शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

प्राधिकरणचा गौप्यस्फोट; ‘खड्डे आमचे नव्हेतच!’

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

नागरिकांना उल्लू बनाविंग : शहरात कोणतेही काम सुरू नसल्याचे जीवनप्राधिकरणचे म्हणणे

दत्ता यादव - सातारा -शहरातील रस्त्यांची कामे जीवन प्राधिकरण विभागामुळे लांबणीवर पडल्याचा आरोप इकीकडे होत असताना गेल्या सहा महिन्यांपासून शहरात कुठेही एकदाही रस्ता खोदला नसल्याचा दावा प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अशाप्रकारच्या पालिकेकडून होत असलेल्या वारंवार आरोपांच्या ‘खेळी’मुळे प्राधिकरण विभाग मात्र आचंबित झाला आहे.शहराच्या विकासाचा केंद्र बिंदू म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. कोणता विभाग कुठले काम करतो, याचे नागरिकांना देणे-घेणे नसते. मात्र ‘आपण कर भरतो,’ म्हटल्यानंतर सुखसोयी चांगल्या मिळाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा असते. आणि त्यामध्ये गैरही काहीही नाही. सध्या सातारा पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची एकमेकांवर होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे शहरातील रस्त्याचा मुख्य प्रश्न मात्र लांबवणीवर पडत आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे.जीवन प्राधिकरणाची योजना लांबणीवर पडल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली गेली,’ असा आरोप होत असल्याने प्राधिकरण विभागाला मात्र हे चांगलेच झोंबले आहे. आतापर्यंत कधीही पालिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर न देणारे अधिकारीही आता बोलू लागले आहेत. त्यामुळे पालिकाविरूद्ध जीवन प्राधिकरण हा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.शहरात सात ते आठ महिन्यापुर्वीच १२० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत. शहरात आता कसलेही आमच्या विभागाची कामे सुरू नाहीत. असे असताना पालिकेचे हे सर्व आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पोवई नाक्यावरील सभापती निवास स्थानासमोरील पाईपलाईन गळतीचा जो मुद्दा वारंवार उपस्थित होतो, त्या विषयी अधिकारी आपल्या चूका मान्य करताहेत. या पाईपलाईनचे काम १९६८ ला पूर्ण झाले. जुन्या पद्धतीने पाईपलाईनची रचना असल्यामुळे तसेच एखादे जड वाहन त्यावरून गेल्यास त्या ठिकाणी वारंवार गळती लागत आहे. हे टाळण्यासाठी दोन दिवसांत काम हाती घेणार असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु केवळ एका समस्येमुळे प्राधिकरण विभागाकडे वारंवार बोट दाखविले जाते. हे म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी देण्यासारखे असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जीवन प्राधिकरणाची कामे पूर्ण झाले असताना पालिका प्रशासन जबाबदारी का झटकत आहे. तसेच या दोघांच्या वादामध्ये शहरातील रस्त्यांचा प्रश्न अजून किती दिवस लटकणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहर विकासासाठी काही वेळेला नक्कीच खोदकाम करावे लागतात. यात शंका नाही. मात्र, दर दोन दिवसांनी खोदकाम करुन रस्त्यांची चाळण केली जाते. यामुळे नागरिक त्रस्त असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सातारा पालिका एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम आहेत. यासंदर्भात जाब विचारला तर ते आमचे काम नाही, असे सांगून नागरिकांना ‘उल्लू’ बनविण्याचे काम केले जात आहे. प्रशासनाने हातात हात घालून कारभार करण्याची गरज आहे.डांबरीकरणाला मुहूर्तच मिळेनागेल्या सहा महिन्यांपासून शहरात सुधारित पाणी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खचखळग्यातून रोज वाटत काढत जाणारे नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडत जातात. एकदाचा रस्ता काय खोदायचा ते खोदा, अशी मानसिकता सातारकरांची झालीय. मात्र अद्यापही शहरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रया व्यक्त होत आहेत.‘पॉवरहाऊसपासून पुढे डोंगरावर साडेचार किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम बाकी आहे. हे काम करत असताना रस्ते खोदण्याचा काही संबंध येत नाही. तसेच शहरातही यापुढे रस्ते खोदण्याचा प्रश्नच येणार नाही.’- विजय मेंगे,कार्यकारी अभियंता