शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक : प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थांचे उरमोडीत जलसमर्पण

परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील वेणेखोल ग्रामस्थ व इतर २३ गावे उरमोडी जलाशयात बाधीत आहेत. संपूर्ण बाधीत आहेत, त्यांना पुनर्वसन मिळाले आहे; मात्र जी अशंत: बाधीत आहेत, त्यांना अजून शासनाने लोंबकळत ठेवले आहे. बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी तीन वाजता धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याबरोबर बैठक आहे. या बैठकीत प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थ उरमोडी जलाशयात जलसमर्पण करणार आहेत. आता आरपारची लढाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वेणेखोल ग्रामस्थांनी, दि. ३० रोजी उरमोडी धरणाच्या भिंतीवर उपोषण केले होते. हे उपोेषण सुमारे पाच तास सुरू होते. मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांनी तुमचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावून सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले होते. ती बैठक आता बुधवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. जर या बैठकीत पुनर्वसनाचा प्रश्न, ६५ टक्के रकमेचा प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व वेणेखोल ग्रामस्थ तसेच सातारा तालुक्यातील पुनवडी, दहिवड, आगटडवाडी, वडगाव, पाटेघर, बनघर, कासारथळ, नित्रळ आदी गावांतील ग्रामस्थ उरमोडी जलाशात जलसमर्पण करणार आहेत.बुधवारी होणाऱ्या बैठकीत जर प्रशासनाने पुढील बैठकीचे आश्वासन दिले तरी आम्ही ते मानणार नाही. बुधवारच्या बैठकीतच आमच्या मागण्यांचा निर्णय झाला पाहिजे, अशा पवित्र्यात धरणग्रस्त आहेत. (वार्ताहर)प्रशासनाशी आजची शेवटची बैठक...गेली १८ वर्षे २ महिने प्रशासन आम्हास आश्वासने देत आहेत. मात्र बुधवारी जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची वेणेखोल ग्रामस्थांची शेवटची निर्णायक बैठक असेल. यापुढे आम्ही आश्वासने स्वीकारणार नाही. आमचा पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागलाच पाहिजे; अन्यथा उरमोडीत जलसमर्पण आणि जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही सुमारे चारशे ग्रामस्थांनी दिला आहे.अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला होता. मात्र, प्रशासन आम्हास फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असून, ती बैठक ही आमची त्यांच्याशी शेवटची असणार आहे. यापुढे आम्ही आमच्यापरीने प्रश्न सोडवू. बैठकीत निर्णय न झाल्यास उरमोडीत जलसमर्पण करणार असून, आम्ही ग्रामस्थांनी आरपारची भूमिका घेतली आहे.-विठ्ठल सपकाळ, सदस्य-वेणेखोल धरणग्रस्त समिती