शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

हातात बाटूक तरीही म्हणे सधन गाव !

By admin | Updated: January 23, 2016 00:47 IST

वाघोशीकर हैराण : रब्बी हंगामाची पैसेवारी ६५ पैसे; महसुलाच्या उद्योगाने ग्रामस्थ अवाक्

खंडाळा : गावात पिण्याच्या पाण्याचा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, गावच्या विहिरीला पाणी नाही म्हणून शेजारच्या गावातील विहिरीतून तात्पुरते पाणी घेतलेले. शेती पाण्याचा तर शिवारात ठिपूसही नाही. पाण्याअभावी ज्वारीचे बाटूक झालेले. काही जागी तर पिके सुकून गेलेली, अशा परिस्थतीत असलेल्या वाघोशी, ता. खंडाळा गावची रब्बी हंगामाची पैसेवारी मात्र ६५ पैसे लावली गेली आहे. प्रत्यक्ष पाहणी न करताच महसूल विभागाने सरसकट हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या या अजब कारभारामुळे ग्रामस्थ, शेतकरी मात्र अवाक् झाले आहेत.वाघोशी हे गाव तसे कायमच दुष्काळी छायेत असलेले गाव. दरवर्षी उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. प्रत्येकवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्यायच नाही; मात्र राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना राबवून गाव टँकरमुक्त करण्यात आले. तरीही पाणी पुरवठ्याच्या विहिरीलाच पाणी कमी पडल्याने दिवसाआड गावात पाणी येतेय.सध्या असणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन शेजारील दापकेघरच्या पाणी योजनेच्या विहिरीवरून उपसा सुरू केला आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीपूर्वीच ही स्थिती उद्भवल्याने पाणीपुरवठा सुरळीत चालणे कठीणच आहे. एकीकडे गावच्या पिण्याच्या पाण्याची ही अवस्था आहे. शेतीपंपाच्या पाण्याचा तर मागमूसही दिसत नाही. गावच्या परिसराची पाणीपातळीच खालावल्याने विहिरींना पाणी नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभराची पिके घेतली. खरी; मात्र पाण्याअभावी ती जळून गेली. ज्वारी पिकाची तर बाटुकं झालीत. लोकांच्या धान्याचंच तर सोडाच; पण जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालायं. ऐन उन्हाळ्यात जनावरं कशी जोपासावी, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे, असं असताना महसूल विभागानं आणि कृषी विभागानं रब्बी हंगामाची पैसेवारी सर्व्हे करताना प्रत्यक्ष पाहणी न करताच ६५ पैसे लावली आहे. तहसील कार्यालयातून अशी आकडेवारी जाहीर झाल्याने गावकरीही अवाक् झाले आहेत. त्यामुळे या चुकीच्या सर्व्हेबाबत प्रत्यक्ष पाहणी करावी. अशा प्रकाराचा तक्रारी अर्ज वाघोशी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला आहे. पाण्याअभावी पिके वाळून गेलीत आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेला अजब न्याय यामुळे इतर सवलती शेतकरी व ग्रामस्थांना मिळणे कठीण जाणार आहे. मात्र, याबाबत महसूल विभागाकडून अद्यापतरी कोणतीही हालचाल झाल्याची दिसून येत नाही. (प्रतिनिधी)गावाच्या शेती पाण्याची अवस्था बिकट आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही पैसेवारी जादा जाहीर झाल्याचे आश्चर्य वाटते. संबंधित विभागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येईल. महसूल विभागाने शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे.-गोरखराव धायगुडे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती वाघोशीगावची पिण्याच्या पाण्याची योजनाच कशीबशी सुरू आहे. भविष्यात पाणी कमीच पडणार आहे. शेतीचेही नुकसान झाले असताना जाहीर झालेली पैसेवारी अजब आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.-मीता धायगुडे, सरपंच वाघोशी