शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बंदोबस्ताला दिवसा शिक्षक; रात्री सारं काही रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व देखभालीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिक्षकांची नेमणूक केलेली असते. रात्रभर कोणीच नसल्याने सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे रुग्ण पळून जाण्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही नऊ जणांपैकी दोघेजण मायणी आणि विटा येथे उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत, तर बाकीच्यांचा तपास लागला नाही.

याबाबत माहिती अशी की, मायणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मायणी गाव व गावाच्या शेजारच्या वाड्यावस्त्यांवरील कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्थानिक कोरोना कमिटीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास सेंटरमध्ये असलेले नऊ रुग्ण निघून गेले होते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणीही जबाबदार व्यक्ती या आयसोलेशन सेंटरवर उपस्थित नव्हता, असे सकाळी समोर आले.

याबाबत माहिती घेतली असता या आयसोलेशन सेंटरसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठराविक वेळेसाठी एका एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. दिवसा शिक्षक आपली जबाबदारी यशस्वी पार पाडत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी या सेंटरमध्ये उपचारासाठी किंवा विलगीकरण झालेल्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे हे रुग्ण रात्रीच्या वेळी आयसोलेशन सेंटरमधून निघून गेले.

त्यामुळे या आयसोलेशन सेंटरची जबाबदारी कोणाची, सायंकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोण जबाबदारी घेणार? यासाठी स्थानिक कोरोना कमिटीने कोणाची नेमणूक केली आहे, येथे एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे अनेक प्रश्न मायणीतील शुक्रवारच्या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

चौकट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. बाधित रुग्णांनी स्वतःबरोबर समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही जबाबदार राहणे आवश्यक आहे.

चौकट

बहुतांश गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दिवसा शिक्षक व रात्रीच्या वेळी कोणीही नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व ठिकाणीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक किंवा जबाबदार व्यक्ती ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.