शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माणमधील बळीराजा आता तिहेरी संकटात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

म्हसवड : सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून, अनियमित विजेची समस्या, खते मागणीच्या प्रमाणात उपलब्ध ...

म्हसवड : सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून, अनियमित विजेची समस्या, खते मागणीच्या प्रमाणात उपलब्ध नाहीत तसेच अद्यापही पावसाने दमदार सुरुवात न केल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा तिहेरी संकटांचा सामना दुष्काळी माणचा बळीराजा करीत आहे.

वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे कंपनी महासमस्यांची कंपनी बनली असून, वीज कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी असून दुष्काळी भागातील पिकांना पाणी न देता आल्याने उभी पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत. येथील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, कर्मचारी वेळेवर काम करीत नाहीत, फिडरच्या इनकमिंग लाईन ब्रेकर होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत आहे.

विजेचा लोड नसेल, तर एवढ्या वेळा ट्रिपिंग होऊन वीज खंडित का होते? शासनाने शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत चालावा, वीज खंडित होऊ नये, यासाठी येथील सबस्टेशनला तीन-तीन वाहिन्या म्हसवड शहरासाठी वीज कायमस्वरूपी देण्यासाठी जोडल्या आहेत; पण प्रत्यक्षात दोनच सुरू असून, पिंपरी लोड शिल्लक नाही, तर शेनवडी वाहिनी अद्याप कार्यान्वित झाली नाही. फक्त मायणी वाहिनीवरूनच पुरवठा सुरू असून, या वाहिनीवर अनेकवेळा दोष निर्माण होतात व जादा दाबामुळे अनेकवेळा वीज खंडित होते; तर पावसाळ्यात पावसाचे थेंब पडायला लागले की वीज गायब होते; शेतकऱ्यांची पिके वाळून जातात, पीक हातचे जाते. याला जबाबदार कोण? शेती वाहिनी कामासाठी बंद केली, तर त्याची वेळ वाढवून दिली जात नाही. शहरातही वीज बारा-बारा तास पावसाळ्यात गायब होते. तिन्ही वाहिन्या असून, या कामांच्या ढिसाळपणा व दुर्लक्षामुळे शहरातील व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागते.

(चौकट)

याला जबाबदार कोण?

तत्कालीन राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून २००९-१० मध्ये ३३ कोटी खर्चाचे म्हसवड येथे विद्युत उपकेंद्र मंजूर केले. यासाठी जमीन अधिग्रहण केली गेली. पण येथे उपकेंद्राची गरज नसल्याचे नंतर आलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करीत त्यावेळेस म्हसवड भागात मागणी कमी आहे, असे दाखवून त्या ठिकाणी सोलर सौरऊर्जा प्रकल्प माथी मारत कार्यान्वित केला गेल्याने आजपर्यंत दहा वर्षें उलटूनही गरज असतानाही विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. ते झाले तर वारंवार वीज खंडित होणे ,कमी दाबाने वीज मिळण्याच्या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका झाली असती.

(कोट..)

शेजारील सोलापूर, सांगली जिल्ह्यातून खते आणावी लागत आहेत. तिथे तत्काळ उपलब्ध होत आहेत. आपल्या इथे का मिळत नाहीत, तसेच औषधे, बी-बियाणे चढ्या भावात विक्री केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तालुक्यातील संबंधित कृषी खात्याच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली.

- प्रकाश पवार, तालुका कृषी अधिकारी

कोट...

युरिया मागणीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना ५० टक्केच पुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. पण सबडिस्ट्रिब्युटरने युरियाची मागणी केल्याप्रमाणातच युरियाचा पुरवठा होत आहे. पण दुकानदारांची मागणी कमी असल्याने पुरवठा कमी होत आहे.

- बाळासाहेब माने, शेतकरी