शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बंदोबस्ताला दिवसा शिक्षक; रात्री सारं काही रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व देखभालीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिक्षकांची नेमणूक केलेली असते. रात्रभर कोणीच नसल्याने सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे रुग्ण पळून जाण्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही नऊ जणांपैकी दोघेजण मायणी आणि विटा येथे उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत, तर बाकीच्यांचा तपास लागला नाही.

याबाबत माहिती अशी की, मायणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मायणी गाव व गावाच्या शेजारच्या वाड्यावस्त्यांवरील कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्थानिक कोरोना कमिटीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास सेंटरमध्ये असलेले नऊ रुग्ण निघून गेले होते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणीही जबाबदार व्यक्ती या आयसोलेशन सेंटरवर उपस्थित नव्हता, असे सकाळी समोर आले.

याबाबत माहिती घेतली असता या आयसोलेशन सेंटरसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठराविक वेळेसाठी एका एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. दिवसा शिक्षक आपली जबाबदारी यशस्वी पार पाडत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी या सेंटरमध्ये उपचारासाठी किंवा विलगीकरण झालेल्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे हे रुग्ण रात्रीच्या वेळी आयसोलेशन सेंटरमधून निघून गेले.

त्यामुळे या आयसोलेशन सेंटरची जबाबदारी कोणाची, सायंकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोण जबाबदारी घेणार? यासाठी स्थानिक कोरोना कमिटीने कोणाची नेमणूक केली आहे, येथे एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे अनेक प्रश्न मायणीतील शुक्रवारच्या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

चौकट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. बाधित रुग्णांनी स्वतःबरोबर समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही जबाबदार राहणे आवश्यक आहे.

चौकट

बहुतांश गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दिवसा शिक्षक व रात्रीच्या वेळी कोणीही नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व ठिकाणीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक किंवा जबाबदार व्यक्ती ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.