शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

बंदोबस्ताला दिवसा शिक्षक; रात्री सारं काही रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व देखभालीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिक्षकांची नेमणूक केलेली असते. रात्रभर कोणीच नसल्याने सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे रुग्ण पळून जाण्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही नऊ जणांपैकी दोघेजण मायणी आणि विटा येथे उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत, तर बाकीच्यांचा तपास लागला नाही.

याबाबत माहिती अशी की, मायणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मायणी गाव व गावाच्या शेजारच्या वाड्यावस्त्यांवरील कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्थानिक कोरोना कमिटीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास सेंटरमध्ये असलेले नऊ रुग्ण निघून गेले होते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणीही जबाबदार व्यक्ती या आयसोलेशन सेंटरवर उपस्थित नव्हता, असे सकाळी समोर आले.

याबाबत माहिती घेतली असता या आयसोलेशन सेंटरसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठराविक वेळेसाठी एका एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. दिवसा शिक्षक आपली जबाबदारी यशस्वी पार पाडत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी या सेंटरमध्ये उपचारासाठी किंवा विलगीकरण झालेल्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे हे रुग्ण रात्रीच्या वेळी आयसोलेशन सेंटरमधून निघून गेले.

त्यामुळे या आयसोलेशन सेंटरची जबाबदारी कोणाची, सायंकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोण जबाबदारी घेणार? यासाठी स्थानिक कोरोना कमिटीने कोणाची नेमणूक केली आहे, येथे एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे अनेक प्रश्न मायणीतील शुक्रवारच्या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

चौकट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. बाधित रुग्णांनी स्वतःबरोबर समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही जबाबदार राहणे आवश्यक आहे.

चौकट

बहुतांश गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दिवसा शिक्षक व रात्रीच्या वेळी कोणीही नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व ठिकाणीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक किंवा जबाबदार व्यक्ती ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.