शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या रणांगणावर शिक्कामोर्तब होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची मुदत आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होत असून सोमवारी दुपारनंतरच गावोगावची निवडणूक कशी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल. तसेच काही ठिकाणी बिनविरोधचा डंका असून बहुतांशी ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतींचे संकेत आहेत.

जिल्ह्यात गावपातळीवरील निवडणुकांना खूप महत्त्व आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघते. गावाचा कारभारी आपल्याच पक्षाचा, गटाचा असावा अशी तयारी प्रत्येकाचीच राहते. त्यामुळे वरिष्ठ लोकप्रतिनिधीही गावात जाऊन मोर्चेबांधणी करतात. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होतो. आताही जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावोगावी मोर्चेबांधणी करून व्यूहरचना आखणे, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक १३० ग्रामपंचायती या सातारा तालुक्यातील आहेत. यानंतर पाटणमधील १०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे, तर कऱ्हाड १०४, खटाव तालुका ९०, फलटण ८०, वाई ७६, जावळी ७५, माण तालुक्यात ६१, खंडाळा ५७, कोरेगाव ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

८७८ ग्रामपंचायतींसाठी ७ हजार २६४ जणांना निवडून द्यायचे आहे. पण, प्रत्यक्षात अडीचपट म्हणजे १७ हजार ६४२ जणांनी अर्ज दाखल केलेले. मात्र, ३० डिसेंबरला छाननी झाल्यानंतर १७ हजार ४०७ अर्ज राहिले. आता सोमवार, दि. ४ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतरच निवडणूक लागलेल्या गावांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.

चौकट :

रुसवे, फुगवे काढण्यावर भर...

गावाचे राजकारण हे गट, तट आणि भावकी व गावकीतच खऱ्याअर्थाने रंगते. अनेकांना सदस्य, सरपंच व्हायचे असते. पण, प्रत्येकाच्या नशिबी हे येत नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवरील नेत्यांना इच्छुकांचे रुसवे, फुगवे काढावे लागले आहेत. काहींनी तर उमेदवारी अर्ज ठेवायचाच म्हणून नेत्यांपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे एकाच वॉर्डात अनेकजणांत लढत होणार आहे, तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यावर सोमवारी दुपारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

...........................................................