शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जळीतग्रस्तांना मदतीच्या नावाखाली आश्वासनांची खैरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या ...

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या खैरातीच मिळाल्या आहेत. मदतीच्या आशेने येथील कुटुंबीय ऊन, वारा, पाऊस आदी नैसर्गिक संकटांना सामोरे जात आपले हलाखीचे आयुष्य जगत आहेत.

वरचे घोटील येथील पवार कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागली. आग निदर्शनास येताच कुटुंबातील लहान - मोठी माणसे घराबाहेर पडली. मात्र, घराशेजारी असलेल्या गोठ्यातील चार ते पाच जनावरे या आगीत होरपळून मृत्यूमुखी पावली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगीच्या दुर्घटनेत धान्य, कपडे, शेतीची अवजारे, दागिने, पैसे असे एकूण २२ लाखांचे नुकसान झाले. पवार कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ हळहळले. संबंधित कुटुंबियांना विभागातील ग्रामस्थांनी धान्य, कपडे तसेच इतर साहित्याची मदत केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता चार वर्षे झाली. तरीही या कुटुंबीयांना एक रुपयाचीही शासकीय मदत मिळाली नाही. शिवाय तातडीने सर्वेक्षण करून घरे बांधून देऊ, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी पुन्हा त्याठिकाणी फिरकलेही नाहीत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून विशेष बाब म्हणून घरकुल मिळावे, यासाठी पवार कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यालाही यश मिळत नाही. जळीतग्रस्त सहा कुटुंबे चार वर्षांपासून निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाचे दरवाजेही त्यांनी ठोठावले. मात्र, पदरी निराशाच आली.

- चौकट

वरचे घोटील हे गाव वाल्मिक पठारावरील डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. हे गाव अनेक नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेले आहे. पावसाळ्यात डोंगर पठारावरील दरड कोसळणे, रस्ता खचणे, अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाणे, पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होणे अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.

- चौकट

वरचे घोटील येथील जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळणार असल्याने सुरूवातीला त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, शासन दरबारी आपली फरपट होईल, हे त्यांना माहीत नव्हते. तब्बल वर्षभर शासनाच्या तालुका, जिल्हा कार्यालयात त्यांनी हेलपाटे मारले. मात्र, शासनाकडून एक छदामही मदत मिळालेली नाही. अजूनही हे कुटुंब शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

- कोट

गत चार वर्षांपासून आम्ही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. आम्हाला तातडीने मदत देतो, असे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमचे २२ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, एक रुपयाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.

- मारूती पवार, जळीतग्रस्त