिणामी मधमाश्यांचे नैसर्गिक मधाचे आगर नष्ट झाले. त्यामुळे सुमारे २५ हजार मधपेट्या धारण क्षमता असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज अवघ्या हजारभर मधपेट्या कार्यान्वित आहेत.

भारतात मधाचे सर्वाधिक उत्पन्न मधुमक्षिका पालनाद्वारे पंजाब राज्यात होते. नैसर्गिक मधाचे संकलन भारताच्या उत्तरपूर्व आणि महाराष्ट्र राज्यात होते. मागील काही दशकांपासून राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात पर्यटन, खाणकाम, स्ट्रॉबेरी, मलबेरीसारखी अपारंपरिक पिके यांसह व्यापारी लाकूड उत्पादनासाठी एकजातीय वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भारतीय मधमाशी प्रजातींना त्याचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक वृक्षराजीचे वनांखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे नैसर्गिक मधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसऱ्या बाजूस मधुमक्षिका पालनाद्वारे यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित होता. मात्र, बदलत्या पीकपद्धतीसह अधिक उत्पादनासाठी या पिकांवर मारल्या जाणाऱ्या कीटकनाशके व इतर फवारण्यांमुळे मधसंकलनाऐवजी मधमाशांचा मृत्यू होऊ लागला आहे. निसर्गत: अस्तित्वात असलेल्या मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या कमी झाली आहे.

अन्न पिकांपासून ते नैसर्गिक बहुतांश वनस्पतींचे परागीभवनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम मधमाश्या करतात. भविष्यात मधमाश्याच्या घटत्या संख्येमुळे अन्नदुर्भिक्ष्य संकटाला मानवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे जतन करणे आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावरही विशेष मोहीम राबविली जाणे या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

चौकट

‘थाईसॅकब्रुड’चीही लाट ठरतेय जीवघेणी

मधमाश्यांमध्येही विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यात प्रामुख्याने ‘थाईसॅकब्रुड’ हा रोग मधमाश्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे मधुमक्षिकापालकांकडील तसेच निसर्गातीलही मधमाश्यांच्या अनेक वसाहती नष्ट होतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या मृत्युमुखी पडतात. याच्या अटकावासाठी विविध स्तरांवर अभ्यास सुरू आहे, मात्र अद्यापही ठोस उपाय न मिळाल्याने ही मधमाश्यांची संख्या घटत आहे.

कोट :

जैवसाखळीत मधमाशी परागीभवनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे आपल्याला अन्न उत्पादन मिळते. परागीभवनाची कोणतीही कृत्रिम पद्धती मानवाला ज्ञात नाही आणि ते करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मधमाश्यांच्या अधिवासाचे संवर्धन, संरक्षण मनुष्याच्या हिताचे आहे.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा