शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

बाबाराजे म्हणाले, ‘हे किती दिवसांचे पाहुणे’

By admin | Updated: October 6, 2014 22:43 IST

जाहीरनामा प्रसिध्द : सातारा-जावळीतील भाजपच्या उमेदवारावर केली सडकून टीका

सातारा : ‘माझ्याविरोधात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार एका घरात कधी जास्त काळ राहिले नाहीत. त्यांनी आधीच काँगे्रस, शिवसेना असा प्रवास केला आहे. आता ते किती दिवस भाजपचे पाहुणे असणार आहेत, हे भाजप निष्ठावंतांनी माहिती करून घेऊनच त्यांचा प्रचार करावा,’ अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. सुरूची या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर, नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, रवींद्र झुटिंग, भालचंद्र निकम, प्रवीण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित त्यांनी यावेळी आपल्या जाहीरनाम्याचे प्रकाशनही केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘निवडणूक आली की, जनतेसमोर आलेल्या विरोधी उमेदवारांनी सातारा-जावळीसाठी काय योगदान दिले आहे? काही उमेदवारांच्या घरात वडिलांपासून सत्ता होती. मात्र, जनतेनेच त्यांना एकदाचे घरी बसविले. मागे कुडाळ गटात आमच्यामध्ये पडलेल्या दुफळीचा त्यांनी फायदा घेतला. एकदा शिवसेना, एकदा भाजप असं ते आणखी किती घरांचा प्रवास करणार आहेत. ते भाजपमध्येही जास्त काळ टिकून राहतील, याबाबत शाश्वती नाही.निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली नाही, अशी आवई उठवून ते पक्षाबाहेर पडतील. त्यामुळे ते किती दिवसांचे पाहुणे आहेत, याचा विचार करून निष्ठावंतांनी त्यांचा प्रचार करावा, हवं तर त्यांच्याकडून तसं लिहून घ्यावं. असे हंगामी नेतृत्व कामाचे नसते, हे आधी भाजप निष्ठावंतांनीही जाणून घ्यावं.’‘विरोधक एकाच घरात चाळीस वर्षे सत्ता असल्याचा आरोप करतात, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी लोक प्रेमापोटी आमच्या पाठीशी आहेत. मतदार स्वत: बटन दाबतात, मी नाही, आम्ही नेहमीच समाजात एकी ठेवण्याचा प्रयत्न केला, याचीच ती पोहचपावती आहे.’ दीपक पवारांनी नगरपालिकेला पॅनेल उभे करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत छेडले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘नगरपालिकेलाच काय साखर कारखाना, जिल्हा बँकेचीही निवडणूक त्यांनी लढवावी. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल.’दरम्यान, त्यांच्या जाहिरनाम्यात कास तलाव उंची, शहरातील रस्त्यांसाठी आणलेला निधी, सातारा व जावळी तालुक्यांतील विविध विकासकामे, तीर्थक्षेत्र विकास आदी योजनांचा उल्लेख केला आहे. (प्रतिनिधी)आता तरी पक्षाने विचार करावाअनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले आहे. आता तरी मंत्रिपदासाठी पक्षाने विचार करणे गरजेचे आहे, अशी सुप्त इच्छा शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.