शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

आता महिनाभर दाढी कटिंग घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

सातारा : कोरोना रोखण्याबाबतीत सरकारला नेमक्या उपाययोजना करताना अनेक अडचणी येत आहेत. केवळ लॉकडाऊन करून महामारी रोखली जाईल, असा ...

सातारा : कोरोना रोखण्याबाबतीत सरकारला नेमक्या उपाययोजना करताना अनेक अडचणी येत आहेत. केवळ लॉकडाऊन करून महामारी रोखली जाईल, असा सरकारचा कयास आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने उपासमारीने मरायची वेळ आली आहे. जिल्ह्यातील नाभिक समाजदेखील आता पुन्हा भीतीच्या छायेत गेलेला आहे.

दुकाने बंद ठेवली असली तरी या लोकांनी आधीच बँकांकडून कर्ज घेतले आहेत. त्यांना माफी दिली गेलेली नाही. बँकेचे अधिकारी-कर्मचारी दुकान उघडताच दारात वसुलीसाठी उभे राहत आहेत तर लाईट बिलाचे पैसे देण्याची पद्धतदेखील उत्पन्न मिळणार अशी परिस्थिती आहे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये दुकाने सुरू राहिल्याने तसेच ग्राहक वर्गदेखील उत्साहाने येऊ लागल्याने व्यवसाय सुरळीत होता तोच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना महामारीचा कहर होऊ लागल्याने ग्राहक वर्गाने पाठ फिरवली. काही दिवस पोटापुरते पैसे मिळत होते. मात्र आता सरकारनेच सक्तीने दुकान बंद ठेवल्याने या व्यावसायिकांची तसेच त्यावर अवलंबून असलेल्या कारागिरांच्या कुटुंबांची उपासमार होऊ लागली आहे. सरकारने ही दुकाने सुरू ठेवावीत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा हे नाभिक समाज देत आहे.

चौकट

सरकारने ५ हजार रुपये द्यावेत..

सरकारने सक्तीने दुकाने बंद ठेवली आहे तर आता लोकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रति महिना ५ हजार रुपये बँक खात्यात जमा करावेत. तरच उपासमार थांबेल, असे या कारागिरांचे म्हणणे आहे.

कोट...

नाभिक व्यावसायिक कायम सरकारच्या निर्णयांचे बळी ठरत आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद ठेवली. आता पुन्हा आदेश काढून सक्तीने दुकाने बंद ठेवली आहेत. कर्जाचे हप्ते थकले आहेत. लाईट बिलही कसे भरायचे हा प्रश्न आहे.

- संतोष साळुंखे, ज्येष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा

कोट...

शासनाने घालून दिलेले नियम पाळून आम्ही व्यवसाय करत होतो. कोरोनाची भीती पुन्हा वाढू लागल्याने ग्राहकदेखील पाठ फिरू लागला होता. मात्र पोटापुरते पैसे मिळत होते आता ते देखील बंद झाल्याने कुटुंब कसे चालवायचे हा मोठा प्रश्न आमच्यापुढे आहे.

- सुधाकर देवकर, कारागीर

कोट

सलून व्यवसायामुळे कोरोना महामारी वाढल्याची उदाहरण कुठेही नाही. तरीदेखील ही दुकाने बंद ठेवून शासन काय साधणार आहे, हे नेमके कळायला मार्ग नाही. ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी सरकारने कारवाई करावी, मात्र कुणाच्याही पोटावर मारू नये.

- राजेंद्र साळुंखे, कारागीर

कोट

हजारो लोक कोरोनाबाबत प्रशासनाने दिलेले निर्बंध झुगारून फिरत असले तरी देखील सरकार कारवाई करत नाहीत. उलट जिल्हाबंदी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामध्ये पुणे-मुंबईच्या लोकांची गर्दी झाली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोरोना महामारी पसरली आता देखील तीच परिस्थिती सरकार आणू पाहत आहे का? अशी भीती आहे.

-प्रभाकर खरे, कारागीर