शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण!

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

शेतकरी हवालदिल : खर्च जाणार वाया ; फलटण पूर्व भागातील चित्र

दुधेबावी : फलटण पूर्व भागातील दुधेबावी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, वडले, सोनवडी, मिरढे, जावली या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब बागांची लागवड केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. सध्या या डाळिंब बागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.दुधेबावी परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी सामना करत डाळिंब बागा फुलवल्या आहेत. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने या बागांची पाहणी करून या तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करावे. सध्यस्थितीत डाळिंब बागा तेल्यामुक्त करणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावरुन प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.डाळिंब बागेतील एका झाडाला तेल्या रोग झाला तर तो पूर्ण बागेत पसरत आहे. त्यामुळे झाडे मुळासहित काढुन टाकावी लागत आहेत. सुमारे दीड ते दोन वर्षे खर्च करुन वाढवलेली बाग काढुन टाकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन डाळिंबाची झाडे जगवण्याचे काम केले आहे. त्यावेळी पाण्याचा एक टँकर सुमारे सातशे रुपयाला मिळत होता. तसेच सेंद्रीय व रासायनिक खतेही फळबागांना घातली आहेत. ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे पंचवीस हजार रुपये इतका खर्च केला आहे.सध्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहार घेतला आहे. पावसाचे पाणी कळीवर अथवा फळावर पडून त्यावर टिपका हा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)डाळिंबावरील तेल्या रोगावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात यावर चर्चासत्र घेणे अपेक्षित आहे.-विकास सोनवलकर, डाळिंबधारक, शेतकरी