शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जळीतग्रस्तांना मदतीच्या नावाखाली आश्वासनांची खैरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या ...

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या खैरातीच मिळाल्या आहेत. मदतीच्या आशेने येथील कुटुंबीय ऊन, वारा, पाऊस आदी नैसर्गिक संकटांना सामोरे जात आपले हलाखीचे आयुष्य जगत आहेत.

वरचे घोटील येथील पवार कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागली. आग निदर्शनास येताच कुटुंबातील लहान - मोठी माणसे घराबाहेर पडली. मात्र, घराशेजारी असलेल्या गोठ्यातील चार ते पाच जनावरे या आगीत होरपळून मृत्यूमुखी पावली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगीच्या दुर्घटनेत धान्य, कपडे, शेतीची अवजारे, दागिने, पैसे असे एकूण २२ लाखांचे नुकसान झाले. पवार कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ हळहळले. संबंधित कुटुंबियांना विभागातील ग्रामस्थांनी धान्य, कपडे तसेच इतर साहित्याची मदत केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता चार वर्षे झाली. तरीही या कुटुंबीयांना एक रुपयाचीही शासकीय मदत मिळाली नाही. शिवाय तातडीने सर्वेक्षण करून घरे बांधून देऊ, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी पुन्हा त्याठिकाणी फिरकलेही नाहीत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून विशेष बाब म्हणून घरकुल मिळावे, यासाठी पवार कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यालाही यश मिळत नाही. जळीतग्रस्त सहा कुटुंबे चार वर्षांपासून निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाचे दरवाजेही त्यांनी ठोठावले. मात्र, पदरी निराशाच आली.

- चौकट

वरचे घोटील हे गाव वाल्मिक पठारावरील डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. हे गाव अनेक नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेले आहे. पावसाळ्यात डोंगर पठारावरील दरड कोसळणे, रस्ता खचणे, अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाणे, पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होणे अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.

- चौकट

वरचे घोटील येथील जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळणार असल्याने सुरूवातीला त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, शासन दरबारी आपली फरपट होईल, हे त्यांना माहीत नव्हते. तब्बल वर्षभर शासनाच्या तालुका, जिल्हा कार्यालयात त्यांनी हेलपाटे मारले. मात्र, शासनाकडून एक छदामही मदत मिळालेली नाही. अजूनही हे कुटुंब शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

- कोट

गत चार वर्षांपासून आम्ही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. आम्हाला तातडीने मदत देतो, असे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमचे २२ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, एक रुपयाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.

- मारूती पवार, जळीतग्रस्त