शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

रिमझिम पाऊस अन् ढगाळ वातावरणाने बळीराजाची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

फलटण : फलटण तालुक्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र, आठवड्यापासून सततचे ...

फलटण : फलटण तालुक्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र, आठवड्यापासून सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या धास्तीने बळीराजा चिंतेत आहे.

फलटण तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यंदा कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जानेवारी सुरू होऊनही अपेक्षित थंडी वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने गव्हावर करपा, तांबेरा येऊ लागला आहे. यासोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन झाले असून, शेतकरी आता ऊसतोडणी झाल्यावर गहू लावण्यात मग्न झालेला आहे. काही ठिकाणी गव्हाच्या पिकांची वाढ चांगले होत असताना, प्रतिकूल वातावरणामुळे त्यांच्या पिकांना फटका बसू शकतो.

थंडी असली की गहू आणि उसाच्या पिकाला चांगला फायदा होतो. सरासरी उत्पन्न वाढते; मात्र अपेक्षित थंडी अजूनही पडलेली नाही. त्यातच सोमवारी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले आहे, तर ऊसतोडणी कामगारांचे तात्पुरत्या निवाऱ्यामुळे भिजतच रात्र काढावी लागली आहे . या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यालाही करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे.

चौकट

महागड्या औषधांची फवारणी

या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय, या धास्तीने शेतकरीवर्ग संध्या चिंतेत पडला आहे.

कोट

ढगाळ वातावरण आणि अचानक आलेल्या पावसाचा द्राक्षे, गहू या पिकांवर परिणाम होऊ शकतो. गव्हावर तांबेरा, करपा रोग पडू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागू शकते. कृषी विभागाने कृषी सहायकांना बांधावर जाऊन पाहणी करायला लावली आहे.

- सुहास रणसिंग,

तालुका कृषी अधिकारी, फलटण

०५फलटण-क्रॉप

फलटण तालुक्यात यंदा गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र पावसामुळे नुकसान होण्याची भीती सतावत आहे. (छाया : नसीर शिकलगार)