शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

तिन्ही राजेंना बाजूला ठेवून राष्ट्रवादी वाढविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत राजघराण्यांना राजकारणापासून लांबच ठेवले होते. पण, शरद ...

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत राजघराण्यांना राजकारणापासून लांबच ठेवले होते. पण, शरद पवारांनी राजकीय घराण्यांच्या लोकप्रियतेचा आपल्या राजकारणासाठी वापर करायचा ठरवून त्यांना राजकारणात संधी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राज घराण्यांचा जनाधार वाढल्याने आणि राजघराण्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही थोडं बाजूला करत जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या यावरून सध्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणत्याही नेत्याशिवाय पक्षाच्या माध्यमातून या निवडणुका लढविण्याबाबत ठाम आहे. तशा प्रकारचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले असून जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर न लढता पक्षविरहित झाली तरी त्याचे नेतृत्व करण्यावरून मतमतांतरे आहेत. कोणी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल असे म्हणत असले तरी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेतल्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही. त्यामुळे नेतृत्वाबाबत शिक्कामोर्तब होत नाही. प्रत्येक ठिकाणी सोयीस्कर मार्ग अवलंबिला जातो. ज्याठिकाणी एखाद्या पक्षाची ताकद अधिक आहे अशा ठिकाणी इतरांना संधी दिली जात नाही. त्यामुळे इतर सदस्यदेखील आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन आपल्याला संधी मिळणार म्हटल्यावर फारसा विरोध करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

बँकेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांचा विरोध होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना संचालक पदावर संधी मिळेल असे अंतर्गत ठरल्यामुळे त्यांचा विरोध मावळल्याचे दिसते. आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांचा अर्ज बाद झाला होता की करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा तो पात्र ठरविण्यात आला. त्यामुळे कोणाला संधी द्यायची आणि कोणाला रोखायचे याबाबतचे राजकारण यापूर्वीच ठरलेले आहे.

नगरपालिकेतदेखील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच पक्षात असूनदेखील आघाड्यांमार्फत लढण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेणार की दोन्ही राजेंच्या गटामध्ये स्वत:ला विभागून घेणार हे पहावे लागेल. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेत स्वतंत्र पॅनेल टाकेल. शिवसेनेनेही दोन्ही महाराजांकडे नाराज असलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे चौरंगी लढत होईल अशी आपेक्षा आहे. पण, त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेत आपल्या काही सहकाऱ्यांमार्फत संधी शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल.

रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून थोडे लांबच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील त्यांना काही अंतरावरच ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये यावेळी रामराजेंचा समावेश झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडी या तिन्ही राजेंना लांब ठेवूनच भविष्यात होतील. याचा परिणाम राष्ट्रवादी वाढण्यासाठी होतो की राष्ट्रवादीचे नुकसान होते हे देखील भविष्यात पहावे लागणार आहे.