शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

प्राधिकरणचा गौप्यस्फोट; ‘खड्डे आमचे नव्हेतच!’

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

नागरिकांना उल्लू बनाविंग : शहरात कोणतेही काम सुरू नसल्याचे जीवनप्राधिकरणचे म्हणणे

दत्ता यादव - सातारा -शहरातील रस्त्यांची कामे जीवन प्राधिकरण विभागामुळे लांबणीवर पडल्याचा आरोप इकीकडे होत असताना गेल्या सहा महिन्यांपासून शहरात कुठेही एकदाही रस्ता खोदला नसल्याचा दावा प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अशाप्रकारच्या पालिकेकडून होत असलेल्या वारंवार आरोपांच्या ‘खेळी’मुळे प्राधिकरण विभाग मात्र आचंबित झाला आहे.शहराच्या विकासाचा केंद्र बिंदू म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. कोणता विभाग कुठले काम करतो, याचे नागरिकांना देणे-घेणे नसते. मात्र ‘आपण कर भरतो,’ म्हटल्यानंतर सुखसोयी चांगल्या मिळाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा असते. आणि त्यामध्ये गैरही काहीही नाही. सध्या सातारा पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची एकमेकांवर होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे शहरातील रस्त्याचा मुख्य प्रश्न मात्र लांबवणीवर पडत आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे.जीवन प्राधिकरणाची योजना लांबणीवर पडल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली गेली,’ असा आरोप होत असल्याने प्राधिकरण विभागाला मात्र हे चांगलेच झोंबले आहे. आतापर्यंत कधीही पालिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर न देणारे अधिकारीही आता बोलू लागले आहेत. त्यामुळे पालिकाविरूद्ध जीवन प्राधिकरण हा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.शहरात सात ते आठ महिन्यापुर्वीच १२० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत. शहरात आता कसलेही आमच्या विभागाची कामे सुरू नाहीत. असे असताना पालिकेचे हे सर्व आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पोवई नाक्यावरील सभापती निवास स्थानासमोरील पाईपलाईन गळतीचा जो मुद्दा वारंवार उपस्थित होतो, त्या विषयी अधिकारी आपल्या चूका मान्य करताहेत. या पाईपलाईनचे काम १९६८ ला पूर्ण झाले. जुन्या पद्धतीने पाईपलाईनची रचना असल्यामुळे तसेच एखादे जड वाहन त्यावरून गेल्यास त्या ठिकाणी वारंवार गळती लागत आहे. हे टाळण्यासाठी दोन दिवसांत काम हाती घेणार असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु केवळ एका समस्येमुळे प्राधिकरण विभागाकडे वारंवार बोट दाखविले जाते. हे म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी देण्यासारखे असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जीवन प्राधिकरणाची कामे पूर्ण झाले असताना पालिका प्रशासन जबाबदारी का झटकत आहे. तसेच या दोघांच्या वादामध्ये शहरातील रस्त्यांचा प्रश्न अजून किती दिवस लटकणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहर विकासासाठी काही वेळेला नक्कीच खोदकाम करावे लागतात. यात शंका नाही. मात्र, दर दोन दिवसांनी खोदकाम करुन रस्त्यांची चाळण केली जाते. यामुळे नागरिक त्रस्त असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सातारा पालिका एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम आहेत. यासंदर्भात जाब विचारला तर ते आमचे काम नाही, असे सांगून नागरिकांना ‘उल्लू’ बनविण्याचे काम केले जात आहे. प्रशासनाने हातात हात घालून कारभार करण्याची गरज आहे.डांबरीकरणाला मुहूर्तच मिळेनागेल्या सहा महिन्यांपासून शहरात सुधारित पाणी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खचखळग्यातून रोज वाटत काढत जाणारे नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडत जातात. एकदाचा रस्ता काय खोदायचा ते खोदा, अशी मानसिकता सातारकरांची झालीय. मात्र अद्यापही शहरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रया व्यक्त होत आहेत.‘पॉवरहाऊसपासून पुढे डोंगरावर साडेचार किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम बाकी आहे. हे काम करत असताना रस्ते खोदण्याचा काही संबंध येत नाही. तसेच शहरातही यापुढे रस्ते खोदण्याचा प्रश्नच येणार नाही.’- विजय मेंगे,कार्यकारी अभियंता