शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण!

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

शेतकरी हवालदिल : खर्च जाणार वाया ; फलटण पूर्व भागातील चित्र

दुधेबावी : फलटण पूर्व भागातील दुधेबावी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, वडले, सोनवडी, मिरढे, जावली या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब बागांची लागवड केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. सध्या या डाळिंब बागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.दुधेबावी परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी सामना करत डाळिंब बागा फुलवल्या आहेत. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने या बागांची पाहणी करून या तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करावे. सध्यस्थितीत डाळिंब बागा तेल्यामुक्त करणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावरुन प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.डाळिंब बागेतील एका झाडाला तेल्या रोग झाला तर तो पूर्ण बागेत पसरत आहे. त्यामुळे झाडे मुळासहित काढुन टाकावी लागत आहेत. सुमारे दीड ते दोन वर्षे खर्च करुन वाढवलेली बाग काढुन टाकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन डाळिंबाची झाडे जगवण्याचे काम केले आहे. त्यावेळी पाण्याचा एक टँकर सुमारे सातशे रुपयाला मिळत होता. तसेच सेंद्रीय व रासायनिक खतेही फळबागांना घातली आहेत. ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे पंचवीस हजार रुपये इतका खर्च केला आहे.सध्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहार घेतला आहे. पावसाचे पाणी कळीवर अथवा फळावर पडून त्यावर टिपका हा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)डाळिंबावरील तेल्या रोगावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात यावर चर्चासत्र घेणे अपेक्षित आहे.-विकास सोनवलकर, डाळिंबधारक, शेतकरी