शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ला परेशान; आरोग्यासोबत अर्थकारणही बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

लोकमत नेटवर्क सातारा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोरोना महामारीमुळे परेशान आहे. जिल्ह्यातील लोकांची सोसण्याची मानसिकता संपलेली आहे. जिल्ह्याचे अर्थकारण ...

लोकमत नेटवर्क

सातारा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोरोना महामारीमुळे परेशान आहे. जिल्ह्यातील लोकांची सोसण्याची मानसिकता संपलेली आहे. जिल्ह्याचे अर्थकारण कोरोनाने पूर्णत: मोडकळीस आणले. यंत्रणेतील दोषांमुळे आरोग्यदेखील धोक्यात आलेले आहे. एक घाव दोन तुकडे.. असे निर्णय घेण्याची क्षमता असणारे अजित पवारच या परिस्थितीवर नेमका उपचार शोधतील, अशी जनतेला आशा आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आज साताऱ्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये कोरोनाबाबतीत प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. तो घेत असताना जिल्ह्यातील उद्योगपती, व्यापारी, खासगी नोकरदार, हातावर पोट असलेले नागरिक यांचा विचार केला जावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या कमी व्हायला मार्ग दिसत नाही. उद्योगधंदे बंद आहेत, मोलमजुरी करणाऱ्यांना हातात पैसा मिळत नाही. व्यापाऱ्यांची कर्जे थकली आहेत, बँका त्यांच्याकडून व्याज आकारत आहेत, शेतमाल शेतातच कुजून जात आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सगळीच व्यवस्था पूर्णपणे मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी सारासार विचार करून जिल्ह्यासाठी निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सैरभैर झालेली आहे. कोरोनाबरोबरच आता म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार जिल्ह्यात घुसला आहे. या सर्व परिस्थितीला सामोरे जात असताना आरोग्य यंत्रणा तुटपुंजी पडते आहे. या बिकट परिस्थितीतच अनेक खासगी दवाखाने रुग्णांची लूटमार करीत असल्याने गोरगरीब जनता घरातच बसून मरणाची वाट बघते आहे. या जनतेला वाचविण्यासाठी आणि जिल्ह्याचे अर्थकारण सावरण्यासाठी मंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा, अशी जनतेची इच्छा आहे.

आरोग्य विभागाला पुरेसे कर्मचारी द्या.

सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने अक्षरशः कहर माजवला आहे. गेल्या महिनाभरापासून दोन हजारांच्या वर रुग्ण सापडत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये एका वैद्यकीय तज्ज्ञाला तब्बल २० रुग्ण तपासावे लागत आहेत. यामध्ये इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ शकते. आता तरी आरोग्य विभागाला पुरेसे कर्मचारी द्यावेत.

औषधांचा साठा मुबलक का मिळत नाही?

जिल्ह्यातील शासकीय दवाखान्यात एकूण ६३ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरू आहेत. मात्र औषधांचा तुटवडा आहे. अनेकदा ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही. औषधे वेळेवर मिळाली नाहीत तर रुग्णांचा जीव जातो. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात रोज ३०-४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहेत. यातून बोध घेऊन जिल्ह्यात औषधांचा मुबलक साठा असणे आवश्यक आहे.

शासकीय महाविद्यालयाची वीट एकदाची रचा

सातारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ५०० खाटांचे मोठे हॉस्पिटल आणि तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. मंत्रिमंडळ बैठकांमध्ये अनेकदा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध केल्याची माहिती दिली जाते. मग आता घोडे कुठे अडले आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय महाविद्यालयाची वीट एकदाची रचावी, अशी सातारकरांची भावना आहे.

जिल्ह्याबाहेरच्या लोकांना वाचवायला ते जिल्हे समर्थ आहेत

सातारा जिल्हा कोरोना महामारीच्या बाबतीत रेड झोनमध्ये आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबरच मृत्यूदेखील वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासन हतबल झाल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यातील लोकांचा जीव वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अजूनही जिल्ह्याच्या बाहेरील लोक सातारा जिल्ह्यात येऊन उपचार घेत आहेत. अशा वेळी शासकीय दवाखान्यांमध्ये जिल्ह्यातील लोकांना बेड उपलब्ध होत नाहीत. यातदेखील मंत्र्यांना लक्ष घालावे लागेल.