शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी बीबीएफ पेरणी गरजेची : विजयकुमार राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

नागठाणे : ‘ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज ...

नागठाणे : ‘ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे,’ असे प्रतिपादन कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले. नागठाणे येथील कल्पना खंडाईत यांचे शेतात बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिक शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषिभूषण मनोहर साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे, कृषी अधिकारी अनिल महमूलकर, युवराज काटे, रोहिदास तिटकारे, गणेश साळुंखे, आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ‘रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी केल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर ३ ओळीत पेरणी होऊन दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर आणि दोन रोपातील अंतर १५ सेंटिमीटर राखले जाते. त्यामुळे सोयाबीनचे एकरी फक्त १५ ते १६ किलो बियाणे लागते. रुंद वरंबाच्या दोन्ही बाजूला सरी तयार होते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. तसेच पाऊस कमी पडला तर मूलस्थानी जलसंधारण होऊन ओलावा टिकून राहतो. त्यामुळे पिकाचे दोन्ही नुकसान होत नाही. प्रत्येक चार ओळींनंतर रिकामा पट्टा राहिल्याने हवा खेळती राहून भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. आंतरमशागत सहज करता येते. मूग, उडीदसारखे आंतरपीक सापळा पीक म्हणून घेता येते. त्यामुळे पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी राहून उत्पादन वाढते. बियाणे, खत, मजूर खर्चात बचत होऊन २० ते २५ टक्क्य़ांनी सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांचे २० ते २५ टक्क्य़ांनी उत्पादन वाढते. त्यामुळे बीबीएफ पेरणी पद्धत ही आता विक्रमी उत्पादनासाठी गरजेची झाली आहे.’ अशाप्रकारची बीबीएफ पद्धतीने पेरणी प्रात्यक्षिके ४०० एकर क्षेत्रावर नागठाणे व परिसरातील गावात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्याची माहिती कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी यावेळी दिली.