शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जळीतग्रस्तांना मदतीच्या नावाखाली आश्वासनांची खैरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या ...

सणबूर : तब्बल चार वर्षे झाली तरी वाल्मिक पठारावरील वरचे घोटील, ता. पाटण येथील जळीतग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीच्या आश्वासनाच्या खैरातीच मिळाल्या आहेत. मदतीच्या आशेने येथील कुटुंबीय ऊन, वारा, पाऊस आदी नैसर्गिक संकटांना सामोरे जात आपले हलाखीचे आयुष्य जगत आहेत.

वरचे घोटील येथील पवार कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागली. आग निदर्शनास येताच कुटुंबातील लहान - मोठी माणसे घराबाहेर पडली. मात्र, घराशेजारी असलेल्या गोठ्यातील चार ते पाच जनावरे या आगीत होरपळून मृत्यूमुखी पावली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगीच्या दुर्घटनेत धान्य, कपडे, शेतीची अवजारे, दागिने, पैसे असे एकूण २२ लाखांचे नुकसान झाले. पवार कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ हळहळले. संबंधित कुटुंबियांना विभागातील ग्रामस्थांनी धान्य, कपडे तसेच इतर साहित्याची मदत केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता चार वर्षे झाली. तरीही या कुटुंबीयांना एक रुपयाचीही शासकीय मदत मिळाली नाही. शिवाय तातडीने सर्वेक्षण करून घरे बांधून देऊ, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी पुन्हा त्याठिकाणी फिरकलेही नाहीत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून विशेष बाब म्हणून घरकुल मिळावे, यासाठी पवार कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यालाही यश मिळत नाही. जळीतग्रस्त सहा कुटुंबे चार वर्षांपासून निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाचे दरवाजेही त्यांनी ठोठावले. मात्र, पदरी निराशाच आली.

- चौकट

वरचे घोटील हे गाव वाल्मिक पठारावरील डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. हे गाव अनेक नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेले आहे. पावसाळ्यात डोंगर पठारावरील दरड कोसळणे, रस्ता खचणे, अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाणे, पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होणे अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.

- चौकट

वरचे घोटील येथील जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळणार असल्याने सुरूवातीला त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, शासन दरबारी आपली फरपट होईल, हे त्यांना माहीत नव्हते. तब्बल वर्षभर शासनाच्या तालुका, जिल्हा कार्यालयात त्यांनी हेलपाटे मारले. मात्र, शासनाकडून एक छदामही मदत मिळालेली नाही. अजूनही हे कुटुंब शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

- कोट

गत चार वर्षांपासून आम्ही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. आम्हाला तातडीने मदत देतो, असे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमचे २२ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, एक रुपयाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.

- मारूती पवार, जळीतग्रस्त