शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

गिरवीकरांचा ‘हात’ आगवणेंच्या पाठीवर

By admin | Updated: October 23, 2014 22:48 IST

फलटणचे राजकारण : काकडेंपेक्षा मिळाली जादा मते

वाठार निंबाळकर : विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गिरवी गटात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची केलेली पाठराखण, तर माजी आमदार चिमणराव कदम यांच्या गिरवी गावात त्यांनी उभे केलेले पोपटराव काकडे तीन क्रमांकावर, असे चित्र पाहायला मिळत आहे.माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या पोपटराव काकडे यांना मत द्यायचे की काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना द्यायचे. मात्र, झालेल्या मतदानामध्ये राष्ट्रवादी ५६२ मते, काँग्रेसला २,२७५ तर स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १७७ मते पडली. धुमाळवाडीत राष्ट्रवादीला १२२ मते, काँगे्रसला ५४३ मते, स्वाभिमानीला २४ मते पडली.बोडकेवाडीत राष्ट्रवादीला १२८ मते, काँग्रेसला २४५ मते पडली, दरेवाडीत राष्ट्रवादीला १७० मते, काँग्रेसला १६० मते, उपळवेत राष्ट्रवादीला २१९ मते, काँग्रेसला २४१ मते उपळवेत दुसऱ्या बुथवर राष्ट्रवादीला २५५, तर काँग्रेसला २९२ मते पडली.वेळोशीत राष्ट्रवादीला ३११ मते, काँग्रेसला १३० मते, तरडफगावात राष्ट्रवादीला ६८९ मते तर काँग्रेसला १५८ मते पडली. मानेवाडीत राष्ट्रवादीला ११५ मते, काँग्रेसला १२१ मते पडली. ताथवडा गावात राष्ट्रवादीला ४७३ मते, तर काँगे्रसला १५१ मते, तर शिवसेनेला ४५ मते पडली. झडकबाईचीवाडी गावात राष्ट्रवादीला १२९ मते, काँग्रेसला ११२ मते पडली. मिरेवाडीत राष्ट्रवादीला २४६ मते, तर काँग्रेसला १५६ मते पडली.विंचुर्णी गावात राष्ट्रवादीला २०१ मते, तर काँग्रेसला २३६ मते पडली. निरगुडीत राष्ट्रवादीला ६३७ मते, तर काँग्रेसला १०२८ मते पडली. मांडवखडकमध्ये राष्ट्रवादीला २०७ मते, काँग्रेसला ४०५ मते तर राष्ट्रवादीला २८४ मते पडली.ढवळगावात राष्ट्रवादीला ६१७ मते, काँग्रेसला ६७० मते तर स्वाभिमानीला १९० मते पडली. पिराचीवाडी गावात राष्ट्रवादीला १५० मते, काँग्रेसला ७९ मते, शिवसेनेला २४ मते पडली. एकूण गिरवी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांना १०,३३० मते तर काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांना १०,२१६ स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १,४१५ मते पडली. (वार्ताहर)गटाची सत्ता काँगे्रसला फायद्याचीगिरवी जिल्हा परिषद गटाचे सदस्यत्व काँग्रेसकडे असून, एक पंचायत समिती गण काँग्रेसकडे तर एक गण राष्ट्रवादीकडे आहे. या गटात काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. गिरवी, ता. फलटण हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे निवडणुकीत गावामध्ये तणावाचे वातावरण होते. तरीही या गावातून दिगंबर आगवणे यांना आघाडी मिळाली.