शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या रणांगणावर शिक्कामोर्तब होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची मुदत आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होत असून सोमवारी दुपारनंतरच गावोगावची निवडणूक कशी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल. तसेच काही ठिकाणी बिनविरोधचा डंका असून बहुतांशी ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतींचे संकेत आहेत.

जिल्ह्यात गावपातळीवरील निवडणुकांना खूप महत्त्व आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघते. गावाचा कारभारी आपल्याच पक्षाचा, गटाचा असावा अशी तयारी प्रत्येकाचीच राहते. त्यामुळे वरिष्ठ लोकप्रतिनिधीही गावात जाऊन मोर्चेबांधणी करतात. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होतो. आताही जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावोगावी मोर्चेबांधणी करून व्यूहरचना आखणे, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक १३० ग्रामपंचायती या सातारा तालुक्यातील आहेत. यानंतर पाटणमधील १०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे, तर कऱ्हाड १०४, खटाव तालुका ९०, फलटण ८०, वाई ७६, जावळी ७५, माण तालुक्यात ६१, खंडाळा ५७, कोरेगाव ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

८७८ ग्रामपंचायतींसाठी ७ हजार २६४ जणांना निवडून द्यायचे आहे. पण, प्रत्यक्षात अडीचपट म्हणजे १७ हजार ६४२ जणांनी अर्ज दाखल केलेले. मात्र, ३० डिसेंबरला छाननी झाल्यानंतर १७ हजार ४०७ अर्ज राहिले. आता सोमवार, दि. ४ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतरच निवडणूक लागलेल्या गावांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.

चौकट :

रुसवे, फुगवे काढण्यावर भर...

गावाचे राजकारण हे गट, तट आणि भावकी व गावकीतच खऱ्याअर्थाने रंगते. अनेकांना सदस्य, सरपंच व्हायचे असते. पण, प्रत्येकाच्या नशिबी हे येत नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवरील नेत्यांना इच्छुकांचे रुसवे, फुगवे काढावे लागले आहेत. काहींनी तर उमेदवारी अर्ज ठेवायचाच म्हणून नेत्यांपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे एकाच वॉर्डात अनेकजणांत लढत होणार आहे, तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यावर सोमवारी दुपारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

...........................................................