शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या रणांगणावर शिक्कामोर्तब होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची मुदत आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होत असून सोमवारी दुपारनंतरच गावोगावची निवडणूक कशी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल. तसेच काही ठिकाणी बिनविरोधचा डंका असून बहुतांशी ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतींचे संकेत आहेत.

जिल्ह्यात गावपातळीवरील निवडणुकांना खूप महत्त्व आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघते. गावाचा कारभारी आपल्याच पक्षाचा, गटाचा असावा अशी तयारी प्रत्येकाचीच राहते. त्यामुळे वरिष्ठ लोकप्रतिनिधीही गावात जाऊन मोर्चेबांधणी करतात. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होतो. आताही जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावोगावी मोर्चेबांधणी करून व्यूहरचना आखणे, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक १३० ग्रामपंचायती या सातारा तालुक्यातील आहेत. यानंतर पाटणमधील १०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे, तर कऱ्हाड १०४, खटाव तालुका ९०, फलटण ८०, वाई ७६, जावळी ७५, माण तालुक्यात ६१, खंडाळा ५७, कोरेगाव ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

८७८ ग्रामपंचायतींसाठी ७ हजार २६४ जणांना निवडून द्यायचे आहे. पण, प्रत्यक्षात अडीचपट म्हणजे १७ हजार ६४२ जणांनी अर्ज दाखल केलेले. मात्र, ३० डिसेंबरला छाननी झाल्यानंतर १७ हजार ४०७ अर्ज राहिले. आता सोमवार, दि. ४ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतरच निवडणूक लागलेल्या गावांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.

चौकट :

रुसवे, फुगवे काढण्यावर भर...

गावाचे राजकारण हे गट, तट आणि भावकी व गावकीतच खऱ्याअर्थाने रंगते. अनेकांना सदस्य, सरपंच व्हायचे असते. पण, प्रत्येकाच्या नशिबी हे येत नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवरील नेत्यांना इच्छुकांचे रुसवे, फुगवे काढावे लागले आहेत. काहींनी तर उमेदवारी अर्ज ठेवायचाच म्हणून नेत्यांपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे एकाच वॉर्डात अनेकजणांत लढत होणार आहे, तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यावर सोमवारी दुपारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

...........................................................