शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

बसथांबा एकीकडं..बस थांबते दुसरीकडं !

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

कऱ्हाडच्या विद्यानगरीतील स्थिती : घोळका पाहून चालक करतायत आयडिया; विद्यार्थ्यांची रस्त्यावर धावाधाव; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

पंकज भिसे - विद्यानगर  येथील महाविद्यालयांच्या बसथांब्यावर शेकडो विद्यार्थी बसची वाट पाहत थांबलेले असतात. काही वेळानंतर मसूर-काले ही कऱ्हाडला येणारी बस याठिकाणी पोहोचते; पण विद्यार्थ्यांची गर्दी पाहून चालक मुद्दाम थांब्यापासून काही अंतरावर जाऊन बस थांबवतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना धावपळ करीत बसपर्यंत जावे लागते. विद्यानगर येथे वेणुताई चव्हाण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, गाडगे महाराज कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय आदी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. या विद्यार्थ्यांना कॉलेजवर जाण्यासाठी कऱ्हाड बसस्थानकातून जावे लागते. कऱ्हाड बसस्थानकातही वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसात होते. त्यातच महाविद्यालयाच्या थांब्यावर बस थांबतच नसल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो.वेणुताई चव्हाण महाविद्यालयासमोर बसथांबा आहे. त्या थांब्यावर यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी कऱ्हाडला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेले असतात. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. ही गर्दी पाहिल्यानंतर चालक याठिकाणी बस थांबवतच नाहीत. थांब्यापासून काही अंतर पाठीमागे किंवा पुढे चालक बस थांबवतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींची बसमध्ये जाण्यासाठी धावपळ सुरू होते. या धावपळीतच धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांना दुखापती झाल्याच्या तसेच काहीवेळा पळापळीत युवती पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुळात हा रस्ता गर्दीचा असूनही येथे गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो. अशातच रस्त्यावर होणारी धावाधाव त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसमध्ये चढताना होणाऱ्या धक्काबुक्कीवेळी विद्यार्थ्यांचे पाय बसच्या चाकाखाली सापडणे किंवा दुसऱ्या वाहनाची धडक बसणे असे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ थांबण्यासाठी बस थांब्यावर कऱ्हाड आगाराने वाहतूक नियंत्रक नेमणे गरजेचे आहे. तसेच यावेळी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसूरहून येणारी बस याठिकाणी थांब्यावरच थांबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पाससाठीही होते ससेहोलपटविद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच शैक्षणिक प्रवास सवलत पास देण्याचा उपक्रम कऱ्हाड आगाराने यापूर्वी हाती घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढणे सोयीचे होत होते. सध्या मात्र पास काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कऱ्हाड बसस्थानकात यावे लागते. मसूरसह शामगाव भागातील विद्यार्थी खास पास काढण्यासाठी कऱ्हाडमध्ये जातात. त्यातून त्यांना रिक्षाचाही भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच पास कक्षात असणारे कर्मचारी वेळेत त्याठिकाणी उपस्थित नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. थांब्यावर जास्त विद्यार्थी नसतील तर चालक बस थांब्यावर थांबवितात. मात्र, जास्त गर्दी दिसली तर चालक थांब्यापासून काही अंतरावर जाऊन बस थांबवतात. एकतर आम्हाला घरी जायला उशीर झालेला असतो. त्यामुळे मिळेल ती बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव होते. हा प्रकार जीवघेणा आहे.- प्रथमेश पाटील, विद्यार्थी, कऱ्हाड