शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पारगावचे ढमाळ बनले ‘बजरंगी भाईजान’

By admin | Updated: September 17, 2015 00:44 IST

हरियाणातील भाऊ बेपत्ता : असंख्य ठिकाणी फोनाफोनी केल्यानंतर भेटले नातेवाईक

मुराद पटेल / शिरवळ स्मृतिभंश होऊन, नातेवाइकांपासून तब्बल साडेतीन वर्षे लांब राहिल्यानंतर एक देवदूत बनलेल्या अवलियामुळे हरियाणाच्या दोन सख्ख्या भावांची भेट झाली. ही अविस्मरणीय भेट घडवून आणली पारगावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ यांनी. हरियाणा राज्यातील औरंगाबाद (ता. जगाधरी जि. यमुनानगर) येथील चालक असलेला सोहम चरन सिंह ( वय ४५) हा स्मृतिभंश होऊन सुमारे साडेतीन वर्षांपासून घर सोडून फिरत फिरत खंबाटकी घाटात असणाऱ्या युवराज ढमाळ यांच्या हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. यावेळी ढमाळ यांनी त्याला चहा-नाष्टा देऊन आस्थेने चौकशी केली असता त्याला फक्त स्वत:चे आणि वडिलांचे नाव व गावचे नाव सांगता येत होते. यावेळी युवराज ढमाळ यांनी मोबाइल इंटरनेटवर शोध घेत सोहमच्या शोध घेतला असता ते हरियाणा राज्यातील असल्याचे समोर आले. यानंतर एक तासाच्या अथक परिश्रमानंतर हरियाणा राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये खात्री करून कोणत्याही शासकीय मदतीविना एका हवालदाराकडून सोहमने सांगितलेल्या गावातील माजी सरपंचांचा मोबाइल नंबर मिळवून संपर्क साधला. सोहम यांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला असता, तो त्या गावातीलच असून साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजले. मग सोहमला विश्वासात घेत युवराज यांनी आपल्या घरी आणले. त्याला नवीन कपडे देऊन स्वत:च्या घरातील कुटुंबातील एक सदस्य समजून सोहम सिंहची देखभाल केली. कारण सोहमच्या नातेवाइकांच्याकडे महाराष्ट्रात येण्यासाठी पैशांची कमतरता होती . यावेळी युवराज ढमाळ यांनी ‘तुम्ही येईपर्यंत मी त्यांचा सांंभाळ करतो,’ असे सांगितल्याने नातेवाईक निश्चिंत झाले. दरम्यान, सोहम सिंहचा सख्खा भाऊ जय सिंह व चुलतभाऊ रिंकू सिंह आल्यानंतर खात्री करीत सख्ख्या भावाच्या ताब्यात ढमाळ यांनी सोहमला दिले. यावेळी तब्बल साडेतीन वर्षांनंतर भावाची भेट झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत होता.