शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक : प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थांचे उरमोडीत जलसमर्पण

परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील वेणेखोल ग्रामस्थ व इतर २३ गावे उरमोडी जलाशयात बाधीत आहेत. संपूर्ण बाधीत आहेत, त्यांना पुनर्वसन मिळाले आहे; मात्र जी अशंत: बाधीत आहेत, त्यांना अजून शासनाने लोंबकळत ठेवले आहे. बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी तीन वाजता धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याबरोबर बैठक आहे. या बैठकीत प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थ उरमोडी जलाशयात जलसमर्पण करणार आहेत. आता आरपारची लढाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वेणेखोल ग्रामस्थांनी, दि. ३० रोजी उरमोडी धरणाच्या भिंतीवर उपोषण केले होते. हे उपोेषण सुमारे पाच तास सुरू होते. मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांनी तुमचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावून सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले होते. ती बैठक आता बुधवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. जर या बैठकीत पुनर्वसनाचा प्रश्न, ६५ टक्के रकमेचा प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व वेणेखोल ग्रामस्थ तसेच सातारा तालुक्यातील पुनवडी, दहिवड, आगटडवाडी, वडगाव, पाटेघर, बनघर, कासारथळ, नित्रळ आदी गावांतील ग्रामस्थ उरमोडी जलाशात जलसमर्पण करणार आहेत.बुधवारी होणाऱ्या बैठकीत जर प्रशासनाने पुढील बैठकीचे आश्वासन दिले तरी आम्ही ते मानणार नाही. बुधवारच्या बैठकीतच आमच्या मागण्यांचा निर्णय झाला पाहिजे, अशा पवित्र्यात धरणग्रस्त आहेत. (वार्ताहर)प्रशासनाशी आजची शेवटची बैठक...गेली १८ वर्षे २ महिने प्रशासन आम्हास आश्वासने देत आहेत. मात्र बुधवारी जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची वेणेखोल ग्रामस्थांची शेवटची निर्णायक बैठक असेल. यापुढे आम्ही आश्वासने स्वीकारणार नाही. आमचा पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागलाच पाहिजे; अन्यथा उरमोडीत जलसमर्पण आणि जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही सुमारे चारशे ग्रामस्थांनी दिला आहे.अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला होता. मात्र, प्रशासन आम्हास फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असून, ती बैठक ही आमची त्यांच्याशी शेवटची असणार आहे. यापुढे आम्ही आमच्यापरीने प्रश्न सोडवू. बैठकीत निर्णय न झाल्यास उरमोडीत जलसमर्पण करणार असून, आम्ही ग्रामस्थांनी आरपारची भूमिका घेतली आहे.-विठ्ठल सपकाळ, सदस्य-वेणेखोल धरणग्रस्त समिती