शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

लोणंद शहरात रंगला ‘बोरीचा बार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:40 IST

रात्र न् दिवस एक झाला : अधिवेशन सोडून आमदार निवडणुकीत तळ ठोकून

मुराद पटेल -- लोणंद -राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या लोणंद पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. कडक उन्हाने जिल्हा तापलेला असतानाच लोणंदमधील राजकीय वातावरणही ढवळून निघत आहे.लोणंद नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर पहिलीच पंचवार्षिक निवडणुकीला लोणंदकर सामोरे जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक युद्धाबरोबर भाजपाने तिसरा पर्याय निर्माण करत लोणंद नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. शिवसेनेने उमेदवार उभे केले असले तरीही त्यांची परिस्थिती अजूनही तळ्यात-मळ्यात असल्यासारखी झाली आहे. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काँग्रेसकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १३, शिवसेनेने ९ उमेदवार, रासप २ उमेदवार व अपक्ष १९ असे ७६ उमेदवार आपले नशीब लोणंद नगरपंचायतीमध्ये आजमावत आहे. दरम्यान, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. लोणंद नगरपंचायतीची लढत प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असून, भाजपाने जोरदार व आक्रमक व्यूहरचना आखत राजकीय वातावरण ढवळून काढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शिवसेना फक्त आरोप-प्रत्यारोपावर भर देत असून, शिवसेनेकडे व्यूहरचना आखण्यात नेतेमंडळी मशगूल दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे अधिवेशन सोडून दिवस-रात्र लोणंद-खंडाळ्यामध्ये ठाण मांडून बंडोबांना थंड करीत लोणंदमध्ये राष्ट्रवादीविरोधात असलेले वातावरण कशाप्रकारे निवळून सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती येईल, याची चाचपणी करत राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्याचा हातखंडा वापरत आहेत. दुसरीकडे शिवसेनेमध्ये आलेली मरगळ दूर करत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी शिरवळ येथे शिवसेनेमधील आजी-माजी नेत्यांना एकत्र करत लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता जोरदार रणनीती आखली आहे. लोणंदकरांना जोरदार राजकीय धुळवड पाहण्यास मिळत आहे. एकूणच निवडणूक लोणंद नगरंपचायतीची रणनीती मात्र शिरवळ-खंडाळ्यात अशी स्थिती राजकीय पक्षांची झाली आहे. राजकीय रणनीती आखण्यात नेते मश्गुलकोणत्या प्रभागात कोणता उमेदवार प्रबळ ठरणार आहे. कोणत्या उमेदवाराची ताकद कमी पडत आहे किंवा विरोधक कोठे कमकुवत आहे. याचा विचार करुन रणनिती आखली जात आहे. सर्वच नेते मंडळी रात्रंदिवस एक करुन प्रचार करत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लावून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.