शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उसाच्या पट्ट्यात केळीची शेती जोमदार !

By admin | Updated: December 1, 2015 00:23 IST

कऱ्हाड तालुक्यातील स्थिती : एकरी चाळीस टनांपर्यंत उत्पादन; दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी

‘कृष्णा-कोयना नदीकाठावरील शेतकरी उसाबरोबरच इतर पिकांकडेही वळत आहेत. तीन वर्षांत उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्याला अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नगदी पीक म्हणून घेतलेल्या या पिकातून शेतकऱ्यांना एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळत आहे. कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयनाच्या दुतर्फा सुपीक शेतीचा पट्टा आहे. येथील शेतकरी अनेक वर्षांपासून ऊस व भात शेती करण्याला प्राधान्य देत होते. गेल्या काही वर्षांपासून ऊसदरात सातत्याने घसरण झाली. याचा परिणाम म्हणून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी इतर पिके पिकविण्यास प्रारंभ केला. कऱ्हाड-मलकापूर शहरापासून जवळ असलेल्या कापील, गोळेश्वर, नांदलापूर, जखिणवाडी, वारुंजी, चचेगाव, कार्वे, गोवारे या गावांमधून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकविण्याला पसंती दिली. तर काही शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या परिसरात मोजकेच शेतकरी केळीचे उत्पादन घेत होते. मात्र, काही वर्षांपासून जखिणवाडी, चचेगाव, विंग, येरवळे, काले या परिसरातील शेतकऱ्यांनीही केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस पट्ट्यातही केळीच्या बागा जोमाने डोलू लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सध्या केळीच्या लागणीला एकरी ३५ ते ४५ टनाचे उत्पन्न मिळते. तर खोडव्याला २५ ते ३० टनांपर्यंत उत्पन्न घेण्यात येते. कऱ्हाडात तीनच घाऊक व्यापारीकऱ्हाड तालुक्यात केळीच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी त्या प्रमाणात मार्केट मात्र उपलब्ध नाही. सध्या शेतकऱ्यांचा केळीचा माल घेणारे घाऊक व्यापारी जेमतेम तीनच आहेत. त्यांचीही संपूर्ण उत्पादन घेण्याची व ते साठवूणक करण्याची क्षमता अपुरी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना बाहेरची बाजारपेठ परवडत नाही.शेतकऱ्याला सध्या घाऊक बाजारात सरासरी सहा ते सात रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्याच केळी घाऊक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना १२ ते १३ रुपये किलोने विक्री करतात. तेच विक्रेते ग्राहकांना २५ ते ४० रुपये डझनने केळीची विक्री करतात. खोडव्याला निम्माच दर...लागणीच्या पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षीच्या केळीच्या खोडव्याला एकरी २५ ते ३० टनच उत्पादन निघते. या केळीच्या मालाची प्रत लागणीच्या तुलनेत लहान असते. त्यामुळे प्रतिटनाला चार ते पाच हजारांचा दर मिळत आहे. माणिक डोंगरे