शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील बळीराजा आता तिहेरी संकटात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

म्हसवड : सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून, अनियमित विजेची समस्या, खते मागणीच्या प्रमाणात उपलब्ध ...

म्हसवड : सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून, अनियमित विजेची समस्या, खते मागणीच्या प्रमाणात उपलब्ध नाहीत तसेच अद्यापही पावसाने दमदार सुरुवात न केल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा तिहेरी संकटांचा सामना दुष्काळी माणचा बळीराजा करीत आहे.

वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे कंपनी महासमस्यांची कंपनी बनली असून, वीज कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी असून दुष्काळी भागातील पिकांना पाणी न देता आल्याने उभी पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत. येथील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, कर्मचारी वेळेवर काम करीत नाहीत, फिडरच्या इनकमिंग लाईन ब्रेकर होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत आहे.

विजेचा लोड नसेल, तर एवढ्या वेळा ट्रिपिंग होऊन वीज खंडित का होते? शासनाने शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत चालावा, वीज खंडित होऊ नये, यासाठी येथील सबस्टेशनला तीन-तीन वाहिन्या म्हसवड शहरासाठी वीज कायमस्वरूपी देण्यासाठी जोडल्या आहेत; पण प्रत्यक्षात दोनच सुरू असून, पिंपरी लोड शिल्लक नाही, तर शेनवडी वाहिनी अद्याप कार्यान्वित झाली नाही. फक्त मायणी वाहिनीवरूनच पुरवठा सुरू असून, या वाहिनीवर अनेकवेळा दोष निर्माण होतात व जादा दाबामुळे अनेकवेळा वीज खंडित होते; तर पावसाळ्यात पावसाचे थेंब पडायला लागले की वीज गायब होते; शेतकऱ्यांची पिके वाळून जातात, पीक हातचे जाते. याला जबाबदार कोण? शेती वाहिनी कामासाठी बंद केली, तर त्याची वेळ वाढवून दिली जात नाही. शहरातही वीज बारा-बारा तास पावसाळ्यात गायब होते. तिन्ही वाहिन्या असून, या कामांच्या ढिसाळपणा व दुर्लक्षामुळे शहरातील व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागते.

(चौकट)

याला जबाबदार कोण?

तत्कालीन राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून २००९-१० मध्ये ३३ कोटी खर्चाचे म्हसवड येथे विद्युत उपकेंद्र मंजूर केले. यासाठी जमीन अधिग्रहण केली गेली. पण येथे उपकेंद्राची गरज नसल्याचे नंतर आलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करीत त्यावेळेस म्हसवड भागात मागणी कमी आहे, असे दाखवून त्या ठिकाणी सोलर सौरऊर्जा प्रकल्प माथी मारत कार्यान्वित केला गेल्याने आजपर्यंत दहा वर्षें उलटूनही गरज असतानाही विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. ते झाले तर वारंवार वीज खंडित होणे ,कमी दाबाने वीज मिळण्याच्या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका झाली असती.

(कोट..)

शेजारील सोलापूर, सांगली जिल्ह्यातून खते आणावी लागत आहेत. तिथे तत्काळ उपलब्ध होत आहेत. आपल्या इथे का मिळत नाहीत, तसेच औषधे, बी-बियाणे चढ्या भावात विक्री केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तालुक्यातील संबंधित कृषी खात्याच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली.

- प्रकाश पवार, तालुका कृषी अधिकारी

कोट...

युरिया मागणीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना ५० टक्केच पुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. पण सबडिस्ट्रिब्युटरने युरियाची मागणी केल्याप्रमाणातच युरियाचा पुरवठा होत आहे. पण दुकानदारांची मागणी कमी असल्याने पुरवठा कमी होत आहे.

- बाळासाहेब माने, शेतकरी